शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना लुटण्यासाठीच बियाणे कंपन्यांना परवाना

By admin | Updated: June 10, 2016 23:38 IST

अहमदनगर: सरकारचे नियंत्रण असलेल्या महाबीज कंपनीने बियाण्यांच्या दरात दरात दुप्पट वाढ केली़ त्यामुळे आता खासगी कंपन्यादेखील बियाण्यांच्या दरात वाढ करतील़

अहमदनगर: सरकारचे नियंत्रण असलेल्या महाबीज कंपनीने बियाण्यांच्या दरात दरात दुप्पट वाढ केली़ त्यामुळे आता खासगी कंपन्यादेखील बियाण्यांच्या दरात वाढ करतील़ महाबीजची ही दरवाढ म्हणजे एकप्रकारे सरकारने खासगी कंपन्यांना शेतकऱ्यांना लुटण्याचाच परवाना दिला आहे, असा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी शुक्रवारी येथे केला़ विरोधी पक्षनेते विखे नगर दौऱ्यावर आले असता ते पत्रकारांशी बोलत होेते़ विखे यांनी सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली़ सततच्या नापिकीमुळे ग्रामीण अर्थकारण कोलमडले आहे़ शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत असताना महाबीजने बियाण्यांच्या दरात दुप्पट वाढ केली़ एकीकडे मोफत बियाणे देण्याची घोषणा सरकारने केली आहे तर दुसरीकडे बियाण्यांचे भाव वाढविण्यात आले आहे़ स्वत:च्या कंपनीवर सरकारचे नियंत्रण नाही़ ते खासगी कंपन्यांवर काय नियंत्रण ठेवणार, असा सवाल उपस्थित करत खासगी कंपन्यांकडून बियाण्यांच्या नावाखाली लट केली जाईल़ मात्र काँग्रेस हे खपवून घेणार नाही़ सरकारने आठ दिवसांत ही दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा काँग्रेसच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही विखे यांनी यावेळी दिला़ सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे़ त्यावर कळस असा की एकमेकांना शिव्या घालण्याचा एकमेव कार्यक्रम सध्या सुरू आहे़ एकमेकांचे आई-बाप शोधण्यापेक्षा दोन्ही पक्षांनी सत्तेत राहायचे की नाही, हे ठरवावे़ उध्दव ठाकरे यांनी हे सरकार नालायक असल्याचे विधान केले होते़ मंत्रिमंडळात त्यांचेही मंत्री आहेत़ याचाच अर्थ त्यांचेही मंत्री नालायक आहे़ एवढी वाईट स्थिती असेल तर सत्तेत का थांबता, असा सवाल त्यांनी ठाकरे यांना केला आहे़ विखे उवाच...-खा पण, संभाळून खा -मुख्यमंत्री, मंत्र्यांना सबुरीचा सल्ला-घोटाळेबहाद्दरांचे सरकार, विश्वास गमावला-दोघांच्या भांडणात खडसेंचे पानीपत--अश्वासनांचे सरकारकडून घूमजाव-एकमेकांना शिव्या देण्याचा एकमेव कार्यक्रम-पदोपदी सरकारचे अपयश दिसतेवेगळा देश केला तर मोदी येतील -मराठवाड्याचा दौरा करत असताना शेतकऱ्यांनी पंतप्रधान का येत नाही, असा प्रश्न उपस्थित केला़ त्यावर भीषण दुष्काळ सुरू असताना पंतप्रधान विदेशी दौरे करत आहेत़ ते देशात फिरत नाहीत़ मराठवाडा स्वतंत्र देश स्थापन केल्यास पंतप्रधान येतील, अशी टीका त्यावेळी झाली, ती बरोबरच आहे, असेही विखे म्हणाले़