शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

गाढवांचा बंदोबस्त न केल्यामुळे कोल्हार येथील तलाठी कार्यालयाला ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 16:55 IST

मोर्चा काढूनही गाढवांचा बंदोबस्त न केल्याने कोल्हार खुर्द येथील शेतकरी संतप्त झाले़ संतप्त शेतक-यांनी तलाठी कार्यालयाला कुलूप ठोकले. येत्या पाच दिवसात शेतमालाचे नुकसान करणा-या गाढवांचा बंदोबस्त न केल्यास रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

राहुरी : मोर्चा काढूनही गाढवांचा बंदोबस्त न केल्याने कोल्हार खुर्द येथील शेतकरी संतप्त झाले. संतप्त शेतक-यांनी तलाठी कार्यालयाला कुलूप ठोकले. येत्या पाच दिवसात शेतमालाचे नुकसान करणा-या गाढवांचा बंदोबस्त न केल्यास नगर-मनमाड राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.गेल्या आठवड्यात गावक-यांनी गाढवांच्या बंदोबस्तासाठी मोर्चा काढला होता. राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे व मंडल अधिका-यांना लेखी निवेदनही दिले होते. शेतक-यांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये म्हणून बंदोबस्त करू, अशी ग्वाही महसूल विभागाने दिली होती. मात्र, गाढवांचा बंदोबस्त न केल्यामुळे ही गाढवे शेतक-यांच्या शेतामध्ये चरत आहेत. त्यामुळे शेतक-यांनी कामगार तलाठी कार्यालयाला कुलूप ठोकले.वाळूचा व्यवसाय करणारे वाळू वाहून झाल्यानंतर गाढवांना मोकाट सोडून देत आहेत. कोल्हार परिसरात असलेले ऊस, चारा व भाजीपाला पिकात शिरून गाढवांचा कळप शेतीची नासधूस करीत आहे. गाढवांच्या माध्यमातून वाळूचा उपसा होत असताना महसूल प्रशासन कारवाई का करीत नाही, असा सवाल शेतक-यांनी केला. काही गाढवे शेतकरी शरद शिरसाट यांनी शेतात पकडून ठेवली. शेतात गाढवांनी केलेले नुकसान पाहण्यासाठी कामगार तलाठी हरिश्चंद्रे मुठे यांनी यावे, अशी मागणी केली. मात्र, त्याला कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शेतक-यांनी तलाठी कार्यालयास कुलूप ठोकले. यावेळी सरपंच प्रकाश पाटील, सुरेश जाधव, श्रीधर शिरसाट, शरद शिरसाट, राजेंद्र भालेराव, गणेश राऊत, प्रभाकर शिरसाट, गणेश डोके, सचिन शिरसाट, नाना चिखले आदी शेतकरी उपस्थित होते.

कोल्हार खुर्द परिसरात गाढवांचा उपद्रव वाढला आहे. ५० गाढवं वारंवार शेतात शिरून पिकांची नासधूस करतात. महसूल विभागाकडे यासंदर्भात वारंवार तक्रार करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात गाढवांचा बंदोबस्त करू, असे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे. दखल न घेतल्यास रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल.-प्रकाश पाटील, सरपंच, कोल्हार खुर्द 

गाढवांच्या मालकांना नोटीस काढण्यात आली आहे़ आम्ही व्यवसाय करणार नाही, असे लिहून घेण्यात आले आहे. यासंदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात गाढवांचा बंदोबस्त करण्यात येईल. यापुढे शेतक-यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी महसूल विभाग घेईल.-अनिल दौंडे, तहसीलदार, राहुरी

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी