शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

ऐकावे ते नवलच! राहुरीत शेतक-यांनी काढला गाढवांविरोधात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 17:13 IST

वीज मिळत नाही म्हणून महावितरणविरोधात मोर्चा, पाणी मिळत नाही म्हणून ग्रामपंचायत व पालिका आणि पाटबंधारे विभगााच्या विरोधात मोर्चा, उसाला चांगला भाव मिळावा म्हणून कारखान्यांविरोधात मोर्चा, प्रश्न सुटत नाहीत म्हणून प्रशासनाविरोधात मोर्चा असे मोर्चे तुम्ही पाहिले असतील. बातम्याही वाचल्या असतील. पण चक्क गाढवाविरोधात मोर्चा काढल्याची घटना मंगळवारी राहुरीत घडली.

ठळक मुद्देप्रवरा नदी पात्रातून वाळू वाहण्यासाठी गाढवांचा वापर होतो. मोकाट सुटलेली गाढवे शेतक-यांचा ऊस, घास व भाजीपाल्याचे नुकसान करतात. शासनाने या गाढवांचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी शेतक-यांना मोर्चा काढण्याची वेळ आली.

राहुरी : वीज मिळत नाही म्हणून महावितरणविरोधात मोर्चा, पाणी मिळत नाही म्हणून ग्रामपंचायत व पालिका आणि पाटबंधारे विभगााच्या विरोधात मोर्चा, उसाला चांगला भाव मिळावा म्हणून कारखान्यांविरोधात मोर्चा, प्रश्न सुटत नाहीत म्हणून प्रशासनाविरोधात मोर्चा असे मोर्चे तुम्ही पाहिले असतील. बातम्याही वाचल्या असतील. पण चक्क गाढवाविरोधात मोर्चा काढल्याची घटना मंगळवारी राहुरीत घडली. त्याला कारणही तसेच आहे. ही गाढवे शेतक-यांच्या पिकांचे नुकसान करीत असल्याची तक्रार शेतक-यांनी केली आहे.प्रवरा नदी पात्रातून वाळू वाहण्यासाठी गाढवांचा वापर होतो. वाळू वाहून झाल्यानंतर या गाढवांना मोकळे सोडून दिले जाते. मोकाट सुटलेली गाढवे शेतक-यांचा ऊस, घास व भाजीपाल्याचे नुकसान करतात. शासनाने या गाढवांचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी शेतक-यांना मोर्चा काढण्याची वेळ आली. कोल्हार खुर्दचे कामगार तलाठी हरिश्चंद्र मुठे व मंडल आधिकारी बी. एल. वडीतके यांच्यावर शेतक-यांनी प्रश्नांचा पाऊस पाडत गाढव मालकांवर का कारवाई केली नाही, असा सवाल उपस्थित केला.यापूर्वी शेतक-यांनी गाढवांच्या मालकांकडेही तक्रारी केल्या होत्या. मात्र, मालकांनी त्या तक्रारींची दखल घेतली नाही. गाढवांवरुन अवैद्यरित्या वाळू उपसा करायचा आणि वाळू उपसा झाला की गाढवांना मोकाट सोडून द्यायचे, या वाळू वाहतूकदारांच्या आठमुठे धोरणाला शेतकरी कंटाळले आहेत. त्यामुळे शेतक-यांनी हा मोर्चा काढला. या मोर्चामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्रीधर शिरसाट, गणेश राऊत, रवींद्र शिरसाट, संजय भोसले, प्रकाश चिखले आदी सहभागी झाले होते. सरपंच प्रकाश पाटील यांनीही गाढवांमुळे शेतक-यांचे होणारे नुकसान टाळण्याची गरज व्यक्त केली.

गाढवामुळे शेतीचे नुकसान होत आहे, ही वस्तुस्थिती आहे. गाढवांच्या मालकांची यादी तयार केली जाईल. तयार केलेली यादी राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे यांच्याकडे पाठविण्यात येईल. संबंधीतावर त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नदी पात्रात असलेल्या रस्त्यावर खड्डे खोदून वाहतुकीला प्रतिबंध केला जाईल.-हरिश्चंद मुठे, कामगार तलाठी-बी. एल. वडीतके, मंडल अधिकारी

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी