शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

सततच्या अवकाळी पावसामुळे तूर, बाजरी, कापूस पिकांचे नुकसान; शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2023 10:31 IST

काही ठिकाणी तुरीला शेंगा लागल्या तर अनेक ठिकाणी शेतातील उभा ऊस आडवा झाला.

अहमदनगर तालुक्याच्या जवळपास सर्वच भागात रविवारपासून सतत असलेल्या अवकाळी पावसाने तूर, बाजरी, कापूस या पिकांचे नुकसान झाले आहे. पावसाळ्यात  पावसाअभावी आधीच दुष्काळी परिस्थितीच्या खाईत लोटलेल्या शेतकऱ्यांना सततच्या अवकाळी पावसामुळे आणखी बेजार केले आहे.

तालुक्यातील सर्वच्या सर्व सहा मंडळात रविवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांसह खरिपाच्याही विविध पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. तालुक्यातील भातकुडगाव मंडळात तर अतिवृष्टीची नोंद झाली, लागोपाठ झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या कांदा, तूर, कपाशी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

काही ठिकाणी तुरीला शेंगा लागल्या तर अनेक ठिकाणी शेतातील उभा ऊस आडवा झाला. तर काही ठिकाणी काढणीला आलेल्या कापूस, तूर, कांदा, डाळिंब, टोमॅटो, लिंबू आदि पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात रविवारी व त्या पाठोपाठ बुधवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुस्कानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना आमदार मोनिका राजळे यांनी प्रशासनास दिल्या. त्यानुसार कामगार तलाठी ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांनी  शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश  तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी दिले आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीAhmednagarअहमदनगर