शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दावणीला गायी नसताना कर्ज वाटप; अहमदनगर जिल्हा बँकेतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 11:50 IST

दूध उत्पादक शेतकऱ्यांना खेळते भांडवल द्या या सरकारच्या आदेशाचा गैरफायदा घेत जिल्हा सहकारी बॅँकेने गायी नसलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जवाटप केले असल्याच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक उदय शेळके यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधत हरकत नोंदवली आहे.

अहमदनगर : दूध उत्पादक शेतकऱ्यांना खेळते भांडवल द्या या सरकारच्या आदेशाचा गैरफायदा घेत जिल्हा सहकारी बॅँकेने गायी नसलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जवाटप केले असल्याच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक उदय शेळके यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधत हरकत नोंदवली आहे.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना चारा, औषधे यासाठी भांडवल उपलब्ध व्हावे यासाठी दोन गायींसाठी एकरी तीस हजार रुपये कर्ज देणारी ही योजना आहे. पाच एकर शेतीपर्यंत हे कर्ज मिळते. म्हणजे पाच एकर शेती व दहा गायी असणाऱ्या शेतकऱ्याला दीड लाख रुपये कर्जरूपात मिळू शकतात. या कर्जास सात टक्के व्याजदर असून, नियमित कर्ज भरल्यास यातील तीन टक्के व्याज केंद्र सरकार देणार आहे. थोडक्यात नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यास केवळ चार टक्केच व्याज पडणार आहे.

मात्र, जिल्हा बँकेमार्फत राबविल्या जात असलेल्या या योजनेत ज्या शेतकऱ्यांकडे गायी नाहीत त्यांनाही कर्ज दिले जात असल्याच्या तक्रारी आहेत. बँकेचे संचालक उदय शेळके यांच्याकडे अशा तक्रारी आल्यानंतर त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांच्याशी संपर्क करून या प्रकाराची चौकशी करण्याची सूचना केली आहे.

१४४ कोटींचे वाटप

जिल्हा बँकेने या योजनेत आतापर्यंत २९ हजार शेतकऱ्यांना १४४ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले असल्याची माहिती बँकेचे सरव्यवस्थापक एस.जी. वर्पे यांनी ‘लोकमत’ला दिली. गायी नसताना कर्ज वाटप झाले असेल, तर त्याची चौकशी केली जाईल, असे ते म्हणाले. मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांच्याशी संपर्क साधला असता नियमबाह्य कर्ज वाटप झाले असेल, तर चौकशी करू, असे तेही म्हणाले.

कर्ज वाटपाचे फोटो सेशन

शेतकऱ्यांना कर्ज देताना मोठे कार्यक्रम घेण्याचा धडाका काही संचालकांनी लावला आहे. कर्ज हे अनुदान नसून, ते शेतकऱ्यांना पुन्हा भरावे लागणार आहे. असे असतानाही या कर्ज वाटपाचे फोटो सेशन करून काही संचालक राजकीय फायदा उचलत आहेत. या कर्ज वितरणावरून बँकेत तीव्र मतभेद दिसत आहेत. प्रशासन काही संचालकांच्या दबावातून नियमांकडे दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा आहे.

गायी नसताना कर्ज वाटप केले जात असल्याच्या तक्रारी आहेत. असे असेल तर हे नियमबाह्य कर्ज ठरेल. यामुळे खरे गरजवंत शेतकरी वंचित तर राहतीलच; पण हे कर्ज बुडाल्यास त्याचा परिणाम थेट सामान्य नागरिकांच्या ठेवींवर होईल. त्यामुळे या सर्व कर्जवाटपाची चौकशी व्हावी ही आपली भूमिका असून, यासंदर्भात आपण सोमवारी बँकेला लेखी पत्र देणार आहोत.

-उदय शेळके, संचालक, जिल्हा सहकारी बँक

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBanking Sectorबँकिंग क्षेत्रAgriculture Sectorशेती क्षेत्र