शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

मुलांना व्यक्त होऊ द्या, त्यांची घुसमट समजून घ्या; कोरोना काळात बालक-पालक सुसंवाद महत्त्वाचा

By अरुण वाघमोडे | Updated: July 8, 2020 16:20 IST

बिनधास्त सर्वत्र बागडणारी मुले गेल्या तीन महिन्यांपासून घरातच आहेत. अशा परिस्थितीत मुलांची घुसमट होऊ नये, ते कुठल्याही वाईट सवयीचे बळी ठरू नयेत, यासाठी पालकांनी मुलांना वेळ द्यावा़. त्यांच्याशी मनमोकळा सुसंवाद साधावा़. मुलांना व्यक्त होऊ द्यावे, त्यांच्याही अडचणी समजून घ्याव्यात, असे मत ‘लोकमत’ आॅनलाइन परिचर्चेत सहभागी झालेले सामाजिक कार्यकर्ते व संस्थांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले.

आॅनलाईन परिसंवाद

अहमदनगर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घरातील लहान मुलांच्या दैनंदिन जीवनातही मोठा बदल झाला आहे. बिनधास्त सर्वत्र बागडणारी मुले गेल्या तीन महिन्यांपासून घरातच आहेत. अशा परिस्थितीत मुलांची घुसमट होऊ नये, ते कुठल्याही वाईट सवयीचे बळी ठरू नयेत, यासाठी पालकांनी मुलांना वेळ द्यावा़. त्यांच्याशी मनमोकळा सुसंवाद साधावा़. मुलांना व्यक्त होऊ द्यावे, त्यांच्याही अडचणी समजून घ्याव्यात, असे मत ‘लोकमत’ आॅनलाइन परिचर्चेत सहभागी झालेले सामाजिक कार्यकर्ते व संस्थांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले.

या परिचर्चेत बालकल्याण समितीचे अध्यक्ष हनिफ शेख, चाईल्ड लाईनचे केंद्र समन्वयक नवनाथ सूर्यवंशी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख व स्नेहालयचे प्रकल्प संचालक वैजनाथ लोहार हे सहभागी झाले होते.

कोरोनामुळे निर्माण झालेल्या अनपेक्षित वातावरणाचा सर्वांच्याच जीवनावर कमी-अधिक प्रमाणात परिणाम झाला आहे. यात अल्पवयीन मुले हाही महत्त्वाचा घटक आहे. मागील तीन महिन्यात चाइल्ड लाइनकडे १५० मुलांनी तक्रारी केल्या. घरात मारहाण, अल्पवयीन विवाह, घरात खायला काही नाही, शेजारी राहणाºयाकडून त्रास अशा स्वरूपाच्या या तक्रारी आहेत. दुसरीकडे मुलांना मोबाईल गेमचे व्यसन, चिडचिडेपणा, अतिप्रमाणात हट्ट करणे, पॉर्न साईटचे सर्चिंग अशाही समस्यांना अनेक पालक सामोरे जात आहेत. अनेक मुलांचे मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार सुरू आहेत. मुलांचा एकटेपणा, मुलांकडून पालकांच्या जास्त अपेक्षा, मुलांना समजून न घेणे अथवा मुलांच्या वाईट सवयींकडे दुर्लक्ष करणे अशा विविध कारणांमुळे मुलांबाबत अन्याय, अत्याचारासह विविध  समस्या निर्माण होत असल्याचे मत परिचर्चेतून व्यक्त झाले.

मुले ही राष्ट्राची संपत्ती आहे. अत्याचाराचे बळी ठरणाºया मुलांना न्याय देण्यासाठी शासकीय यंत्रणा तसेच सामाजिक संस्था कार्यरत आहेत. अल्पवयीन मुला- मुलींवर मात्र असे वाईट प्रसंग येऊ नयेत, यासाठी सर्वांनीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. यात पालकांची भूमिका महत्त्वाची आहे. आपल्या व्यस्त जीवनशैलीतून मुलांसाठी वेळ राखून ठेवावा. बालक-पालकांमध्ये चांगला सुसंवाद असेल तर वेळीच अनेक समस्यांना आळा बसू शकतो.

    - हनीफ शेख,  अध्यक्ष, बालकल्याण समिती

लॉकडाऊन काळात चाईल्ड लाइनकडे आलेल्या मुलांच्या १५० तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. मुलांना कुणाकडून काही त्रास होत असेल तर त्यानी १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच पालकांनीही आपल्या मुलांबाबत सजग राहणे गरजेचे आहे. मुलांना कोणाकडून काही त्रास होत नाही ना? याचेही बारकाईने निरीक्षण करणे गरजेचे आहे.

    - नवनाथ सूर्यवंशी, चाईल्ड लाईन केंद्र समन्वयक.

बहुतांशी वेळेस घरात मुलांना गृहीत धरले जाते़. त्यांच्याकडे लक्ष दिले जात नाही़ मुलाने आपले मत व्यक्त केले तर मोठी माणसे त्याला गप्प बसायला सांगतात. मुलांसोबत असे वागणे पूर्णत: चुकीचे आहे. सध्या कोरोनामुळे मुलांना घरातच थांबावे लागत असल्याने पालकांनी आणखी खबरदारी घेणे गरजेचे आहे. घरातील मुलांना वेळ देऊन त्यांना पालकांनी समजून घ्यावे.

    - वैभव देशमुख, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी

आज अनेक मुलांच्या हातात स्मार्टफोन आहेत़. आपला मुलगा त्या फोनचा कसा वापर करत आहे, याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच मुलगा काही मानसिक तणावाखाली आहे का? कुणाचा दबाव त्याच्यावर आहे का, तो भीतीदायक वातावरणात आहे का, या गोष्टीही पालकांनी समजून घेतल्या तर अनेक समस्या निर्माण होणार नाहीत.

-वैजनाथ लोहार, प्रकल्प संचालक स्रेहालय

टॅग्स :AhmednagarअहमदनगरStudentविद्यार्थी