शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

चुरशीच्या लढतीत श्रीगोंद्यात फुलले कमळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 17:07 IST

भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार यांचा ४ हजार ७४० मतांनी पराभव करीत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात कमळ फुलविले. पहिल्या फेरीपासून अखेरच्या फेरीपर्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत अखेर पाचपुतेंनी बाजी मारली. प्रत्येक निवडणुकीत वेगळ्या चिन्हावर आमदार होण्याचा बहुमान पाचपुते यांनी सातव्यांदा मिळविला.

श्रीगोंदा विधानसभा निवडणूक विश्लेषण - बाळासाहेब काकडे । श्रीगोंदा : भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार यांचा ४ हजार ७४० मतांनी पराभव करीत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात कमळ फुलविले. पहिल्या फेरीपासून अखेरच्या फेरीपर्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत अखेर पाचपुतेंनी बाजी मारली.प्रत्येक निवडणुकीत वेगळ्या चिन्हावर आमदार होण्याचा बहुमान पाचपुते यांनी सातव्यांदा मिळविला.  निवडणुकीत एकतर्फी यश मिळेल या आशेने पाचपुते यांचे समर्थक सकाळपासूनच मतमोजणी केंद्राबाहेर मोठ्या संख्येने जमले होते. अपेक्षेप्रमाणे तेराव्या फेरी अखेर पाचपुते यांनी आघाडी राखली होती. मात्र त्यांना मोठी आघाडी नव्हती. अवघी तीन ते चार हजाराच्या आसपास आघाडी होती. १७ व्या फेरी अखेर घनश्याम शेलार यांनी ३३५७ मतांची आघाडी घेतल्याने चुरस निर्माण झाली. त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली. त्यानंतर घोड कालव्याचा पट्टा पुन्हा एकदा पाचपुतेंच्या मागे उभा राहिला. श्रीगोंदा शहर, लिंपणगाव, काष्टी व आढळगाव या गावांनी निर्णायक आघाडी देत पाचपुतेंना तारलेनिवडणुकीच्या सुरुवातीपासूनच नाट्यमय घडामोडी घडल्या. आमदार राहुल जगताप व नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी उमेदवारी नाकारली. नागवडे यांनी तर भाजपत प्रवेश करून पाचपुतेंमागे ताकद दिली. यामध्ये खासदार डॉ. सुजय विखे यांनी मोलाची भूमिका पार पाडली. त्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्टÑवादीच्या उमेदवारीची माळ घनश्याम शेलार यांच्या गळ्यात घातली. शेलार यांच्या मागे आमदार जगताप यांनी ताकद उभी केली. शेलारांसाठी शरद पवार व खासदार अमोल कोल्हे यांच्याही सभा झाल्या होत्या. पवारांच्या सभेतनंतर श्रीगोंद्यात रंगत निर्माण झाली. ही निवडणूक कुकडी, घोडचे पाणी अगर इतर प्रश्नांभोवती फिरण्याऐवजी शरद पवारांविषयी सहानुभूती, नातेगोते अशा मुद्यांकडे वळली होती. पाचपुते यांनी त्यांचे कुटुंबीय, कार्यकर्त्यांच्या सहाय्यानेच प्रचार केला. पाचपुते यांना एक लाख दोन हजार ५०३, तर घनश्याम शेलार यांना ९७ हजार ९८० मते मिळाली. संभाजी ब्रिगेडचे टिळक भोस यांनी ऊस उत्पादक शेतक-यांच्या बिलासाठी आंदोलन उभारले. मात्र त्यांना जनतेनेस्वीकारले नाही. वंचित बहुजन आघाडीचे मच्छिंद्र सुपेकर यांनी ३ हजार १८६ मते मिळाली.आघाडी राष्ट्रवादीची.. जल्लोष भाजपचा  चौदाव्या फेरीपासून राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार यांनी आघाडी घेतली होती. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष चालूच ठेवला होता. नंतर ते शांत झाले होते. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना चांगलीच हुरहुर लागली होती. व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची फेरमोजणी..व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या व ईव्हीएममधील प्रत्यक्ष मतदान यामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार घनश्याम शेलार यांच्या मतात एकाची तफावत आढळली. याबाबत राष्ट्रवादीचे उमेदवार प्रतिनिधी मोहन भिंताडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांच्याकडे तक्रार केली व फेरमतमोजणीची मागणी केली. त्यामुळे चिठ्ठ्यांची पुन्हा मोजणी करण्यात आली. यात बराच वेळ गेला. अखेर मोजणीअंती ही तफावत दूर झाली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी अंतिम निकाल जाहीर केला. सर्वांच्या साथीने विजयसन २०१४ च्या निवडणुकीत पराभव झाल्याने पुन्हा एंट्री करणे अवघड होते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साथ आणि सतत जनसंपर्क ठेवला. जीवाभावाचे कार्यकर्ते आणि गोरगरीब मतदारांनी दिलेली साथ, यामुळे विजय झाला. त्याबद्दल सर्वांचा आभारी आहे, असे आमदार बबनराव पाचपुते यांनी सांगितले.      

टॅग्स :Babanrao Pachaputeबबनराव पाचपुतेshrigonda-acश्रीगोंदा