शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

जेऊर परिसरात बिबट्यांची दहशत सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:24 IST

केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर परिसरामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला असून बिबट्याने आता मानवी वस्तीकडे धाव घेतल्याचे दिसून येत आहे. ...

केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर परिसरामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला असून बिबट्याने आता मानवी वस्तीकडे धाव घेतल्याचे दिसून येत आहे. चाफेवाडी शिवारातील खंडोबा माळ परिसरात दोन बिबट्यांच्या हल्ल्यात तीन मेंढ्या व एक कुत्रा ठार झाला होता. भिवा घुले यांच्या मेंढ्यांच्या पालावर बिबट्याने हल्ला करून मेंढ्यांचा तसेच कुत्र्याचा फडशा पाडला. या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चाफेवाडी परिसरात मानवी वस्तीत बिबट्याने दर्शन दिले तर शेटे वस्ती येथील नरेंद्र तोडमल यांच्या कुत्र्याची शिकार करण्यात आली आहे. तरी बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

जेऊर परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात तीन मेंढ्या व एक कुत्रा ठार झाल्याची घटना घडली. बिबट्याच्या वावराने परिसरात भीतीचे वातावरण आहे. चापेवाडी शिवारातील खंडोबा माळ परिसरात मेंढपाळ भिवा बिरू घुले हे आपल्या मेंढरांसह पाल ठोकून राहत होते. सोमवारी (दि.१६) रात्री बिबट्याने त्यांच्या मेंढ्यांवर हल्ला करत दोन मेंढ्या ठार केल्या. घुले यांनी आरडाओरडा करत बिबट्यांना हुसकावून लावले. दोन बिबटे असल्याचे घुले यांनी सांगितले. नंतर पुन्हा पहाटेच्या सुमारास दोन्ही बिबट्यांनी पालावर हल्ला करत एक मेंढी व कुत्र्याची शिकार केली. वनविभागाचे कर्मचारी संजय सरोदे, इमामपूरचे सरपंच भीमराज मोकाटे, मिठू ससे, सुभाष पवार, विकास म्हस्के यांनी घटनास्थळी भेट दिली. परिसरात यापूर्वीही बिबट्याने अनेक वेळा दर्शन दिले आहे.

----

वनविभागाच्या वतीने गस्त..

जेऊर परिसरात दोन बिबट्यांचा वावर असल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगितले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर वनपाल शैलेश बडदे, वनरक्षक मनेष जाधव, वनरक्षक श्रीराम जगताप, वनकर्मचारी संजय सरोदे, दाणी, मुकेश साळवे यांच्या पथकाने परिसरात गस्त घालून पाहणी केली. वनविभागाच्या वतीने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

---

पिंजरा लावण्याची मागणी

शाळा बंद असल्याने लहान मुले डोंगरात गुरे चारण्यासाठी जात आहेत. भविष्यात दुर्घटना घडू नये यासाठी वनविभागाकडून परिसरात पिंजरा लावण्याची मागणी माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे यांनी केली आहे.

---------

जेऊर परिसरात दोन बिबट्यांचा वावर असल्याचे स्पष्ट झाले असून गुराखी, शेतकरी व नागरिकांनी काळजी घ्यावी. तसेच वनविभागाने परिसरात पिंजरा लावावा.

-राजश्री मगर,

सरपंच, जेऊर