शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
4
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
5
धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
6
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
7
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
8
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
9
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
10
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
11
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
12
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
13
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
14
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
15
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
16
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
17
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
18
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार
19
"माझ्यासाठीच नाही, तर १४० कोटी भारतीयांसाठीही..."; ब्राझीलचा सर्वोच्च सन्मान मिळाल्यावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
20
अरे देवा! ज्या सावत्र आईचा आशीर्वाद घ्यायचा, तिच्यासोबत पळाला अल्पवयीन मुलगा; केलं लग्न

लोकमत मुलाखत : कौशल्य विकासाच्या दृष्टीने आयटीआयमध्ये संधी-चंद्रकांत भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 13:40 IST

दहावीनंतर विद्यार्थ्यांनी औद्योगिक प्रशिक्षणाकडे वळावअहमदनगर : पारंपरिक शिक्षणातून रोजगाराचे साधन मिळण्यात सध्या मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे रोजगाराभिमुख किंवा कौशल्यावर आधारित शिक्षणासाठी दहावीनंतर विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये मोठ्या संधी आहेत, अशी माहिती राहुरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (आयटीआय)  प्राचार्य चंद्रकांत भोसले यांनी दिली.

चंद्रकांत शेळके

------------

अहमदनगर : पारंपरिक शिक्षणातून रोजगाराचे साधन मिळण्यात सध्या मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे रोजगाराभिमुख किंवा कौशल्यावर आधारित शिक्षणासाठी दहावीनंतर विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये मोठ्या संधी आहेत, अशी माहिती राहुरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (आयटीआय)  प्राचार्य चंद्रकांत भोसले यांनी दिली.

आज प्रत्येक ठिकाणी कुशलतेने काम करणाºया अर्थात कौशल्यनिपुण कारागिरांची गरज आहे. हे कौशल्य आपल्या देशातील आयटीआयमधून प्राप्त होते. शिक्षणातून नोकरी व उद्योजकता वाढीस लागणे हे शिक्षणाचे खरे यश असते. बदलत्या काळात फक्त पारंपरिक शिक्षण हे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व त्यांचे भावी जीवन सुकर करण्यास उपयोगी पडणार नाही. त्यामुळेच कौशल्यावर आधारित शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. नियमित अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांनी वेगवेगळी कौशल्ये आत्मसात करण्याची खरी गरज आहे.

महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात औद्योगिक प्रशिक्षणाला महत्व आले आहे. जागतिकीकरण आणि संगणकीकरणामुळे तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. मानवी व्यवहारात सुद्धा आमूलाग्र बदल होत आहेत. हे बदल आत्मसात करून भावी पिढी घडविण्याचे काम औद्योगिक प्रशिक्षण संस्था करीत आहेत. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे केवळ आपल्या देशातच नव्हे तर जगभरात विविध स्वरूपातील तंत्रज्ञानाची मोठ्या प्रमाणात गरज आहे. प्रशिक्षित कुशल मनुष्य बळाचा अभाव सर्वत्र जाणवत आहे.  हा अभाव भरून काढण्यासाठी महाराष्ट्रातील  ४१७ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (सरकारी आयटीआय)  तसेच ५३८ खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत. यामधून दरवर्षी पन्नास हजारपेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेश घेतात.  

महाराष्ट्रातील एकूण ९५५ आयटीआयमध्ये ७९ प्रकारच्या व्यवसाय अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते. यात अभियांत्रिकी गटातील ५५ व्यवसाय असून बिगर अभियांत्रिकी गटातील २४ व्यवसाय आहेत. यातील ६८ व्यवसायासाठी दहावी उत्तीर्ण ही शैक्षणिक अर्हता;  तसेच ११ व्यवसाय अभ्यासक्रमासाठी दहावी अनुत्तीर्ण ही शैक्षणिक अर्हता निश्चित करण्यात आली आहे.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारास राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र दिले जाते. सदर प्रमाणपत्रास आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता आहे, असे भोसले यांनी सांगितले.

डी.एड., बी.एड.धारकांचाही आयटीआयकडे कलअलिकडच्या आठ ते दहा वर्षात डी.एड., बी.एड. असलेले किंवा विविध प्रकारचे उच्च शिक्षण घेतलेले उमेदवार आयटीआय प्रवेशासाठी अर्ज करतात. काहींना प्रवेश मिळतो. काहींना दहावीत कमी गुण असल्याने प्रवेश मिळू शकत नाही. मात्र ही आजच्या उच्च शिक्षणाची शोकांतिका आहे. म्हणून या घडीला तरी आयटीआय रोजगार किंवा स्वयंरोजगारासाठी समर्थ पर्याय आहे, असे भोसले यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरinterviewमुलाखत