शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

स्थानिकसह आंतरराष्ट्रीय प्रश्नांची जाण असणारा उमेदवार हवा : लोकमत अहमदनगर लाइव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 18:36 IST

लोकशाहीला बळकटी येण्यासाठी चांगल्या उमेदवाराला मतदान करणे महत्वाचे आहे. संसदेमध्ये जाणा-या प्रतिनिधीला देशाचे तसेच आंतरराष्ट्रीय प्रश्न समजले पाहिजेत.

अहमदनगर : लोकशाहीला बळकटी येण्यासाठी चांगल्या उमेदवाराला मतदान करणे महत्वाचे आहे. संसदेमध्ये जाणा-या प्रतिनिधीला देशाचे तसेच आंतरराष्ट्रीय प्रश्न समजले पाहिजेत. त्याचबरोबर स्थानिक प्रश्नांचीही त्यास जाण असावी, असे मत ‘लोकमत’ अहमदनगर फेसबुक पेजवरील चर्चेदरम्यान तरुणांनी मांडले. चर्चासत्रामध्ये संज्ञापन अभ्यास विभागाचे विभागप्रमुख डॉ.बापू चंदनशिवे, डॉ.बाळासाहेब पवार, प्रशांत शिंदे, अमोल सुरनरकर, मोनाली धोंडे, सुधीर पाटील सहभागी झाले होते.(व्हिडिओ पाहण्यासाठी https://m.facebook.com/story.php?story_fbid=341808429805612&id=541922295950969 येथे भेट द्या)डॉ. बापू चंदनशिवे म्हणाले, लोकशाहीचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे निवडणुका. लोकशाही निवडणुकांमधून दिसून येते. अजूनही लोकशाही तळागाळात पोहचलेली दिसून येत नाही. लोकशाही समजण्यासाठी निवडणुका महत्वाच्या आहेत. लोकशाही टिकवणे आणि समृध्द करणे मतदाराचे कर्तव्य आहे. त्याकरीता चांगल्या उमेदवाराला मतदान करावे. केवळ पैशाच्या आधारे, जातीच्या आधारे मत मागणा-या उमेदवाराला मतदान करू नये.प्रा. बाळासाहेब पवार म्हणाले, नागरिकांमध्ये निवडणुकीकडे पाहण्याचा दृष्टीकोन चुकीचा आहे. फक्त सत्ता बदलणे एवढाच लोकशाहीचा उद्देश नाही. देश बळकट करण्याची ही प्रक्रिया नाही. देशाच्या प्रश्नावर सर्वांनी एकत्र चर्चा करावी. सध्या अगोदरच पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केला जात आहे. हे चुकीचे आहे. संसदीय लोकशाहीला हे घातक आहे. समाजमाध्यमांच्या हातात निवडणुक आलेली आहे. पक्ष जरी वाढले असले तरी लोकशाही यामाध्यमातून बळकट होत आहे. सरकार तरुण, शेतीच्या प्रश्नांकडे पक्ष गांभीर्याने पाहात नाही. राष्ट्रवादही निर्माण केला जात आहे. स्थानिक प्रश्नावर, देशाअंतर्र्गंंत प्रश्नांवर निवडणूक केंद्रित झाली पाहिजे.(व्हिडिओ पाहण्यासाठी https://m.facebook.com/story.php?story_fbid=341808429805612&id=541922295950969 येथे भेट द्या)येथील दोन्हीही उमेदवार तरुण आहेत पण दोघेही प्रस्थापित आहेत. शेतक-यांचे प्रश्न मांडणा-या तरुणांना संधी मिळत नाही. शहराचा विकासच झाला नाही. ग्रामीण भागातील समस्या मोठ्या आहेत. दक्षिण नगर पुर्णत दुष्काळी आहे. तरुण मतदानासाठी उतरल्यानंतर आपला प्रश्न कोण सोडवू शकतो त्यालाच मत देतील. धार्मिक किंवा इतर बाबींचा नक्कीच विचार करणार नाही. मतदान करताना ठराविक पक्षाचा विचार आम्ही करत नाही. उमेदवार चांगला निवडणे गरजेचे आहे. त्यासाठी चौकस विचार करून उमेदवार निवडण्याची गरज आहे. सुशिक्षित आणि हुशार, आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रश्न मांडणारा असावा. निवडणुकीत महिलांना फार कमी संधी मिळते. महिलांच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. उमेदवाराने दिलेली आश्वासने पाळावीत. जो आपले प्रश्न सोडवेल त्यालाच निवडूण द्यावे. अहमदनगरमध्ये एमआयडीसीचा मोठा प्रश्न आहे. शैक्षणिक वातावरणही आणखी प्रगल्भ करता येईल. स्पर्धा परिक्षेसाठी चांगली मार्गदर्शन केंद्र नाहीत. स्थानिक पातळीवर या सर्व सुविधा निर्माण करणारा उमेदवार निवडणे गरजेचे आहे. जाहीरनाम्यामध्ये नेमके काय केले आहे. त्याचाही तरुणांनी अभ्यास करावा. राजकिय पक्ष तरुणांचा वापर करून घेताहेत हे जरी खरे असले तरी ही संख्या खूप कमी आहे. तरुण दिवसेंदिवेस हुशार होत आहेत. राष्ट्रवाद, जातीयवाद या मुद्द्याच्या पलीकडे निवडणूक गेली पाहिजे. प्रस्थापितांना उमेदवारी दिली तरी आपल्याकडे नोटाचा पर्याय आहे. आपण आपला हक्क वापरून मागण्या दाखवून दिल्या पाहिजे. समाजाला पोषण असणा-या पक्षाला, उमेदवाराला मतदान करावे. त्यानंतर देशाचे भविष्य उज्ज्वल राहिल.(व्हिडिओ पाहण्यासाठी https://m.facebook.com/story.php?story_fbid=341808429805612&id=541922295950969 येथे भेट द्या)

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ahmednagar-pcअहमदनगर