शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
2
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
3
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
4
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
5
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
6
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
7
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
8
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
9
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
10
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
11
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
12
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
13
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
14
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
15
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
16
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
17
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
18
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
19
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
20
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान

स्थानिकसह आंतरराष्ट्रीय प्रश्नांची जाण असणारा उमेदवार हवा : लोकमत अहमदनगर लाइव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 18:36 IST

लोकशाहीला बळकटी येण्यासाठी चांगल्या उमेदवाराला मतदान करणे महत्वाचे आहे. संसदेमध्ये जाणा-या प्रतिनिधीला देशाचे तसेच आंतरराष्ट्रीय प्रश्न समजले पाहिजेत.

अहमदनगर : लोकशाहीला बळकटी येण्यासाठी चांगल्या उमेदवाराला मतदान करणे महत्वाचे आहे. संसदेमध्ये जाणा-या प्रतिनिधीला देशाचे तसेच आंतरराष्ट्रीय प्रश्न समजले पाहिजेत. त्याचबरोबर स्थानिक प्रश्नांचीही त्यास जाण असावी, असे मत ‘लोकमत’ अहमदनगर फेसबुक पेजवरील चर्चेदरम्यान तरुणांनी मांडले. चर्चासत्रामध्ये संज्ञापन अभ्यास विभागाचे विभागप्रमुख डॉ.बापू चंदनशिवे, डॉ.बाळासाहेब पवार, प्रशांत शिंदे, अमोल सुरनरकर, मोनाली धोंडे, सुधीर पाटील सहभागी झाले होते.(व्हिडिओ पाहण्यासाठी https://m.facebook.com/story.php?story_fbid=341808429805612&id=541922295950969 येथे भेट द्या)डॉ. बापू चंदनशिवे म्हणाले, लोकशाहीचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे निवडणुका. लोकशाही निवडणुकांमधून दिसून येते. अजूनही लोकशाही तळागाळात पोहचलेली दिसून येत नाही. लोकशाही समजण्यासाठी निवडणुका महत्वाच्या आहेत. लोकशाही टिकवणे आणि समृध्द करणे मतदाराचे कर्तव्य आहे. त्याकरीता चांगल्या उमेदवाराला मतदान करावे. केवळ पैशाच्या आधारे, जातीच्या आधारे मत मागणा-या उमेदवाराला मतदान करू नये.प्रा. बाळासाहेब पवार म्हणाले, नागरिकांमध्ये निवडणुकीकडे पाहण्याचा दृष्टीकोन चुकीचा आहे. फक्त सत्ता बदलणे एवढाच लोकशाहीचा उद्देश नाही. देश बळकट करण्याची ही प्रक्रिया नाही. देशाच्या प्रश्नावर सर्वांनी एकत्र चर्चा करावी. सध्या अगोदरच पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केला जात आहे. हे चुकीचे आहे. संसदीय लोकशाहीला हे घातक आहे. समाजमाध्यमांच्या हातात निवडणुक आलेली आहे. पक्ष जरी वाढले असले तरी लोकशाही यामाध्यमातून बळकट होत आहे. सरकार तरुण, शेतीच्या प्रश्नांकडे पक्ष गांभीर्याने पाहात नाही. राष्ट्रवादही निर्माण केला जात आहे. स्थानिक प्रश्नावर, देशाअंतर्र्गंंत प्रश्नांवर निवडणूक केंद्रित झाली पाहिजे.(व्हिडिओ पाहण्यासाठी https://m.facebook.com/story.php?story_fbid=341808429805612&id=541922295950969 येथे भेट द्या)येथील दोन्हीही उमेदवार तरुण आहेत पण दोघेही प्रस्थापित आहेत. शेतक-यांचे प्रश्न मांडणा-या तरुणांना संधी मिळत नाही. शहराचा विकासच झाला नाही. ग्रामीण भागातील समस्या मोठ्या आहेत. दक्षिण नगर पुर्णत दुष्काळी आहे. तरुण मतदानासाठी उतरल्यानंतर आपला प्रश्न कोण सोडवू शकतो त्यालाच मत देतील. धार्मिक किंवा इतर बाबींचा नक्कीच विचार करणार नाही. मतदान करताना ठराविक पक्षाचा विचार आम्ही करत नाही. उमेदवार चांगला निवडणे गरजेचे आहे. त्यासाठी चौकस विचार करून उमेदवार निवडण्याची गरज आहे. सुशिक्षित आणि हुशार, आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रश्न मांडणारा असावा. निवडणुकीत महिलांना फार कमी संधी मिळते. महिलांच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. उमेदवाराने दिलेली आश्वासने पाळावीत. जो आपले प्रश्न सोडवेल त्यालाच निवडूण द्यावे. अहमदनगरमध्ये एमआयडीसीचा मोठा प्रश्न आहे. शैक्षणिक वातावरणही आणखी प्रगल्भ करता येईल. स्पर्धा परिक्षेसाठी चांगली मार्गदर्शन केंद्र नाहीत. स्थानिक पातळीवर या सर्व सुविधा निर्माण करणारा उमेदवार निवडणे गरजेचे आहे. जाहीरनाम्यामध्ये नेमके काय केले आहे. त्याचाही तरुणांनी अभ्यास करावा. राजकिय पक्ष तरुणांचा वापर करून घेताहेत हे जरी खरे असले तरी ही संख्या खूप कमी आहे. तरुण दिवसेंदिवेस हुशार होत आहेत. राष्ट्रवाद, जातीयवाद या मुद्द्याच्या पलीकडे निवडणूक गेली पाहिजे. प्रस्थापितांना उमेदवारी दिली तरी आपल्याकडे नोटाचा पर्याय आहे. आपण आपला हक्क वापरून मागण्या दाखवून दिल्या पाहिजे. समाजाला पोषण असणा-या पक्षाला, उमेदवाराला मतदान करावे. त्यानंतर देशाचे भविष्य उज्ज्वल राहिल.(व्हिडिओ पाहण्यासाठी https://m.facebook.com/story.php?story_fbid=341808429805612&id=541922295950969 येथे भेट द्या)

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ahmednagar-pcअहमदनगर