शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
4
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
5
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
6
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
7
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
8
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
9
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
10
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
11
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
12
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
13
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
14
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
15
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
16
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
17
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
18
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
19
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
20
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  

व्यसनमुक्त जीवन हाच सुदृढ आरोग्याचा मंत्र; कॅन्सरतज्ज्ञ डॉ़. सतीश सोनवणे यांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 14:21 IST

सद्यस्थितीला भारतात कॅन्सरने दररोज २२०० जणांचा मृत्यू होतो. त्यामुळे व्यसनमुक्त जीवन हाच सुदृढ आरोग्याचा मंत्र आहे, असे मत मॅक्सकेअर हॉस्पिटलचे संचालक व कॅन्सरतज्ज्ञ डॉ़. सतीश सोनवणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

मौख्यिक आरोग्य दिन विशेष/अरुण वाघमोडे/ अहमदनगर : भारतात दरवर्षी नव्याने १५ ते १७ लाख लोकांना कॅन्सर (कर्करोग) होतो. यातील ४० टक्के लोकांना केवळ तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कॅन्सरची लागण होते. सद्यस्थितीला भारतात कॅन्सरने दररोज २२०० जणांचा मृत्यू होतो. त्यामुळे व्यसनमुक्त जीवन हाच सुदृढ आरोग्याचा मंत्र आहे, असे मत मॅक्सकेअर हॉस्पिटलचे संचालक व कॅन्सरतज्ज्ञ डॉ़ सतीश सोनवणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले़.जागतिक कर्करोग दिन व मौखिक आरोग्य दिनानिमित्त डॉ. सोनवणे यांच्याशी बुधवारी संवाद साधला. ते म्हणाले, कॅन्सरची अनेक कारणे आहेत. परंतु मुख्यत: तंबाखूचे सेवन, सिगारेट, विडी, गुटखा व दारु यामुळे कॅन्सर होण्याचे प्रमाण जास्त आहे. या व्यतिरिक्त विविध रसायनांचे शरीरावर होणारे परिणाम, जंतूसंसर्ग, शरीराच्या एखाद्या भागाला वारंवार होणारी जखम, शरीरातील हार्मोन्सचे अनियंत्रण, रेडिएशन आदी कारणांमुळेही कॅन्सर होतो. भारतात २५ कोटी तर महाराष्ट्रात अडीच कोटी लोक तंबाखूचे सेवन करतात. यातील २५ टक्के लोकांना कॅन्सरची बाधा झालेली आहे. यावरून तंबाखूजन्य पदार्थाचे दुष्परिणाम आपल्या निदर्शनास येतात. सध्या महाराष्ट्रासह भारतात शासकीय यंत्रणा व विविध सामाजिक संस्थांकडून तंबाखूजन्य पदार्थांबाबत प्रबोधन मोहीम राबविली जात आहे. मात्र यात आणखी व्यापकता यावी, महाराष्ट्रात गुटखाबंदीची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. पालकांनीही दक्षता घेत आपला पाल्य व्यसनापासून दूर राहिल याची काळजी घ्यावी़. ज्यांना तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन आहे, त्यांनी त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा. आत्मविश्वास असेल तर कुठलेही व्यसन सोडणे शक्य आहे. शाळा, महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी आहे. या कायद्याची मात्र प्रभावीपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही़. शरीरात कोणत्याही भागात अचानक आलेली गाठ, कातडी,ओठ, जीभ आदी ठिकाणी होणारी जखम, गिळण्याचा त्रास अथवा अन्न उलटून पडणे, औषधांनी बरी न होणारी जखम, औषधांना दाद न देणारा खोकला  किंवा घशात घोगरा आवाज येणे किंवा आवाजात पडलेला फरक, अपचन, अवेळी अचानक रक्तस्त्राव, लघवी, शौचाच्या सवयीत अचानक बदल, आदी कॅन्सरची लक्षणे आहेत. सध्या कॅन्सरवरील विविध उपचारपद्धती उपलब्ध आहेत. त्यामुळे कॅन्सर झाला तर खचून न जाता कॅन्सर तज्ज्ञांकडून योग्यवेळेत उपचार घ्यावेत. वेळेत व योग्य उपचारातून अनेक कॅन्सरग्रस्त बरे झालेले आहेत. प्रत्यक्षात मात्र कॅन्सर होऊच नये यासाठी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ़ सतीश सोनवणे यांनी केले आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरHealthआरोग्यcancerकर्करोग