शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

अफवांकडे दुर्लक्ष करा, लोकसभेची नगरची जागा राष्ट्रवादी सोडणार नाही : अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 15:00 IST

नगर जिल्ह्याच्या राजकारणात अफवांचे पिक सुरू झाले आहे. पण काहीही झाले तरी नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नाही आणि श्रीगोंद्यात आमदार राहूल जगताप हेच उमेदवार राहतील, असा ठाम विश्वास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

श्रीगोंदा : नगर जिल्ह्याच्या राजकारणात अफवांचे पिक सुरू झाले आहे. पण काहीही झाले तरी नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नाही आणि श्रीगोंद्यात आमदार राहूल जगताप हेच उमेदवार राहतील, असा ठाम विश्वास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.श्रीगोंदा येथे हल्लाबोल आंदोलनाप्रसंगी संत शेख महमंद महाराज मंदीर मैदानात आयोजित सभेत पवार बोलत होते़ अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे होते.

पवार म्हणाले, गेल्या विधानसभा निवडणुकीत आम्ही बारामतीची जागा गेली तरी चालेल पण श्रीगोंद्याची जागा राष्ट्रवादीकडे कशी राहील यासाठी युव्हरचना आखली होती. शिवाजीराव नागवडे, अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नाहाटा, तुकाराम दरेकर यांनी सहकार्य केले. आता राहूल जगताप हेच पुढील विधानसभेचे उमेदवार असतील. आम्ही ज्यांना पालकमंत्री व प्रदेशाध्यक्ष केले, ते तिकडे गेले. त्यांची सध्या काय अवस्था झाली आहे. राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप, संग्राम जगताप, वैभव पिचड यांनी कर्जमाफीच्या मुद्यावर सरकारला धारेवर धरले. त्यांना निलंबित केले. सरकारने ३४ लाख कोटीची ८९ लाख शेतक-यांना कर्जमाफी केल्याची घोषणा केली आहे. पण प्रत्यक्षात कुणाच्या खात्यावर पैसे जमा झाले. मग परराज्यातील शेतक-यांना कर्जमाफी केली, का असा सवाल पवार यांनी केला.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा. सुप्रिया सुळे, आ. राहूल जगताप, तुकाराम दरेकर यांची भाषणे झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आ. संग्राम जगताप, चित्रा वाघ, चंद्रशेखर घुले, दादाभाऊ कळमकर, भगवानराव पाचपुते आदी उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAjit Pawarअजित पवारShrigondaश्रीगोंदा