शहरं
Join us  
Trending Stories
1
लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या...
2
११ वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर NASA च्या 'MAVEN' मार्स ऑर्बिटरशी अचानक संपर्क तुटला; वैज्ञानिक चिंतेत
3
बँक खाते, पेन्शन, टॅक्स स्लॅब ते GST बदल... २०२५ मध्ये पैशांसंबंधी झाले ७ मोठे बदल; तुम्हाला किती फायदा?
4
Shashi Tharoor: "पत्नीच्या संमतीशिवाय संबंध ठेवणे वैवाहिक बलात्कारच, पतीला सूट का द्यावी?"- शशी थरूर
5
"शिवराज पाटील यांची अलीकडेच भेट झाली होती, ते..." PM नरेंद्र मोदींनी दिला आठवणींना उजाळा
6
Nashik Leopard: बिबट्याची नाशिक पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालय आवारातच एन्ट्री, सीसीटीव्हीमध्ये दिसला
7
"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार
8
आता परत सलमानवर जोक करणार का? पापाराझीच्या प्रश्नावर प्रणित मोरेने हातच जोडले; म्हणाला...
9
...हे ५६ हजार लोक जगातील संपत्तीवर ठेवतात नियंत्रण; श्रीमंतीच्या नव्या आकडेवारीनं सर्वच हैराण
10
पाकिस्तान हेरगिरी नेटवर्क: गुरुग्राम कोर्टातील वकील नय्यूमला अटक, हवाला कनेक्शनचा संशय!
11
U19 Asia Cup 2025 : वैभव सूर्यवंशीचा धमाका! सिक्सर मारत स्टाईलमध्ये साजरी केली फिफ्टी
12
खळबळजनक! ३ वर्षे इंजिनिअरने केले रुग्णांवर उपचार; भावोजींची डिग्री, पण औषधं द्यायचा मेहुणा
13
‘शेतात जाणाऱ्या महिलाही सुरक्षित नाहीत’, पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर हजारो जोडप्यांचे व्हिडीओ बनल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट
14
नगराध्यक्ष ते राज्यपाल! कसा होता शिवराज पाटील चाकूरकरांचा प्रवास; तब्बल ७ वेळा बनले खासदार
15
उत्तर प्रदेशातील दुसरी सीमा हैदर! लग्नानंतर बांगलादेशी महिला रीना बेगम नेपाळमार्गे थेट भारतात
16
Flipperachi Net Worth: धुरंदरचं व्हायरल गाणं FA9LA गाणाऱ्या फ्लिपरॅचीची संपत्ती किती? दरवर्षी किती करतो कमाई, जाणून घ्या
17
Ghodbunder Road Update: घोडबंदर मार्गावर पुन्हा ३ दिवस अवजड वाहनांना बंदी,  पर्यायी मार्ग कोणते?
18
"मनोरंजनाच्या नावाखाली फक्त हिंसाच...", सध्याच्या कंटेंटवर राधिका आपटेने व्यक्त केली चिंता
19
मेक्सिकोच्या ५०% टॅक्समागे अमेरिकेचा हात? भारतातील 'या' क्षेत्राला बसणार सर्वाधिक झळ
20
IND vs SA: द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम, भारताविरुद्ध सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा पहिलाच संघ
Daily Top 2Weekly Top 5

"नियमित जीएसटी भरणाऱ्यालाच तोटा का?; व्यापाऱ्यांनी सरकारशी चर्चा करावी"

By अनिल लगड | Updated: June 26, 2020 14:26 IST

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोनामुळे जीएसटीच्या संदर्भात अनेक दिलासादायक घोषणा केल्या आहेत. असे असले तरी या घोषणा अनेक व्यापा-यांसाठी चोर सोडून संन्याशाला फाशी.. अशाच ठरत आहेत, असे मत नगर येथील कर सल्लागार अ‍ॅड. निलेश चोरबेले यांनी  ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

लोकमत संवाद

अहमदनगर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोनामुळे जीएसटीच्या संदर्भात अनेक दिलासादायक घोषणा केल्या आहेत. असे असले तरी या घोषणा अनेक व्यापा-यांसाठी चोर सोडून संन्याशाला फाशी.. अशाच ठरत आहेत, असे मत नगर येथील कर सल्लागार अ‍ॅड. निलेश चोरबेले यांनी  ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यापा-यांसाठी जीएसटी संदर्भात कोणत्या दिलासादायक घोषणा केल्या आहेत?

-जुलै २०१७ पासून जानेवारी २०२० पर्यंत जीएसटीआर-३ ब भरण्यासाठी विलंब शुल्क आकारले जाणार नाही. इतर करदात्यांसाठी कमाल विलंब शुल्क १० हजारांऐवजी ऐवजी आता फक्त ५०० रुपये द्यावे लागतील. ज्या छोट्या व्यावसायिकांची उलाढाल पाच कोटींपेक्षा कमी आहे. त्यांना ६ जुलै २०२० पर्यंत व्याजाची आकारणी केली जाणार नाही. परंतु त्यांनी प्रस्ताव दाखल केला पाहिजे. जे करदाते सदर महिन्याचे जीएसटीआर-३ ब दाखल करतील, त्यांना व्याजाची आकारणी १८ टक्क्यांऐवजी ९ टक्के करण्यात आली आहे. मे, जून व जुलैसाठी जे करदाते सदर महिन्याचे जीएसटीआर-३ ब ३० सप्टेंबरअखेर दाखल करतील, त्यांना विलंब शुल्क किंवा व्याजाची आकारणी केली जाणार नाही. ज्या व्यापा-यांचे जीएसटीचे रजिस्ट्रेशन १२ जून २०२० पर्यंत रद्द झाले आहेत, त्यांना ते पूर्ववत करण्यासाठी ३० सप्टेंबर २०२० पर्यंत मुदत दिली गेली आहे.

व्यापा-यांना या सवलतींचा कसा फायदा होईल?

- ज्या व्यापारी वर्गाने कधीच जीएसटीच्या नियमांचे पालन केले नाही. जीएसटीआर-३ बी व जीएसटीआर-१ कधीच वेळेत दाखल केले नाही. ज्या व्यापारी वर्गाने आपला जीएसटी कधीच वेळेवर भरला नाही अशा व्यापारी वर्गाचाच यात विचार केला आहे. त्यामुळे अशा व्यापाºयांसाठीच ही घोषणा फायदेशीर ठरली आहे. 

प्रामाणिकपणे नियमित कर भरणा-या व्यापा-याना याचा कितपत फायदा होईल?

-आपण दुस-या बाजूच्या व्यापारी वर्गाचा विचार केला तर ज्यांनी आपले जीएसटीआर-३ बी व जीएसटीआर-१ भरण्यासाठी कितीतरी हजार रुपये विलंब शुल्क व व्याजात खर्च करुन आपला जीएसटी प्रामाणिकपणे व न चुकता भरला आहे. त्या व्यापारी वर्गास मात्र या घोषणेने काहीही फायदा मिळणार नाही. कारण सदर वर्गास त्यांना प्रामाणिकपणे आतापर्यंत भरलेले विलंब शुल्क परत मिळणार की नाही? याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी काहीही घोषणा केली नाही.

वेळेवर जीएसटी न भरणा-यालाच फायदा? इतरांंना दंड का?

- जो व्यापारी वर्ग कायद्याचे पालन करत नाही व वेळेवर करही भरत नाही तो व्यापारी फायद्यात आणि जो व्यापारी वर्ग कर्ज काढून जीएसटी सारख्या किचकट कायद्याचे तंतोतंत पालन करुन प्रामाणिकपणे वेळेवर जीएसटी व त्याचा दंड भरतो, त्याला मात्र भुर्दंड. यामुळे सरकारच्या अशा धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असेही चोरबेले यांनी म्हटले आहे. 

ज्यांनी प्रामाणिकपणे जीएसटी भरला, त्यांंना तो परत करायला हवा का?

- व्यापारी वर्गाने आता वेळेवर कर भरावा की नाही अशी चर्चा सर्वत्र होत आहे. या विलंब शुल्क परताव्यासंदर्भात व्यापारी वर्गाने एकजुटीने सरकारशी चर्चा करणे आवश्यक आहे. सरकारनेही कोरोना महामारीमुळे व्यापारी वर्गाची जी आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे त्याचा विचार करावा. व्यापा-यांच्या विलंब शुल्काची रक्कम त्यांना परत करण्यासंदर्भात विचार करणे गरजेचे आहे. जेणे करुन व्यापाºयांच्या आर्थिक परिस्थितीस थोडा हातभार लागेल, असेही चोरबेले यांनी म्हटले आहे.

प्रामाणिकपणे नियमित कर भरणा-या व्यापा-यांना याचा कितपत फायदा होईल?

-आपण दुस-या बाजूच्या व्यापारी वर्गाचा विचार केला तर ज्यांनी आपले जीएसटीआर-३ बी व जीएसटीआर-१ भरण्यासाठी कितीतरी हजार रुपये विलंब शुल्क व व्याजात खर्च करुन आपला जीएसटी प्रामाणिकपणे व न चुकता भरला आहे. त्या व्यापारी वर्गास मात्र या घोषणेने काहीही फायदा मिळणार नाही. कारण सदर वर्गास त्यांना प्रामाणिकपणे आतापर्यंत भरलेले विलंब शुल्क परत मिळणार की नाही? याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी काहीही घोषणा केली नाही.

वेळेवर जीएसटी न भरणा-यालाच फायदा? इतरांंना दंड का?

- जो व्यापारी वर्ग कायद्याचे पालन करत नाही व वेळेवर करही भरत नाही तो व्यापारी फायद्यात आणि जो व्यापारी वर्ग कर्ज काढून जीएसटी सारख्या किचकट कायद्याचे तंतोतंत पालन करुन प्रामाणिकपणे वेळेवर जीएसटी व त्याचा दंड भरतो, त्याला मात्र भुर्दंड. यामुळे सरकारच्या अशा धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असेही चोरबेले यांनी म्हटले आहे. 

ज्यांनी प्रामाणिकपणे जीएसटी भरला, त्यांंना तो परत करायला हवा का?

- व्यापारी वर्गाने आता वेळेवर कर भरावा की नाही अशी चर्चा सर्वत्र होत आहे. या विलंब शुल्क परताव्यासंदर्भात व्यापारी वर्गाने एकजुटीने सरकारशी चर्चा करणे आवश्यक आहे. सरकारनेही कोरोना महामारीमुळे व्यापारी वर्गाची जी आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे त्याचा विचार करावा. व्यापा-यांच्या विलंब शुल्काची रक्कम त्यांना परत करण्यासंदर्भात विचार करणे गरजेचे आहे. जेणे करुन व्यापा-यांच्या आर्थिक परिस्थितीस थोडा हातभार लागेल, असेही चोरबेले यांनी म्हटले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरGSTजीएसटीEconomyअर्थव्यवस्था