शहरं
Join us  
Trending Stories
1
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
2
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
3
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
4
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
5
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
6
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
7
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
8
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
9
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
10
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
11
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
12
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
13
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
14
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
15
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
16
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
17
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
18
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
19
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
20
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   

Lok Sabha Election 2019 : दहशतीमुळे औद्योगिक विकास खुंटला : सुजय विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 11:47 IST

दहशतीमुळे अहमदनगरच्या औद्योगिक वसाहतीतील कारखाने दुसऱ्या जिल्ह्यात निघून गेले़ त्यामुळे अनेक कामगार देशोधडीला लागले.

अहमदनगर : दहशतीमुळे अहमदनगरच्या औद्योगिक वसाहतीतील कारखाने दुसऱ्या जिल्ह्यात निघून गेले़ त्यामुळे अनेक कामगार देशोधडीला लागले. औद्योगिक वसाहतीचा उपयोग राजकारणासाठी केला गेल्याची टीका महायुतीचे उमेदवार डॉ़ सुजय विखे यांनी नगर तालुक्यातील दौऱ्यात केली़ तसेच या औद्योगिक वसाहतीला गतवैभव प्राप्त करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले़लोकसभा निवडणूक प्रचारार्थ नगर तालुक्यातील जखणगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते़ यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, पंचायत समिती सदस्य रामदास भोर, बाळासाहेब हराळ, अरूण होळकर आदी उपस्थित होते. विरोधकांवर तोफ डागताना विखे म्हणाले, अहमदनगर औद्योगिक वसाहतीला उच्च दर्जा प्राप्त झाला होता. नगरच्या औद्योगिक वसाहतीत मोठे कारखाने सुरू होते़ मात्र स्थानिक नेत्यांनी युनियनच्या नावाखाली दहशत निर्माण केली़ त्यामुळे त्रस्त उद्योजक कारखाने बंद करून निघून गेले़ पुरेशा पायाभूत सुविधा असताना येथील वसाहत ओस पडली़ परिणामी तरुणांच्या हाताला काम राहिले नाही़ विरोधकांनी यासंदर्भात शासन दरबारी आवाज उठविला नाही़ त्यामुळेच नगरचा औद्योगिक विकास खुंटल्याचे विखे म्हणाले़जिल्ह्यातील विविध शिक्षण संस्थांमध्ये युवक उच्च शिक्षण घेत आहेत़ परंतु, त्यांना जिल्ह्यात रोजगार मिळत नाही़ त्यामुळे त्यांना नोकरीसाठी शेजारच्या जिल्ह्यात जावे लागते़ शिक्षण पूर्ण केलेले हजारो विद्यार्थी दरवर्षी नोकरीसाठी पुणे, मुंबईत दाखल होत आहेत़ पण, यापुढे तरुणांना नोकरीसाठी परजिल्ह्यात जाण्याची आवश्यकता पडणार नाही़ या जिल्ह्याच्या औद्योगिक वसाहतीचा आराखडा तयार करून औद्योगिक वसाहतीचा दर्जा उंचावणार असल्याचे विखे यांनी यावेळी सांगितले़ नगर तालुक्यातील निमगाव वाघा, नेप्ती, हमीदपूर, जखणगाव, हिंगणगाव, पिंपळगाव वाघा आदी भागातील मतदारांशी विखे यांनी संवाद साधला़ यावेळी विजय औटी यांच्यासह कार्यकर्त्यांची भाषणे झाली़

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ahmednagar-pcअहमदनगर