शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

इन्स्टाग्रामवर प्रेम जडले, प्रेमासाठी मुलींनी परराज्य गाठले; पोलिसांनी शोधून आणले!

By साहेबराव नरसाळे | Updated: December 17, 2023 16:48 IST

नगर शहरातील अठरा वर्षे पूर्ण झालेल्या दोन मुली इंस्टाग्रामवर अनोळखी तरुणांशी झालेल्या ओळखीतून त्या मुलांच्या प्रेमात पडल्या.

अहमदनगर : इंस्टाग्रामवरून अनोळखी मुलांशी ओळख झाली. इंस्टाग्रामवरच चॅटींगच्या माध्यमातून प्रेम जुळले. मग प्रेमासाठी त्यांनी घरातून पलायन करत थेट परराज्य गाठले. आई-वडिल, नातेवाईकांनी कोतवाली पोलिस ठाण्यात मुली हरवल्याची फिर्याद दिली. शेवटी पोलिसांनी परराज्यातून या मुलींना शोधून आई-वडिलांच्या हवाली केले. मुलींचा शोध लागला. पण आई-वडिलांनीही आपल्या मुला-मुलींवर लक्ष ठेवायला हवे, असे आवाहन कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले. 

नगर शहरातील अठरा वर्षे पूर्ण झालेल्या दोन मुली इंस्टाग्रामवर अनोळखी तरुणांशी झालेल्या ओळखीतून त्या मुलांच्या प्रेमात पडल्या. या मुलांसाठी त्या दोघीही घरातून निघून गेल्या. पालकांनी शोधाशोध केली. मात्र सापडल्या नाहीत. त्यानंतर पालकांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्यादी दिल्या. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांनी एका मुलीला बिहार आणि उत्तर प्रदेशच्या सीमारेषेवरून आणले व पालकांच्या हवाली केले. त्यानंतर दुसऱ्या मुलीच्या शोधासाठी पथक पाठविण्यात आले. ही मुलगी मराठवाड्यात असल्याची माहिती पोलिसांनी तांत्रिक तपसातून काढली. त्यानंतर पोलिसांनी तिलाही शोधून आणत पालकांच्या स्वाधीन केले. मुलींचा तपास लावल्यानंतर नागरिकांनी पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस जवान विश्वास गाजरे, रवी टकले, प्रमोद लहारे, सचिन लोळगे यांचा सत्कार केला. पोलिसांना पाहताच मुलींना पश्चातापसोशल मिडीयावर दिखाव्याच्या खोट्या गोष्टींमध्ये गुंतवून मुलींना अलगद जाळ्यात फसवले जाते. अशा दिखाव्याला मुली बळी पडतात. घरातील आई, वडील, नातेवाईकांचा जराही विचार न करता त्या खोट्या प्रेमाच्या दिखाव्याला भुलतात. मात्र यातून कुटुंबाला मोठा त्रास सहन करावा लागतो. बदनामी अटळ होते. जेंव्हा पोलिसांनी या मुलींना ताब्यात घेतले तेंव्हा त्यांना आपण खूप मोठी चूक केली असल्याची कबुली देत आपल्याला पश्चाताप होत असल्याचे मुलींनी सांगितले. पालकांनी मुला-मुलींचे मित्र व्हावेपालकांनी आपल्या पाल्यांवर कायम लक्ष देणे गरजेचे आहे. प्रत्येक विषयाबाबत वेळोवेळी संवाद साधावेत. पालकांचे आपल्या पाल्याशी मैत्रीपूर्ण संबंध असावेत. मुलांमध्ये फक्त भीती नको तर, आदरयुक्त भीती असावी, आवाहन पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट