शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

लॉकडाऊनचे नियम शिथिल करावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:16 IST

श्रीरामपूर : महाराष्ट्र शासनाने राज्यातील कोरोना लॉकडाऊन नियम शिथिल करताना व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम होणार नाही, या दृष्टीने लॉकडाऊन नियम ...

श्रीरामपूर : महाराष्ट्र शासनाने राज्यातील कोरोना लॉकडाऊन नियम शिथिल करताना व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम होणार नाही, या दृष्टीने लॉकडाऊन नियम शिथिल करावेत, अशी व्यापाऱ्यांकडून मागणी होत आहे.

शासनाने नुकतेच लॉकडाऊन शिथिल करून २८ जूनपासून सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. दुकान उघडण्याची वेळ बाजारपेठेच्या व व्यापाऱ्यांच्या दृष्टीने गैरसोयीची आहे. सकाळी ७ वा. व्यापाऱ्यांना दुकाने उघडणे शक्य नाही. ९ नंतर ग्राहक खरेदीसाठी घरातून बाहेर पडतात. तर ग्रामीण भागातील छोटेमोठे दुकानदार हे दुकाने सुरू करून घरातील व शेतीतील कामाची लाइन लावून दुपारी जेवण केल्यानंतर नजीकच्या मोठ्या बाजारपेठेत तालुक्याच्या ठिकाणी माल खरेदीसाठी येतात.

सकाळी ७ वा. दुकाने उघडण्यासाठी वेळ व दुपारी ४ वा. दुकाने बंद करण्याचा आदेश यामुळे धंद्यावर मोठा परिणाम होत आहे. अगोदरच ३ ते ४ महिन्यांच्या कोरोना लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक व औषधांची दुकाने सोडून सर्व व्यवहार बंद होते. यामुळे व्यापारी वर्ग अधिकच संकटात सापडला आहे. लॉकडाऊन शिथिल झाला, परंतु सकाळी ७ ते ४ ही वेळ गैरसोयीची आहे. तसेच शनिवार व रविवार लॉकडाऊन सक्तीचे असू नये.

...........

यांनी केली मागणी

कापड व्यापारी हरचरणसिंग चुग, स्टेशनरी व्यापारी, रमेश गुंदेचा, क्रॉकरी दुकानदार, बबलू आहुजा, सौंदर्य प्रसाधने व प्रेझेंट वस्तू विक्री करणारे राजेंद्र पवार, भांडी दुकानदार सुधीर डंबीर, नंदू अंभोरे, विजय डंबीर, सराफ व्यापारी सचिन महाले, पोपट चापानेरकर, दिलीप नागरे, हॉटेल व्यावसायिक जयंत क्षीरसागर, रमेश वैद्य, रेस्टॉरंट चालक सुनील गुप्ता यांनी नियम शिथिल करण्याची मागणी केली.

..........

उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी

शासनाने यापुढे लॉकडाऊन शिथिल करताना दुकाने उघडण्याची वेळ सकाळी ९ ते १०च्या दरम्यान व सायंकाळी ६ ते ७ ही दुकाने बंद करण्याची वेळ ठेवावी. कमी वेळ दुकाने उघडी असल्यामुळे बाजारपेठेत गर्दी दिसते, दुकाने बंद करण्याची, उघडण्याची वेळ बदलली तर बाजारात व दुकानामध्ये गर्दी दिसणार नाही. कोरोनावर मात करता येईल. कोरोनाच्या नियमांचे पालन झाले पाहिजे. उल्लंघन करणाऱ्यांवर अधिकाऱ्यांनी कार्यवाही केली पाहिजे. नागरिक, ग्राहकांमध्ये व व्यापाऱ्यांमध्ये शिस्त निर्माण होऊन काटेकोरपणे पालन होऊ शकते.