शहरं
Join us  
Trending Stories
1
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
2
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
3
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
4
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
5
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
6
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
8
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
9
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
10
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
11
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
12
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
13
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
14
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
15
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
16
मंगळ गोचर २०२५: २७ ऑक्टोबर रोजी मंगळ गोचर; पुढचे दोन महिने 'या' ५ राशींसाठी असणार खास!
17
देशभरात इन्व्हेस्टमेंट स्कॅमचे जाळे; सहा महिन्यांत 30 हजार लोकांची फसवणूक, ₹1500 कोटी लुटले
18
पश्चिम सीमेवर भारताचे तिन्ही सैन्य दल पाकिस्तानची झोप उडवणार; NOTAM जारी, १२ दिवस काय घडणार?
19
LIC वर अदानी समूहात गुंतवणुकीसाठी सरकारी दबाव? वॉशिंग्टन पोस्टच्या दाव्याचे कंपनीने केले खंडन
20
Rohit Sharma Century: रोहितचा मोठा धमाका! सिडनीच्या मैदानात साजरं केलं शतकांचं 'अर्धशतक'

खराब बाह्यवळणने केडगावमध्ये घेतला तीन तासात दोघांचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 13:00 IST

खराब झालेल्या बाह्यवळण मागार्मुळे जडवाहतूक थेट शहरातून घुसत असल्याने आत्तापर्यंत अनेकांचा जीव गेला आहे. आज याच कारणाने केडगावमध्ये अवघ्या तीन तासात दोघांचा जीव गेला.

ठळक मुद्देसर्वपक्षीय रास्तारोकोआजपासून शहरातून जडवाहतूक बंद

केडगाव : खराब झालेल्या बाह्यवळण मागार्मुळे जडवाहतूक थेट शहरातून घुसत असल्याने आत्तापर्यंत अनेकांचा जीव गेला आहे. आज याच कारणाने केडगावमध्ये अवघ्या तीन तासात दोघांचा जीव गेला. जड वाहतुकीने चिरडल्याने लागोपाठ झालेल्या दोन स्वतंत्र अपघातात दोघांना जीव गमावावा लागला. दरम्यान बाह्यवळण दुरुस्तीसाठी सर्वपक्षीय रास्ता रोको करण्यात आल्याने आजपासून जडवाहतूक शहरातून बंद करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला.आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास केडगाव येथील कल्याण विठोबा अनभुले (वय ६१) यांना केडगाव वेशीसमोर जड वाहनाने धडक दिल्याने ते जागीच मरण पावले. या घटनेला तीन तास लोटत नाहीत तोच सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास अनामिका अविनाश गायकवाड (वय २१) या तरुणीला अंबिकानगर बसस्थानका शेजारी जड वाहनाने चिरडले त्यात ती जागेवरच गतप्राण झाली. दरम्यान हि घटना घडल्यानंतर केडगाव मधील जमाव घटनास्थळी जमा झाला. दरम्यान पहाटे अपघातात मरण पावलेले अनभुले सेवानिवृत्त बांधकाम विभागातील कर्मचारी होते.तर अनामिका हि पुण्यात केंद्रीय विद्यालयात शिकत होती. ती नगरमध्ये क्लाससाठी चालली होती.सर्वपक्षीय रास्तारोकोसर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी नगर-पुणे मार्गावर ठिय्या देत रास्ता रोको सुरु केला. यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्ण ठप्प झाली. जोपर्यंत जडवाहतूक शहरातून बंद होत नाही. तोपर्यंत आम्ही जागेवरून उठणार नसल्याने आंदोलन चिघळले. संतप्त नागरिक यात सहभागी झाले. अखेर कोतवालीचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे व वाहतूक निरीक्षक अविनाश मोरे यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेऊन त्यांशी चर्चा केली. मात्र जोपर्यंत बाह्यवळण रस्ता सुरु होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही अशी भूमिका घेण्यात आली.य ानंतर पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याशी मोबाईलवर चर्चा करण्यात आली. आजपासून शहर हद्दीतून जडवाहतूक वाहतुकीस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात नगरसेवक दिलीप सातपुते, माजी नगरसेवक अंबादास गारुडकर, शिवाजी लोंढे, संजय लोंढे, मनोज कोतकर ,भूषण गुंड, अमोल येवले, हर्षवर्धन कोतकर,विजय पठारे आदी सहभागी झाले होते.बाह्यवळण प्रश्नी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकबाह्यवळण खराब असल्याने सर्व जड वाहतूक शहरातून वाहतूक करते. यामुळे अलीकडे अपघातांची संख्या वाढली आहे. जोपर्यंत बाह्यवळण मार्ग वाहतुकीस खुला होत नाही तोपर्यंत असे अपघात होतच राहणार. यामुळे हा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वपक्षीय बैठक घेण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांनी सांगितले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीसahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय