शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

खराब बाह्यवळणने केडगावमध्ये घेतला तीन तासात दोघांचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 13:00 IST

खराब झालेल्या बाह्यवळण मागार्मुळे जडवाहतूक थेट शहरातून घुसत असल्याने आत्तापर्यंत अनेकांचा जीव गेला आहे. आज याच कारणाने केडगावमध्ये अवघ्या तीन तासात दोघांचा जीव गेला.

ठळक मुद्देसर्वपक्षीय रास्तारोकोआजपासून शहरातून जडवाहतूक बंद

केडगाव : खराब झालेल्या बाह्यवळण मागार्मुळे जडवाहतूक थेट शहरातून घुसत असल्याने आत्तापर्यंत अनेकांचा जीव गेला आहे. आज याच कारणाने केडगावमध्ये अवघ्या तीन तासात दोघांचा जीव गेला. जड वाहतुकीने चिरडल्याने लागोपाठ झालेल्या दोन स्वतंत्र अपघातात दोघांना जीव गमावावा लागला. दरम्यान बाह्यवळण दुरुस्तीसाठी सर्वपक्षीय रास्ता रोको करण्यात आल्याने आजपासून जडवाहतूक शहरातून बंद करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला.आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास केडगाव येथील कल्याण विठोबा अनभुले (वय ६१) यांना केडगाव वेशीसमोर जड वाहनाने धडक दिल्याने ते जागीच मरण पावले. या घटनेला तीन तास लोटत नाहीत तोच सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास अनामिका अविनाश गायकवाड (वय २१) या तरुणीला अंबिकानगर बसस्थानका शेजारी जड वाहनाने चिरडले त्यात ती जागेवरच गतप्राण झाली. दरम्यान हि घटना घडल्यानंतर केडगाव मधील जमाव घटनास्थळी जमा झाला. दरम्यान पहाटे अपघातात मरण पावलेले अनभुले सेवानिवृत्त बांधकाम विभागातील कर्मचारी होते.तर अनामिका हि पुण्यात केंद्रीय विद्यालयात शिकत होती. ती नगरमध्ये क्लाससाठी चालली होती.सर्वपक्षीय रास्तारोकोसर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी नगर-पुणे मार्गावर ठिय्या देत रास्ता रोको सुरु केला. यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्ण ठप्प झाली. जोपर्यंत जडवाहतूक शहरातून बंद होत नाही. तोपर्यंत आम्ही जागेवरून उठणार नसल्याने आंदोलन चिघळले. संतप्त नागरिक यात सहभागी झाले. अखेर कोतवालीचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे व वाहतूक निरीक्षक अविनाश मोरे यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेऊन त्यांशी चर्चा केली. मात्र जोपर्यंत बाह्यवळण रस्ता सुरु होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही अशी भूमिका घेण्यात आली.य ानंतर पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याशी मोबाईलवर चर्चा करण्यात आली. आजपासून शहर हद्दीतून जडवाहतूक वाहतुकीस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात नगरसेवक दिलीप सातपुते, माजी नगरसेवक अंबादास गारुडकर, शिवाजी लोंढे, संजय लोंढे, मनोज कोतकर ,भूषण गुंड, अमोल येवले, हर्षवर्धन कोतकर,विजय पठारे आदी सहभागी झाले होते.बाह्यवळण प्रश्नी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकबाह्यवळण खराब असल्याने सर्व जड वाहतूक शहरातून वाहतूक करते. यामुळे अलीकडे अपघातांची संख्या वाढली आहे. जोपर्यंत बाह्यवळण मार्ग वाहतुकीस खुला होत नाही तोपर्यंत असे अपघात होतच राहणार. यामुळे हा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वपक्षीय बैठक घेण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांनी सांगितले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीसahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय