शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
3
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
4
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
5
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
6
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
7
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
8
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
9
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
10
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
11
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
12
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
13
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
14
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
15
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
16
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
17
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
18
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
19
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
20
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

इन्स्टाग्रामवर प्रेम जडले, प्रेमासाठी मुलींनी परराज्य गाठले; पोलिसांनी शोधून आणले!

By साहेबराव नरसाळे | Updated: December 17, 2023 16:48 IST

नगर शहरातील अठरा वर्षे पूर्ण झालेल्या दोन मुली इंस्टाग्रामवर अनोळखी तरुणांशी झालेल्या ओळखीतून त्या मुलांच्या प्रेमात पडल्या.

अहमदनगर : इंस्टाग्रामवरून अनोळखी मुलांशी ओळख झाली. इंस्टाग्रामवरच चॅटींगच्या माध्यमातून प्रेम जुळले. मग प्रेमासाठी त्यांनी घरातून पलायन करत थेट परराज्य गाठले. आई-वडिल, नातेवाईकांनी कोतवाली पोलिस ठाण्यात मुली हरवल्याची फिर्याद दिली. शेवटी पोलिसांनी परराज्यातून या मुलींना शोधून आई-वडिलांच्या हवाली केले. मुलींचा शोध लागला. पण आई-वडिलांनीही आपल्या मुला-मुलींवर लक्ष ठेवायला हवे, असे आवाहन कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले. 

नगर शहरातील अठरा वर्षे पूर्ण झालेल्या दोन मुली इंस्टाग्रामवर अनोळखी तरुणांशी झालेल्या ओळखीतून त्या मुलांच्या प्रेमात पडल्या. या मुलांसाठी त्या दोघीही घरातून निघून गेल्या. पालकांनी शोधाशोध केली. मात्र सापडल्या नाहीत. त्यानंतर पालकांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्यादी दिल्या. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांनी एका मुलीला बिहार आणि उत्तर प्रदेशच्या सीमारेषेवरून आणले व पालकांच्या हवाली केले. त्यानंतर दुसऱ्या मुलीच्या शोधासाठी पथक पाठविण्यात आले. ही मुलगी मराठवाड्यात असल्याची माहिती पोलिसांनी तांत्रिक तपसातून काढली. त्यानंतर पोलिसांनी तिलाही शोधून आणत पालकांच्या स्वाधीन केले. मुलींचा तपास लावल्यानंतर नागरिकांनी पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस जवान विश्वास गाजरे, रवी टकले, प्रमोद लहारे, सचिन लोळगे यांचा सत्कार केला. पोलिसांना पाहताच मुलींना पश्चातापसोशल मिडीयावर दिखाव्याच्या खोट्या गोष्टींमध्ये गुंतवून मुलींना अलगद जाळ्यात फसवले जाते. अशा दिखाव्याला मुली बळी पडतात. घरातील आई, वडील, नातेवाईकांचा जराही विचार न करता त्या खोट्या प्रेमाच्या दिखाव्याला भुलतात. मात्र यातून कुटुंबाला मोठा त्रास सहन करावा लागतो. बदनामी अटळ होते. जेंव्हा पोलिसांनी या मुलींना ताब्यात घेतले तेंव्हा त्यांना आपण खूप मोठी चूक केली असल्याची कबुली देत आपल्याला पश्चाताप होत असल्याचे मुलींनी सांगितले. पालकांनी मुला-मुलींचे मित्र व्हावेपालकांनी आपल्या पाल्यांवर कायम लक्ष देणे गरजेचे आहे. प्रत्येक विषयाबाबत वेळोवेळी संवाद साधावेत. पालकांचे आपल्या पाल्याशी मैत्रीपूर्ण संबंध असावेत. मुलांमध्ये फक्त भीती नको तर, आदरयुक्त भीती असावी, आवाहन पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट