शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अफवांकडे दुर्लक्ष करा, लोकसभेची नगरची जागा राष्ट्रवादी सोडणार नाही : अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 15:00 IST

नगर जिल्ह्याच्या राजकारणात अफवांचे पिक सुरू झाले आहे. पण काहीही झाले तरी नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नाही आणि श्रीगोंद्यात आमदार राहूल जगताप हेच उमेदवार राहतील, असा ठाम विश्वास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

श्रीगोंदा : नगर जिल्ह्याच्या राजकारणात अफवांचे पिक सुरू झाले आहे. पण काहीही झाले तरी नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नाही आणि श्रीगोंद्यात आमदार राहूल जगताप हेच उमेदवार राहतील, असा ठाम विश्वास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.श्रीगोंदा येथे हल्लाबोल आंदोलनाप्रसंगी संत शेख महमंद महाराज मंदीर मैदानात आयोजित सभेत पवार बोलत होते़ अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे होते.

पवार म्हणाले, गेल्या विधानसभा निवडणुकीत आम्ही बारामतीची जागा गेली तरी चालेल पण श्रीगोंद्याची जागा राष्ट्रवादीकडे कशी राहील यासाठी युव्हरचना आखली होती. शिवाजीराव नागवडे, अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नाहाटा, तुकाराम दरेकर यांनी सहकार्य केले. आता राहूल जगताप हेच पुढील विधानसभेचे उमेदवार असतील. आम्ही ज्यांना पालकमंत्री व प्रदेशाध्यक्ष केले, ते तिकडे गेले. त्यांची सध्या काय अवस्था झाली आहे. राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप, संग्राम जगताप, वैभव पिचड यांनी कर्जमाफीच्या मुद्यावर सरकारला धारेवर धरले. त्यांना निलंबित केले. सरकारने ३४ लाख कोटीची ८९ लाख शेतक-यांना कर्जमाफी केल्याची घोषणा केली आहे. पण प्रत्यक्षात कुणाच्या खात्यावर पैसे जमा झाले. मग परराज्यातील शेतक-यांना कर्जमाफी केली, का असा सवाल पवार यांनी केला.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा. सुप्रिया सुळे, आ. राहूल जगताप, तुकाराम दरेकर यांची भाषणे झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आ. संग्राम जगताप, चित्रा वाघ, चंद्रशेखर घुले, दादाभाऊ कळमकर, भगवानराव पाचपुते आदी उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAjit Pawarअजित पवारShrigondaश्रीगोंदा