शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाचा चुकीचा अर्थ लावल्याने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:21 IST

पारनेर विभागातील सहाय्यक कर्मचारी गणेश खोसे यांनी ही तक्रार ऑनलाईन केली आहे. याशिवाय सामाजिक कार्यकर्ते अमोल घोलप यांनीही उपमहाव्यवस्थापकांचे ...

पारनेर विभागातील सहाय्यक कर्मचारी गणेश खोसे यांनी ही तक्रार ऑनलाईन केली आहे. याशिवाय सामाजिक कार्यकर्ते अमोल घोलप यांनीही उपमहाव्यवस्थापकांचे लक्ष वेधले आहे. अहमदनगर विभाग नियंत्रकांनी २०१६-२०१७ च्या सहाय्यक भरतीला चुकीच्या पद्धतीने आरक्षण लावून कर्मचाऱ्यांचे नुकसान केले आहे.

तक्रारीत म्हटले आहे की विभाग नियंत्रकांनी परिपत्रकिय सूचनांचे काटेकोर पालन न केल्यामुळे भरती मधील उमेदवार अद्याप कायम झाले नाहीत. काही आगारात त्यांना घरी राहण्यास सांगितले आहे. वास्तविक पाहता या उमेदवारांना नोव्हेंबर २०१९ मध्ये घेण्यात आले होते आणि मे २०२० ला त्यांना १८० दिवस झाल्याने ऑक्टोबर २०२० मध्ये त्यांना कायमस्वरूपी सेवेत घेणे गरजेचे होते. पण या विभागाने बिंदूनामावलीमध्ये एससीबीसीच्या सुमारे ३३ जागा खुल्या प्रवर्गातून घेतल्यामुळे खुल्या प्रवर्गात एकही जागा शिल्लक राहिली नाही. म्हणून या उमेदवारांना नियमित वेतनश्रेणीवर घेता आले नाही, असे या विभागाने नियमित वेतन श्रेणीच्या नोटमध्ये नमूद केले आहे. मुळात भरती प्रक्रिया ३० नोव्हेंबर २०१८ च्या अगोदर सुरु झाली. त्यांना हे आरक्षण लागू न करता २००१ ची आरक्षण प्रक्रिया लागू करावी असे शासन निर्णयात स्पष्ट म्हटलेले आहे. तरी देखील आरक्षणाचा चुकीचा अर्थ काढून या उमेदवारांचे मोठे नुकसान झाले आहे.

परिपत्रकिय सूचनांचे काटेकोरपणे पालन केले नाही आणि यात कामगार व महामंडळ यांच्यात वाद झाले तर संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरून कार्यवाही केली जाते असा महामंडळाचा नियम आहे. त्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाही व्हावी, असेही तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान या तक्रारी संदर्भात अहमदनगर एसटी कामगार संघटनेने उपमहाव्यवस्थापक यांना पत्र दिले असून संबंधित तक्रारीची दखल घ्यावी आणि अन्यायग्रस्त उमेदवारांना न्याय मिळावा, अशी मागणी संघटनेचे विभागीय सचिव जी. डी. अकोलकर यांनी केली आहे.

--------

विभाग नियंत्रकांच्या विरोधात तक्रारी करायला उमेदवार घाबरत आहेत. त्यामुळे त्यांनी माझ्याकडे मदत मागितली. त्यानुसार मी याप्रकरणी पाठपुरावा करत आहे. विभाग नियंत्रक व उपमहाव्यवस्थापक यांच्याकडे वारंवार लेखी निवेदन दिले. सगळे पुरावे देखील सादर केले, पण अद्याप या उमेदवारांना न्याय मिळालेला नाही. या प्रकरणाची दखल घेतली नाही तर आपण पुढील महिन्यात आमरण उपोषण करणार आहोत.

- अमोल घोलप, सामाजिक कार्यकर्ते