शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
2
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
3
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
4
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
5
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
6
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 
7
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
8
मारुतीच्या 'या' SUV नं स्पर्धकांचं टेन्शन वाढवलं, मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग; ASEAN NCAP क्रॅश टेस्टमध्ये केली कमाल
9
जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...
10
दोस्तीतच कुस्ती! ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले, ५ मिनिटांत घरी पोहोचणार होता; पण रस्त्यातच मित्रांनी संपवले
11
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
12
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
13
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
14
प्रबोधिनी एकादशी २०२५: देवउठनी एकादशीला विष्णू खरोखरच ४ महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात का?
15
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
16
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
17
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
18
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
19
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
20
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट

आरक्षणाचा चुकीचा अर्थ लावल्याने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:21 IST

पारनेर विभागातील सहाय्यक कर्मचारी गणेश खोसे यांनी ही तक्रार ऑनलाईन केली आहे. याशिवाय सामाजिक कार्यकर्ते अमोल घोलप यांनीही उपमहाव्यवस्थापकांचे ...

पारनेर विभागातील सहाय्यक कर्मचारी गणेश खोसे यांनी ही तक्रार ऑनलाईन केली आहे. याशिवाय सामाजिक कार्यकर्ते अमोल घोलप यांनीही उपमहाव्यवस्थापकांचे लक्ष वेधले आहे. अहमदनगर विभाग नियंत्रकांनी २०१६-२०१७ च्या सहाय्यक भरतीला चुकीच्या पद्धतीने आरक्षण लावून कर्मचाऱ्यांचे नुकसान केले आहे.

तक्रारीत म्हटले आहे की विभाग नियंत्रकांनी परिपत्रकिय सूचनांचे काटेकोर पालन न केल्यामुळे भरती मधील उमेदवार अद्याप कायम झाले नाहीत. काही आगारात त्यांना घरी राहण्यास सांगितले आहे. वास्तविक पाहता या उमेदवारांना नोव्हेंबर २०१९ मध्ये घेण्यात आले होते आणि मे २०२० ला त्यांना १८० दिवस झाल्याने ऑक्टोबर २०२० मध्ये त्यांना कायमस्वरूपी सेवेत घेणे गरजेचे होते. पण या विभागाने बिंदूनामावलीमध्ये एससीबीसीच्या सुमारे ३३ जागा खुल्या प्रवर्गातून घेतल्यामुळे खुल्या प्रवर्गात एकही जागा शिल्लक राहिली नाही. म्हणून या उमेदवारांना नियमित वेतनश्रेणीवर घेता आले नाही, असे या विभागाने नियमित वेतन श्रेणीच्या नोटमध्ये नमूद केले आहे. मुळात भरती प्रक्रिया ३० नोव्हेंबर २०१८ च्या अगोदर सुरु झाली. त्यांना हे आरक्षण लागू न करता २००१ ची आरक्षण प्रक्रिया लागू करावी असे शासन निर्णयात स्पष्ट म्हटलेले आहे. तरी देखील आरक्षणाचा चुकीचा अर्थ काढून या उमेदवारांचे मोठे नुकसान झाले आहे.

परिपत्रकिय सूचनांचे काटेकोरपणे पालन केले नाही आणि यात कामगार व महामंडळ यांच्यात वाद झाले तर संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरून कार्यवाही केली जाते असा महामंडळाचा नियम आहे. त्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाही व्हावी, असेही तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान या तक्रारी संदर्भात अहमदनगर एसटी कामगार संघटनेने उपमहाव्यवस्थापक यांना पत्र दिले असून संबंधित तक्रारीची दखल घ्यावी आणि अन्यायग्रस्त उमेदवारांना न्याय मिळावा, अशी मागणी संघटनेचे विभागीय सचिव जी. डी. अकोलकर यांनी केली आहे.

--------

विभाग नियंत्रकांच्या विरोधात तक्रारी करायला उमेदवार घाबरत आहेत. त्यामुळे त्यांनी माझ्याकडे मदत मागितली. त्यानुसार मी याप्रकरणी पाठपुरावा करत आहे. विभाग नियंत्रक व उपमहाव्यवस्थापक यांच्याकडे वारंवार लेखी निवेदन दिले. सगळे पुरावे देखील सादर केले, पण अद्याप या उमेदवारांना न्याय मिळालेला नाही. या प्रकरणाची दखल घेतली नाही तर आपण पुढील महिन्यात आमरण उपोषण करणार आहोत.

- अमोल घोलप, सामाजिक कार्यकर्ते