शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

मुबलक वीज असताना भारनियमनाचे चटके!

By admin | Updated: September 30, 2014 01:29 IST

चंद्रकांत शेळके , अहमदनगर गेल्या तीन महिन्यांपासून भारनियमनाचा विसर पडलेल्या ग्राहकांना सणासुदीच्या तोंडावर ‘एमर्जन्सी लोडशेडिंग’चे चटके बसण्यास सुरूवात झाली आहे.

चंद्रकांत शेळके , अहमदनगरगेल्या तीन महिन्यांपासून भारनियमनाचा विसर पडलेल्या ग्राहकांना सणासुदीच्या तोंडावर ‘एमर्जन्सी लोडशेडिंग’चे चटके बसण्यास सुरूवात झाली आहे. उच्च वाहिन्यांतील तांत्रिक बिघाडाचे कारण यासाठी दिले जात आहे. राज्यातील समाधानकारक पावसामुळे धरणांची स्थिती उत्तम असून, वीजनिर्मिती केंद्रही पूर्ण क्षमतेने कार्यान्वित आहेत. पावसाळ््यात बहुतांश कृषिपंप बंदच होते. परिणामी विजेची मागणी घटली. त्यामुळे राज्यात मागणीच्या प्रमाणात वीज उपलब्ध आहे. सणासुदीच्या दिवसांत ग्राहकांना भारनियमनातून दिलासा मिळावा म्हणून राज्य सरकारनेही खबरदारी म्हणून विजेचा तुटवडा भासणार नाही याची काळजी घेतली. सध्या राज्यात १२ ते १३ हजार मेगावॅट विजेची मागणी असून तेवढी वीज उपलब्ध करण्यात आली आहे. परंतु शनिवारपासून औरंगाबाद ते पॉवरग्रीड ४०० केव्हीए, वर्धा ते औरंगाबाद ७६५ केव्हीए व औरंगाबाद ते तळेगाव ४०० केव्हीए या विद्युत वाहिन्यांत तांत्रिक बिघाड झाल्याने वीज पुरवठ्यात विस्कळीतपणा आला. परिणामी राज्यात तांत्रिक बिघाडाचे कारण देत महावितरणने चार तास भारनियमन सुरू केले. नवरात्रोत्सव काळात भारनियमन होणार नसल्याचे महावितरणने अधिकृतपणे जाहीर केले होते, त्यास ४८ तास उलटत नाहीत, तोच पुन्हा वीज पुरवठा विस्कळीत झाला. बिघाड किरकोळ असल्याने सायंकाळपर्यंत दुरूस्ती होऊन पुरवठा सुरळीत होण्याचे संकेतही महावितरणकडून दिले. शनिवार, रविवार व सोमवार सायंकाळपर्यंतही भारनियमन सुरूच असल्याने ग्राहकांचा संताप अनावर झाला. राष्ट्रपती राजवट लागल्याने सर्व सूत्रे प्रशासनाकडे गेली. एका अर्थाने राज्याला हक्काचा पालक राहिला नाही. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यावरच नेमके भारनियमन कसे सुरू झाले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.