शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान-संभाजी भिडे यांच्यातील कनेक्शन उघड करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 22:01 IST

कोरेगाव-भीमा प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी काही निवडक निवृत्त न्यायाधीशांशी चर्चा करून नि:पक्षपातीपणे कारवाई करावी, अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी व संभाजी भिडे यांच्यातील संबंध उघड करू, असा इशारा भारिप महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी नगर येथे दिला़

अहमदनगर: कोरेगाव-भीमा प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी काही निवडक निवृत्त न्यायाधीशांशी चर्चा करून नि:पक्षपातीपणे कारवाई करावी, अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी व संभाजी भिडे यांच्यातील संबंध उघड करू, असा इशारा भारिप महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी नगर येथे दिला़पत्रकारांशी बोलताना आंबेडकर म्हणाले, कोरेगाव-भीमा प्रकरणी संभाजी भिडेंना अटक करण्यापुरते हे प्रकरण सिमित नाही़ जी भिडेंची प्रवृत्ती आहे़, तीच प्रवृत्ती करणीसेनेची आहे़ संभाजी भिडे यांना पंतप्रधानच पाठिशी घालत आहेत, असा आपला सुरुवातीपासूनचा आरोप आहे़ या दोघांच्या संबंधाचे भक्कम पुरावे आपल्याकडे आहेत़ ते सादरदेखील केलेले आहेत, असे सांगून जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहील़  इथे न्याय मिळाला नाही, तर हे भांड कुठे घेऊन जायचे तिथे ते घेऊन जाऊ, असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला़राज्यातील जातीय दंगलीवरही त्यांनी प्रकाश टाकला़ ते म्हणाले, पुरोगामी महाराष्ट्राची वाटचाल प्रतिगामीकडे सुरू आहे़ राज्यातील अनियंत्रित हिंदू संघटना बेफाम झाल्या आहेत़ अनियंत्रित व नियंत्रित हिंदू संघटनांमध्ये भांडण सुरू झाले असून, त्यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू आहे़  या भांडणाची झळ मुस्लिम, ख्रिश्चन आणि दलितांना बसत नसून, मध्यमवर्गीय सवर्ण हिंदूंनाच बसत आहे़ हिंदू संघटनांतील हे भांडण सवर्ण हिंदूंच्या दारात येऊन पोहोचले आहे़ वादाचे उत्तर कुठल्याही राजकीय पक्षाकडे नाही़ ते सवर्ण हिंदंूकडेच आहे़ त्यांनीच काय ते ठरावावे, असे आवाहन आंबेडकर यांनी यावेळी केले़ कॉ़ बाबा आरगडे, अनंत लोखंडे, अशोक सोनवणे, अरुण जाधव, संध्या मेंढे आदी यावेळी उपस्थित होते़़़़़़शरद पवारांनी स्वत:चे राजकीय चारित्र्य तपासावेराष्ट्रीय राजकारणात राजकीय चारित्र्यवान व्यक्ती एकत्र येत असतात़  समविचारी पक्षांना एकीची हाक देणाºयांनी स्वत:चे राजकीय चारित्र्य तपासण्याची गरज आहे़ निवडणुकीनंतर सेना-भाजपा सोबत जाण्यास तयार नव्हती़  तेव्हा सर्वप्रथम राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा दिला होता, ही बाब विसरून चालणार नाही़  शरद पवार यांनी आपले राजकीय चारित्र्य तपासण्याची गरज आहे, अशी टीका आंबेडकर यांनी केली. संविधान बचाव रॅलीसाठी पवार यांच्यासोबत जाणार का, या पत्रकारांच्या प्रश्नाचे उत्तर देताना पवार यांचे नाव न घेता त्यांनी ही टीका केली़