शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

लोकमत मुलाखत : कौशल्य विकासाच्या दृष्टीने आयटीआयमध्ये संधी-चंद्रकांत भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 13:40 IST

दहावीनंतर विद्यार्थ्यांनी औद्योगिक प्रशिक्षणाकडे वळावअहमदनगर : पारंपरिक शिक्षणातून रोजगाराचे साधन मिळण्यात सध्या मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे रोजगाराभिमुख किंवा कौशल्यावर आधारित शिक्षणासाठी दहावीनंतर विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये मोठ्या संधी आहेत, अशी माहिती राहुरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (आयटीआय)  प्राचार्य चंद्रकांत भोसले यांनी दिली.

चंद्रकांत शेळके

------------

अहमदनगर : पारंपरिक शिक्षणातून रोजगाराचे साधन मिळण्यात सध्या मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे रोजगाराभिमुख किंवा कौशल्यावर आधारित शिक्षणासाठी दहावीनंतर विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये मोठ्या संधी आहेत, अशी माहिती राहुरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (आयटीआय)  प्राचार्य चंद्रकांत भोसले यांनी दिली.

आज प्रत्येक ठिकाणी कुशलतेने काम करणाºया अर्थात कौशल्यनिपुण कारागिरांची गरज आहे. हे कौशल्य आपल्या देशातील आयटीआयमधून प्राप्त होते. शिक्षणातून नोकरी व उद्योजकता वाढीस लागणे हे शिक्षणाचे खरे यश असते. बदलत्या काळात फक्त पारंपरिक शिक्षण हे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व त्यांचे भावी जीवन सुकर करण्यास उपयोगी पडणार नाही. त्यामुळेच कौशल्यावर आधारित शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. नियमित अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांनी वेगवेगळी कौशल्ये आत्मसात करण्याची खरी गरज आहे.

महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात औद्योगिक प्रशिक्षणाला महत्व आले आहे. जागतिकीकरण आणि संगणकीकरणामुळे तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. मानवी व्यवहारात सुद्धा आमूलाग्र बदल होत आहेत. हे बदल आत्मसात करून भावी पिढी घडविण्याचे काम औद्योगिक प्रशिक्षण संस्था करीत आहेत. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे केवळ आपल्या देशातच नव्हे तर जगभरात विविध स्वरूपातील तंत्रज्ञानाची मोठ्या प्रमाणात गरज आहे. प्रशिक्षित कुशल मनुष्य बळाचा अभाव सर्वत्र जाणवत आहे.  हा अभाव भरून काढण्यासाठी महाराष्ट्रातील  ४१७ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (सरकारी आयटीआय)  तसेच ५३८ खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत. यामधून दरवर्षी पन्नास हजारपेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेश घेतात.  

महाराष्ट्रातील एकूण ९५५ आयटीआयमध्ये ७९ प्रकारच्या व्यवसाय अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते. यात अभियांत्रिकी गटातील ५५ व्यवसाय असून बिगर अभियांत्रिकी गटातील २४ व्यवसाय आहेत. यातील ६८ व्यवसायासाठी दहावी उत्तीर्ण ही शैक्षणिक अर्हता;  तसेच ११ व्यवसाय अभ्यासक्रमासाठी दहावी अनुत्तीर्ण ही शैक्षणिक अर्हता निश्चित करण्यात आली आहे.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारास राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र दिले जाते. सदर प्रमाणपत्रास आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता आहे, असे भोसले यांनी सांगितले.

डी.एड., बी.एड.धारकांचाही आयटीआयकडे कलअलिकडच्या आठ ते दहा वर्षात डी.एड., बी.एड. असलेले किंवा विविध प्रकारचे उच्च शिक्षण घेतलेले उमेदवार आयटीआय प्रवेशासाठी अर्ज करतात. काहींना प्रवेश मिळतो. काहींना दहावीत कमी गुण असल्याने प्रवेश मिळू शकत नाही. मात्र ही आजच्या उच्च शिक्षणाची शोकांतिका आहे. म्हणून या घडीला तरी आयटीआय रोजगार किंवा स्वयंरोजगारासाठी समर्थ पर्याय आहे, असे भोसले यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरinterviewमुलाखत