शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

कोतूळ पुलाच्या कामाला लागला लगाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:26 IST

कोतूळ : कोतूळ येथील मुळा नदीवरील वीस कोटी रुपयांच्या पुलाच्या कामाची वर्क ऑर्डर होऊन एक वर्ष पूर्ण झाले. ठेकेदाराने ...

कोतूळ : कोतूळ येथील मुळा नदीवरील वीस कोटी रुपयांच्या पुलाच्या कामाची वर्क ऑर्डर होऊन एक वर्ष पूर्ण झाले. ठेकेदाराने यंत्र व कामगारही आणले. मात्र, जलसंपदाच्या व्यवस्थापन विभागाने अर्धवट पाणी सोडून पुलाच्या कामाला लगाम लावला. हे काम कोणी व का अडविले यावर संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.

कोतूळ येथील नागरिकांनी सातत्याने चार वर्षे आंदोलने, बैठा सत्याग्रह, मंत्री अन् अधिकाऱ्यांचे उंबरे झिजवून वीस कोटी रुपयांचा पूल पदरात पाडून घेतला. जानेवारी महिन्यात लोकमतने ‘पुलाचे घोडे अडले कुठे?’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध करताच ठेकेदाराने तातडीने पोकलेन मशीन, कामगार व शेड उभ्या केल्या. फेब्रुवारी महिन्यात पहिले आवर्तन सुटल्यावर निविदेत नमूद केल्याप्रमाणे ६५३ तलांक रेषेपर्यंत काम सुरू करण्याचे जलसंपदाचे आदेश आहेत.

फेब्रुवारी महिन्यात कोतूळ येथे आमदार डाॅ. किरण लहामटे यांच्या उपस्थितीत पिंपळगाव खांड धरण कालवा सल्लागार समितीची आवर्तन बैठक पार पडली. त्यात मागणीनुसार पाणी सोडण्याचा निर्णय झाला. त्यानुसार पाणीही सोडले. मात्र, कोतूळ पुलाचे काम करण्यासाठी शासनाने निविदेत ठेकेदाराशी केलेल्या कराराइतके पाणी सोडले जाईल व काम सुरू होईल अशी अपेक्षा होती. मात्र, जलसंपदा व्यवस्थापन विभागाने अपेक्षित पाणी न सोडल्याने कोतूळ पुलाचे काम थांबले आहे.

पिंपळगाव खांड धरणाच्या आतील शेतकऱ्यांना अंबित, बलठण, देवहंडी या जलाशयातून दोन आवर्तने निश्चित आहेत तर खालच्या लाभक्षेत्रात कोतूळ जुना पुल रिकामा झाल्यावरही दोन आवर्तने होतात. हे पाणी आभाळवाडीपर्यंत जून महिन्यापर्यंत पुरते.

राजकीय इच्छाशक्ती असेल तर जलसंपदा व कालवा सल्लागार समितीने योग्य नियोजन केल्यास पूलही होईल व लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनाही पाणी मिळेल. मात्र, सध्या पुलाचे काम सुरूच होणार नाही इतके पाणी सोडून जलसंपदाने पुलाच्या कामाला लगाम लावला आहे. हा लगाम अधिकाऱ्यांनी की राजकीय इच्छाशक्तीने लावला याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहेत. यावर्षी काम सुरू न झाल्यास पिंपरकणे पुलासारखी कोतूळची अवस्था होईल हे निश्चित आहे

...........................

नान्नोर यांचा प्रतिसाद नाही

जलसंपदा व्यवस्थापन विभागाचे शाखा अभियंता जी. जी. नान्नोर यांच्याशी याबाबत चौकशी करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

.....................

पुलाचे काम धरणातील पाणी सील लेव्हलला गेल्यावरच सुरू करता येईल. मार्च महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात दुसरे आवर्तन केल्यास काम सुरू करता येईल. पुलाचे काम दोन वर्षात पूर्ण होईपर्यंत योग्य पाणी नियोजन व जनतेचे सहकार्य अपेक्षित आहे.

- संदीप देशमुख, शाखा अभियंता, जलसंपदा, स्थापत्य

................

दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात कोतूळ पूल रिकामा होतो. इतके पाणी आभाळवाडीपर्यंत सोडले जाते. यंदा मात्र कोतूळ पुलावर चार ते पाच फूट पाणी असतानाच पाणी बंद केले. लोकप्रतिनिधींना कुणीतरी चुकीची माहिती देत आहे. कोतूळ पुलाच्या कामाला कुणीही जाणीवपूर्वक आडकाठी करू नये.

-अरविंद देशमुख, अध्यक्ष, पूल कृती समिती.

(२६कोतू‌ळ)