शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

ऐकावे ते नवलच! राहुरीत शेतक-यांनी काढला गाढवांविरोधात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 17:13 IST

वीज मिळत नाही म्हणून महावितरणविरोधात मोर्चा, पाणी मिळत नाही म्हणून ग्रामपंचायत व पालिका आणि पाटबंधारे विभगााच्या विरोधात मोर्चा, उसाला चांगला भाव मिळावा म्हणून कारखान्यांविरोधात मोर्चा, प्रश्न सुटत नाहीत म्हणून प्रशासनाविरोधात मोर्चा असे मोर्चे तुम्ही पाहिले असतील. बातम्याही वाचल्या असतील. पण चक्क गाढवाविरोधात मोर्चा काढल्याची घटना मंगळवारी राहुरीत घडली.

ठळक मुद्देप्रवरा नदी पात्रातून वाळू वाहण्यासाठी गाढवांचा वापर होतो. मोकाट सुटलेली गाढवे शेतक-यांचा ऊस, घास व भाजीपाल्याचे नुकसान करतात. शासनाने या गाढवांचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी शेतक-यांना मोर्चा काढण्याची वेळ आली.

राहुरी : वीज मिळत नाही म्हणून महावितरणविरोधात मोर्चा, पाणी मिळत नाही म्हणून ग्रामपंचायत व पालिका आणि पाटबंधारे विभगााच्या विरोधात मोर्चा, उसाला चांगला भाव मिळावा म्हणून कारखान्यांविरोधात मोर्चा, प्रश्न सुटत नाहीत म्हणून प्रशासनाविरोधात मोर्चा असे मोर्चे तुम्ही पाहिले असतील. बातम्याही वाचल्या असतील. पण चक्क गाढवाविरोधात मोर्चा काढल्याची घटना मंगळवारी राहुरीत घडली. त्याला कारणही तसेच आहे. ही गाढवे शेतक-यांच्या पिकांचे नुकसान करीत असल्याची तक्रार शेतक-यांनी केली आहे.प्रवरा नदी पात्रातून वाळू वाहण्यासाठी गाढवांचा वापर होतो. वाळू वाहून झाल्यानंतर या गाढवांना मोकळे सोडून दिले जाते. मोकाट सुटलेली गाढवे शेतक-यांचा ऊस, घास व भाजीपाल्याचे नुकसान करतात. शासनाने या गाढवांचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी शेतक-यांना मोर्चा काढण्याची वेळ आली. कोल्हार खुर्दचे कामगार तलाठी हरिश्चंद्र मुठे व मंडल आधिकारी बी. एल. वडीतके यांच्यावर शेतक-यांनी प्रश्नांचा पाऊस पाडत गाढव मालकांवर का कारवाई केली नाही, असा सवाल उपस्थित केला.यापूर्वी शेतक-यांनी गाढवांच्या मालकांकडेही तक्रारी केल्या होत्या. मात्र, मालकांनी त्या तक्रारींची दखल घेतली नाही. गाढवांवरुन अवैद्यरित्या वाळू उपसा करायचा आणि वाळू उपसा झाला की गाढवांना मोकाट सोडून द्यायचे, या वाळू वाहतूकदारांच्या आठमुठे धोरणाला शेतकरी कंटाळले आहेत. त्यामुळे शेतक-यांनी हा मोर्चा काढला. या मोर्चामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्रीधर शिरसाट, गणेश राऊत, रवींद्र शिरसाट, संजय भोसले, प्रकाश चिखले आदी सहभागी झाले होते. सरपंच प्रकाश पाटील यांनीही गाढवांमुळे शेतक-यांचे होणारे नुकसान टाळण्याची गरज व्यक्त केली.

गाढवामुळे शेतीचे नुकसान होत आहे, ही वस्तुस्थिती आहे. गाढवांच्या मालकांची यादी तयार केली जाईल. तयार केलेली यादी राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे यांच्याकडे पाठविण्यात येईल. संबंधीतावर त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नदी पात्रात असलेल्या रस्त्यावर खड्डे खोदून वाहतुकीला प्रतिबंध केला जाईल.-हरिश्चंद मुठे, कामगार तलाठी-बी. एल. वडीतके, मंडल अधिकारी

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी