शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
2
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
3
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
4
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
5
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
6
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
8
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
10
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
11
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
12
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
13
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
14
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
15
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
16
एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या
17
बाथरुममधील बादली खूपच खराब झालीय? एकही रुपया खर्च न करता 'अशी' दिसेल नव्यासारखी
18
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
19
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
20
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी

लोकमत मुलाखत : कौशल्य विकासाच्या दृष्टीने आयटीआयमध्ये संधी-चंद्रकांत भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 13:40 IST

दहावीनंतर विद्यार्थ्यांनी औद्योगिक प्रशिक्षणाकडे वळावअहमदनगर : पारंपरिक शिक्षणातून रोजगाराचे साधन मिळण्यात सध्या मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे रोजगाराभिमुख किंवा कौशल्यावर आधारित शिक्षणासाठी दहावीनंतर विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये मोठ्या संधी आहेत, अशी माहिती राहुरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (आयटीआय)  प्राचार्य चंद्रकांत भोसले यांनी दिली.

चंद्रकांत शेळके

------------

अहमदनगर : पारंपरिक शिक्षणातून रोजगाराचे साधन मिळण्यात सध्या मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे रोजगाराभिमुख किंवा कौशल्यावर आधारित शिक्षणासाठी दहावीनंतर विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये मोठ्या संधी आहेत, अशी माहिती राहुरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (आयटीआय)  प्राचार्य चंद्रकांत भोसले यांनी दिली.

आज प्रत्येक ठिकाणी कुशलतेने काम करणाºया अर्थात कौशल्यनिपुण कारागिरांची गरज आहे. हे कौशल्य आपल्या देशातील आयटीआयमधून प्राप्त होते. शिक्षणातून नोकरी व उद्योजकता वाढीस लागणे हे शिक्षणाचे खरे यश असते. बदलत्या काळात फक्त पारंपरिक शिक्षण हे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व त्यांचे भावी जीवन सुकर करण्यास उपयोगी पडणार नाही. त्यामुळेच कौशल्यावर आधारित शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. नियमित अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांनी वेगवेगळी कौशल्ये आत्मसात करण्याची खरी गरज आहे.

महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात औद्योगिक प्रशिक्षणाला महत्व आले आहे. जागतिकीकरण आणि संगणकीकरणामुळे तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. मानवी व्यवहारात सुद्धा आमूलाग्र बदल होत आहेत. हे बदल आत्मसात करून भावी पिढी घडविण्याचे काम औद्योगिक प्रशिक्षण संस्था करीत आहेत. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे केवळ आपल्या देशातच नव्हे तर जगभरात विविध स्वरूपातील तंत्रज्ञानाची मोठ्या प्रमाणात गरज आहे. प्रशिक्षित कुशल मनुष्य बळाचा अभाव सर्वत्र जाणवत आहे.  हा अभाव भरून काढण्यासाठी महाराष्ट्रातील  ४१७ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (सरकारी आयटीआय)  तसेच ५३८ खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत. यामधून दरवर्षी पन्नास हजारपेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेश घेतात.  

महाराष्ट्रातील एकूण ९५५ आयटीआयमध्ये ७९ प्रकारच्या व्यवसाय अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते. यात अभियांत्रिकी गटातील ५५ व्यवसाय असून बिगर अभियांत्रिकी गटातील २४ व्यवसाय आहेत. यातील ६८ व्यवसायासाठी दहावी उत्तीर्ण ही शैक्षणिक अर्हता;  तसेच ११ व्यवसाय अभ्यासक्रमासाठी दहावी अनुत्तीर्ण ही शैक्षणिक अर्हता निश्चित करण्यात आली आहे.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारास राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र दिले जाते. सदर प्रमाणपत्रास आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता आहे, असे भोसले यांनी सांगितले.

डी.एड., बी.एड.धारकांचाही आयटीआयकडे कलअलिकडच्या आठ ते दहा वर्षात डी.एड., बी.एड. असलेले किंवा विविध प्रकारचे उच्च शिक्षण घेतलेले उमेदवार आयटीआय प्रवेशासाठी अर्ज करतात. काहींना प्रवेश मिळतो. काहींना दहावीत कमी गुण असल्याने प्रवेश मिळू शकत नाही. मात्र ही आजच्या उच्च शिक्षणाची शोकांतिका आहे. म्हणून या घडीला तरी आयटीआय रोजगार किंवा स्वयंरोजगारासाठी समर्थ पर्याय आहे, असे भोसले यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरinterviewमुलाखत