शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

लोकमत संवाद/ शहराच्या पर्यटनाचा अजेंडा ठरवावा लागेल - जयंत येलूलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 21:22 IST

अहमदनगर :  अहमदनगर हे पर्यटनस्थळ कसे करता येईल याचे साधे उदाहरण सांगतो. फराहबक्ष महाल एकेकोळी तळ््यात होता. तेथे पाण्याचा स्त्रोत भरपूर आहे. तेथे तलाव झाला तर नौकानयनाची सुविधा होईल. जेणेकरुन लोक तेथे फिरण्यासाठी जातील, अशी अपेक्षा रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर यांनी व्यक्त केली. अहमदनगर शहर स्थापना दिनानिमित्त ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.

अहमदनगर :  अहमदनगर हे पर्यटनस्थळ कसे करता येईल याचे साधे उदाहरण सांगतो. फराहबक्ष महाल एकेकोळी तळ््यात होता. तेथे पाण्याचा स्त्रोत भरपूर आहे. तेथे तलाव झाला तर नौकानयनाची सुविधा होईल. जेणेकरुन लोक तेथे फिरण्यासाठी जातील, अशी अपेक्षा रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर यांनी व्यक्त केली. अहमदनगर शहर स्थापना दिनानिमित्त ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.ते म्हणाले,  शहराच्या एका वर्धापनदिनी आम्ही भिस्तबाग महालावर विद्युत रोषणाई केली होती. त्यावेळी ही वास्तू इतकी अप्रतिम दिसत होती की ते चित्र पाहून नगरकर आचंबित झाले. सर्व ऐतिहासिक वास्तूंचे आपण असे जतन केले व कल्पकता वापरुन त्यांचा विकास केला तर पर्यटक नगरला गर्दी करतील. भुईकोट किल्ला पाहण्यासाठी दूरवरून लोक येऊ शकतात. तेथे वीज, पाणी यांचा वापर करुन रात्री काही सांस्कृतिक ‘शो’ सुरु करता येऊ शकतो. या किल्ल्याभोवती मोठे खंदक आहेत त्याचाही अप्रतिम वापर करुन घेता येईल. पर्यटनस्थळे विकसित झाली की आपोआप छोटे-मोठे व्यवसाय, हॉटेल, रिक्षा, ट्रॅव्हल एजन्सी यांना रोजगार मिळेल. आपण गावातील रस्ते चांगले केले व पर्यटनस्थळे विकसित केली तरी शहर कितीतरी बदलेल. हे काम फार अवडघ नव्हे. केवळ इच्छाशक्ती हवी आहे. या वर्षभराचा अजेंडा ठरविण्यासाठी ‘लोकमत’ने खूप चांगला उपक्रम हाती घेतला आहे. भाराभर अपेक्षा नोंदवून उपयोग नाही. माझ्या मते पर्यटनाचा आराखडा आपण निर्माण केला व वाडिया पार्कचा गुंता सोडविला तरी दोन मोठे प्रश्न मार्गी लागतील. नगरची पर्यटन स्थळे विकसित केल्यास शिर्डी, शिंगणापूरला जाणारे पर्यटक नगरमध्ये थांबतील. त्यातून अर्थचक्र फिरु शकेल, असेही ते म्हणाले.    अहमदनगर शहराच्या विकासाबाबत आजवर चर्चाच खूप झाली. आता ठोस कृती कार्यक्रम हवा आहे. या वर्षात  किमान नगरच्या पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी लोकप्रतिनिधी व सरकारने कृती आराखडा ठरविला तरीही विकासाच्यादृष्टीने मोठे पाउल पडेल. हे वर्ष पर्यटनस्थळांच्या विकासाभोवती केंद्रित केले जावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.