शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

शेतकऱ्यांना लुटण्यासाठीच बियाणे कंपन्यांना परवाना

By admin | Updated: June 10, 2016 23:38 IST

अहमदनगर: सरकारचे नियंत्रण असलेल्या महाबीज कंपनीने बियाण्यांच्या दरात दरात दुप्पट वाढ केली़ त्यामुळे आता खासगी कंपन्यादेखील बियाण्यांच्या दरात वाढ करतील़

अहमदनगर: सरकारचे नियंत्रण असलेल्या महाबीज कंपनीने बियाण्यांच्या दरात दरात दुप्पट वाढ केली़ त्यामुळे आता खासगी कंपन्यादेखील बियाण्यांच्या दरात वाढ करतील़ महाबीजची ही दरवाढ म्हणजे एकप्रकारे सरकारने खासगी कंपन्यांना शेतकऱ्यांना लुटण्याचाच परवाना दिला आहे, असा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी शुक्रवारी येथे केला़ विरोधी पक्षनेते विखे नगर दौऱ्यावर आले असता ते पत्रकारांशी बोलत होेते़ विखे यांनी सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली़ सततच्या नापिकीमुळे ग्रामीण अर्थकारण कोलमडले आहे़ शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत असताना महाबीजने बियाण्यांच्या दरात दुप्पट वाढ केली़ एकीकडे मोफत बियाणे देण्याची घोषणा सरकारने केली आहे तर दुसरीकडे बियाण्यांचे भाव वाढविण्यात आले आहे़ स्वत:च्या कंपनीवर सरकारचे नियंत्रण नाही़ ते खासगी कंपन्यांवर काय नियंत्रण ठेवणार, असा सवाल उपस्थित करत खासगी कंपन्यांकडून बियाण्यांच्या नावाखाली लट केली जाईल़ मात्र काँग्रेस हे खपवून घेणार नाही़ सरकारने आठ दिवसांत ही दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा काँग्रेसच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही विखे यांनी यावेळी दिला़ सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे़ त्यावर कळस असा की एकमेकांना शिव्या घालण्याचा एकमेव कार्यक्रम सध्या सुरू आहे़ एकमेकांचे आई-बाप शोधण्यापेक्षा दोन्ही पक्षांनी सत्तेत राहायचे की नाही, हे ठरवावे़ उध्दव ठाकरे यांनी हे सरकार नालायक असल्याचे विधान केले होते़ मंत्रिमंडळात त्यांचेही मंत्री आहेत़ याचाच अर्थ त्यांचेही मंत्री नालायक आहे़ एवढी वाईट स्थिती असेल तर सत्तेत का थांबता, असा सवाल त्यांनी ठाकरे यांना केला आहे़ विखे उवाच...-खा पण, संभाळून खा -मुख्यमंत्री, मंत्र्यांना सबुरीचा सल्ला-घोटाळेबहाद्दरांचे सरकार, विश्वास गमावला-दोघांच्या भांडणात खडसेंचे पानीपत--अश्वासनांचे सरकारकडून घूमजाव-एकमेकांना शिव्या देण्याचा एकमेव कार्यक्रम-पदोपदी सरकारचे अपयश दिसतेवेगळा देश केला तर मोदी येतील -मराठवाड्याचा दौरा करत असताना शेतकऱ्यांनी पंतप्रधान का येत नाही, असा प्रश्न उपस्थित केला़ त्यावर भीषण दुष्काळ सुरू असताना पंतप्रधान विदेशी दौरे करत आहेत़ ते देशात फिरत नाहीत़ मराठवाडा स्वतंत्र देश स्थापन केल्यास पंतप्रधान येतील, अशी टीका त्यावेळी झाली, ती बरोबरच आहे, असेही विखे म्हणाले़