शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

जलयुक्तबाबत कृषी अधिका-यांची ढिलाई : जिल्हाधिका-यांनी खडसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 12:19 IST

जलयुक्त शिवार अभियानात सन २०१८-१९ मध्ये निवडण्यात आलेल्या गावांचे आराखडे अंतिम करून ते जिल्हास्तरावर सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले. गावपातळीवरील आराखडे तयार करताना संबंधित लोकप्रतिनिधींची मान्यता घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

अहमदनगर : जलयुक्त शिवार अभियानात सन २०१८-१९ मध्ये निवडण्यात आलेल्या गावांचे आराखडे अंतिम करून ते जिल्हास्तरावर सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले. गावपातळीवरील आराखडे तयार करताना संबंधित लोकप्रतिनिधींची मान्यता घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात गुरुवारी जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे आढावा बैठक जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने, उपवनसंरक्षक एम. आदर्श रेड्डी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) वामनराव कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे आदींची उपस्थिती होती. सध्या या अभियानातील २०१८-१९ साठी निवडलेल्या गावांत सर्व यंत्रणांनी शिवार फेरी केल्या असतील. त्यानंतर फोटोसह गावआराखडा जिल्हास्तरावर सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.सध्या जलयुक्त शिवार अभियानातील सन २०१७-१८ मधील उर्वरित कामे संबंधित यंत्रणांनी आठवड्याच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश द्विवेदी यांनी दिले. उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांनी या कामांचा नियमित आढावा घेणे आवश्यक आहे. मात्र, तसे होताना दिसत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रत्येक कामांवर पर्यवेक्षण होणे गरजेचे आहे. त्या कामांची गती वाढवून ती वेळेत पूर्ण करण्याबाबत सर्व यंत्रणाप्रमुखांनी लक्ष घालावे, असे निर्देश द्विवेदी यांनी दिले.... तर शेततळे रद्द करामागेल त्याला शेततळे योजनेत जिल्ह्यात आतापर्यंत ९४८३ शेततळी पूर्ण झाली आहेत. मात्र कार्यारंभ देऊनही कामे सुरू न करणा-या शेततळ्यांचे मंजुरी आदेश रद्द करून इतरांना ते मंजूर करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यात १३ कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत आपल्याला असलेले उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. त्यासाठी कृषीसह इतर यंत्रणांनी त्यांना नेमून दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय