शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
2
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
3
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
4
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
5
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
6
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
7
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
8
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
9
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
10
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
11
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
12
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
13
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
14
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
15
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
16
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
17
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
18
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
19
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
20
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान

ऐकावे ते नवलच! राहुरीत शेतक-यांनी काढला गाढवांविरोधात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 17:13 IST

वीज मिळत नाही म्हणून महावितरणविरोधात मोर्चा, पाणी मिळत नाही म्हणून ग्रामपंचायत व पालिका आणि पाटबंधारे विभगााच्या विरोधात मोर्चा, उसाला चांगला भाव मिळावा म्हणून कारखान्यांविरोधात मोर्चा, प्रश्न सुटत नाहीत म्हणून प्रशासनाविरोधात मोर्चा असे मोर्चे तुम्ही पाहिले असतील. बातम्याही वाचल्या असतील. पण चक्क गाढवाविरोधात मोर्चा काढल्याची घटना मंगळवारी राहुरीत घडली.

ठळक मुद्देप्रवरा नदी पात्रातून वाळू वाहण्यासाठी गाढवांचा वापर होतो. मोकाट सुटलेली गाढवे शेतक-यांचा ऊस, घास व भाजीपाल्याचे नुकसान करतात. शासनाने या गाढवांचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी शेतक-यांना मोर्चा काढण्याची वेळ आली.

राहुरी : वीज मिळत नाही म्हणून महावितरणविरोधात मोर्चा, पाणी मिळत नाही म्हणून ग्रामपंचायत व पालिका आणि पाटबंधारे विभगााच्या विरोधात मोर्चा, उसाला चांगला भाव मिळावा म्हणून कारखान्यांविरोधात मोर्चा, प्रश्न सुटत नाहीत म्हणून प्रशासनाविरोधात मोर्चा असे मोर्चे तुम्ही पाहिले असतील. बातम्याही वाचल्या असतील. पण चक्क गाढवाविरोधात मोर्चा काढल्याची घटना मंगळवारी राहुरीत घडली. त्याला कारणही तसेच आहे. ही गाढवे शेतक-यांच्या पिकांचे नुकसान करीत असल्याची तक्रार शेतक-यांनी केली आहे.प्रवरा नदी पात्रातून वाळू वाहण्यासाठी गाढवांचा वापर होतो. वाळू वाहून झाल्यानंतर या गाढवांना मोकळे सोडून दिले जाते. मोकाट सुटलेली गाढवे शेतक-यांचा ऊस, घास व भाजीपाल्याचे नुकसान करतात. शासनाने या गाढवांचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी शेतक-यांना मोर्चा काढण्याची वेळ आली. कोल्हार खुर्दचे कामगार तलाठी हरिश्चंद्र मुठे व मंडल आधिकारी बी. एल. वडीतके यांच्यावर शेतक-यांनी प्रश्नांचा पाऊस पाडत गाढव मालकांवर का कारवाई केली नाही, असा सवाल उपस्थित केला.यापूर्वी शेतक-यांनी गाढवांच्या मालकांकडेही तक्रारी केल्या होत्या. मात्र, मालकांनी त्या तक्रारींची दखल घेतली नाही. गाढवांवरुन अवैद्यरित्या वाळू उपसा करायचा आणि वाळू उपसा झाला की गाढवांना मोकाट सोडून द्यायचे, या वाळू वाहतूकदारांच्या आठमुठे धोरणाला शेतकरी कंटाळले आहेत. त्यामुळे शेतक-यांनी हा मोर्चा काढला. या मोर्चामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्रीधर शिरसाट, गणेश राऊत, रवींद्र शिरसाट, संजय भोसले, प्रकाश चिखले आदी सहभागी झाले होते. सरपंच प्रकाश पाटील यांनीही गाढवांमुळे शेतक-यांचे होणारे नुकसान टाळण्याची गरज व्यक्त केली.

गाढवामुळे शेतीचे नुकसान होत आहे, ही वस्तुस्थिती आहे. गाढवांच्या मालकांची यादी तयार केली जाईल. तयार केलेली यादी राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे यांच्याकडे पाठविण्यात येईल. संबंधीतावर त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नदी पात्रात असलेल्या रस्त्यावर खड्डे खोदून वाहतुकीला प्रतिबंध केला जाईल.-हरिश्चंद मुठे, कामगार तलाठी-बी. एल. वडीतके, मंडल अधिकारी

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी