शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

मुळा नदीतून जायकवाडीला पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 16:53 IST

राहुरी : दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या मुळा धरणातून नदीपात्राव्दारे पैठणच्या जायकवाडी प्रकल्पाकडे २ हजार ५१७ द.ल.घ.फू. पाण्याचा विसर्ग ...

राहुरी : दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या मुळा धरणातून नदीपात्राव्दारे पैठणच्या जायकवाडी प्रकल्पाकडे २ हजार ५१७ द.ल.घ.फू. पाण्याचा विसर्ग झाला आहे. पाणलोट क्षेत्रावर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पाण्याची आवक घटली आहे.२६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमतेच्या मुळा धरणाचे दरवाजे यंदा परतीच्या पावसामुळे दोनदा उघडावे लागले. धरणाकडे कोतूळ येथून ११५८ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. कोतूळ येथे यावर्षी ८४४ मिलिमीटर तर मुळानगर येथे ६०२ मि.मी.पावसाची नोंद झाली. हवामान खात्याने २० ते २४ आॅक्टोबरदरम्यान पावसाची शक्यता वर्तविली आहे. मुळा नदीतून सध्या २ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदी पात्रातील डिग्रस, मांजरी, मानोरी, वांजुळपोई येथे पहिल्या टप्प्यात फळ्या टाकण्यात आल्या आहेत. पाऊस उघडल्याने मंगळवारी पाण्याचा विसर्ग कमी करण्याची शक्यता आहे. नदीतून पाणी वाहिल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला आहे.

विहिरींची पाणी पातळी वाढली

मुळा नदी पात्रातून पाणी वाहून गेल्यामुळे नदी काठ परिसरातील विहिरींची पाणी पातळी वाढली. नदी पात्र परिसरात मुख्य पीक ऊस असल्याने पुढील महिन्यात उसाच्या लागवडी वाढण्याची शक्यता आहे. मुळा धरण भरल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर