शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

‘लोकमत’ स्टिंगवर शिक्कामोर्तब : टँकर संस्थांना दहा लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 14:50 IST

पिण्याच्या पाण्यासाठी सुरू असलेल्या टँकरमध्ये अनियमितता होत असल्याची बाब दोन महिन्यापूर्वी ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करून निदर्शनास आणली.

अहमदनगर : पिण्याच्या पाण्यासाठी सुरू असलेल्या टँकरमध्ये अनियमितता होत असल्याची बाब दोन महिन्यापूर्वी ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करून निदर्शनास आणली. त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित टँकर संस्थांवर दहा लाखांची दंडात्मक कारवाई केली आहे. ही रक्कम त्यांच्या बिलातून कपात होणार आहे.जिल्ह्यात सुरू असलेल्या टँकरमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याने लोकांना वेळेत पाणी मिळत नव्हते. त्यामुळे ‘लोकमत’ टीमने जिल्हाभरातील टँकरची तपासणी केली. यात मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळल्या. बºयाच टँकरला जीपीसएस यंत्रणाच नव्हती. टँँकरच्या खेपांचा हिशोब ठेवण्यासाठी असलेले लॉगबुकच टँकरचालक भरत नव्हते. काही लॉगबुकवर पाणीपुरवठा समिती सदस्यांच्या सह्या नव्हत्या. काही ठिकाणी मंजूर खेपांपेक्षा कमी खेपा होत होत्या. काही गावांत तलाठी, ग्रामसेवकांचे या प्रक्रियेवर नियंत्रण नव्हते. काही टँकरचे वजन प्रमाणित केलेले नव्हते, तर अनेक ठिकाणी ठरवून दिलेल्या उद्भवाऐवजी दुसºयाच उद््भवावरून दूषित पाणी भरले जायचे. टँकरच्या जाताना-येतानाच्या नोंदी नाहीत. ग्रामसेवक, तलाठी मुख्यालयात नाहीत, अशा अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या.या स्टिंगमुळे टँकर ठेकेदारांत खळबळ उडाली. शासकीय अधिकारीही खडबडून जागे झाले. जिल्हा प्रशासनाने तातडीने तपासणी पथके तयार करून काही गावांत जात टँकरमधील अनियमितता पडताळून पाहिली असता, त्यातही तथ्य आढळले.याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी गटविकास अधिका-यांना याबाबत टँकर संस्थांवर दंडात्मक कारवाई निश्चित करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार गटविकास अधिका-यांनी टँकर संस्थांवर जबाबदारी निश्चित करून तो अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठवला. २९ जून रोजी जिल्हाधिका-यांनी आदेश काढत या टँकर संस्थांना १० लाख ४३ हजार ३४२ रूपयांचा दंड केला आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर