शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

मृत्यू कशानेही होऊ द्या....वीस हजार रुपये मिळणार.!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 12:03 IST

अहमदनगर : राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूनंतर कुटुंबाला एकरकमी २० हजार रुपयांची रक्कम दिली जाते. या योजनेसाठी आधी एक वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक होते. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आता तीन वर्षांपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य शासनाने तसे एका परिपत्रकान्वये आदेश जारी केल्यामुळे मृतांच्या कुटुंबीयांना आता लाभ घेणे शक्य होणार आहे. 

अहमदनगर : राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूनंतर कुटुंबाला एकरकमी २० हजार रुपयांची रक्कम दिली जाते. या योजनेसाठी आधी एक वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक होते. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आता तीन वर्षांपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य शासनाने तसे एका परिपत्रकान्वये आदेश जारी केल्यामुळे मृतांच्या कुटुंबीयांना आता लाभ घेणे शक्य होणार आहे. 

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या १८ ते ५९ वयोगटातील (६० वर्षांपेक्षा कमी) कर्ता स्त्री-पुरुष मरण पावल्यास त्याच्या कुटुंबीयांना एक रकमी २० हजार रुपये इतके अर्थसाहाय्य देण्यात येते. 

आतापर्यंत या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी मृत्युच्या तारखेपासून एक वर्षाच्या आत अर्ज स्वीकारण्याची मुदत होती. आता ही मुदत वाढवून मृत्युच्या तारखेपासून तीन वर्षाच्या आत अर्ज स्वीकारण्यास २१ सप्टेंबर रोजीच्या आदेशाने राज्य शासनाने मान्यता दिली आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदार भारती सगरे यांनी दिली.

कोणाला मिळतो लाभ?कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाल्याने कुटुंब निराधार झाल्यासकुटुंबाचा समावेश दारिद्र्यरेषेखालील यादीत असावासंजय गांधी निराधार योजना कार्यालयात अर्ज करावामृत्यूबाबतचे वैद्यकीय अधिकाºयाचे प्रमाणपत्र, जन्म-मृत्यू नोंदणीचा दाखला मयत कुटुंबप्रमुख असल्याबाबत तलाठ्यांचा दाखला आधारकार्डकागदपत्रांची छाननी झाल्यावर एकरकमी २० हजार दिले जातात

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांनाही लाभकोणत्याही कारणाने कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाल्यास हा लाभ मिळतो. मात्र कोरोनामुळे अचानकपणे राज्यात हजारो जणांचा मृत्यू झालेला आहे. अहमदनगर जिल्ह्यातही कोरोना बाधितांच्या मृत्युचा आकडा सातशेपार गेला आहे. यामध्ये दारिद्र्यरेषेखालील कुटुंबप्रमुख असतील तर त्यांच्याही कुटुंबीयांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरGovernmentसरकार