शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

कोतूळ पुलाच्या कामाला लागला लगाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:26 IST

कोतूळ : कोतूळ येथील मुळा नदीवरील वीस कोटी रुपयांच्या पुलाच्या कामाची वर्क ऑर्डर होऊन एक वर्ष पूर्ण झाले. ठेकेदाराने ...

कोतूळ : कोतूळ येथील मुळा नदीवरील वीस कोटी रुपयांच्या पुलाच्या कामाची वर्क ऑर्डर होऊन एक वर्ष पूर्ण झाले. ठेकेदाराने यंत्र व कामगारही आणले. मात्र, जलसंपदाच्या व्यवस्थापन विभागाने अर्धवट पाणी सोडून पुलाच्या कामाला लगाम लावला. हे काम कोणी व का अडविले यावर संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.

कोतूळ येथील नागरिकांनी सातत्याने चार वर्षे आंदोलने, बैठा सत्याग्रह, मंत्री अन् अधिकाऱ्यांचे उंबरे झिजवून वीस कोटी रुपयांचा पूल पदरात पाडून घेतला. जानेवारी महिन्यात लोकमतने ‘पुलाचे घोडे अडले कुठे?’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध करताच ठेकेदाराने तातडीने पोकलेन मशीन, कामगार व शेड उभ्या केल्या. फेब्रुवारी महिन्यात पहिले आवर्तन सुटल्यावर निविदेत नमूद केल्याप्रमाणे ६५३ तलांक रेषेपर्यंत काम सुरू करण्याचे जलसंपदाचे आदेश आहेत.

फेब्रुवारी महिन्यात कोतूळ येथे आमदार डाॅ. किरण लहामटे यांच्या उपस्थितीत पिंपळगाव खांड धरण कालवा सल्लागार समितीची आवर्तन बैठक पार पडली. त्यात मागणीनुसार पाणी सोडण्याचा निर्णय झाला. त्यानुसार पाणीही सोडले. मात्र, कोतूळ पुलाचे काम करण्यासाठी शासनाने निविदेत ठेकेदाराशी केलेल्या कराराइतके पाणी सोडले जाईल व काम सुरू होईल अशी अपेक्षा होती. मात्र, जलसंपदा व्यवस्थापन विभागाने अपेक्षित पाणी न सोडल्याने कोतूळ पुलाचे काम थांबले आहे.

पिंपळगाव खांड धरणाच्या आतील शेतकऱ्यांना अंबित, बलठण, देवहंडी या जलाशयातून दोन आवर्तने निश्चित आहेत तर खालच्या लाभक्षेत्रात कोतूळ जुना पुल रिकामा झाल्यावरही दोन आवर्तने होतात. हे पाणी आभाळवाडीपर्यंत जून महिन्यापर्यंत पुरते.

राजकीय इच्छाशक्ती असेल तर जलसंपदा व कालवा सल्लागार समितीने योग्य नियोजन केल्यास पूलही होईल व लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनाही पाणी मिळेल. मात्र, सध्या पुलाचे काम सुरूच होणार नाही इतके पाणी सोडून जलसंपदाने पुलाच्या कामाला लगाम लावला आहे. हा लगाम अधिकाऱ्यांनी की राजकीय इच्छाशक्तीने लावला याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहेत. यावर्षी काम सुरू न झाल्यास पिंपरकणे पुलासारखी कोतूळची अवस्था होईल हे निश्चित आहे

...........................

नान्नोर यांचा प्रतिसाद नाही

जलसंपदा व्यवस्थापन विभागाचे शाखा अभियंता जी. जी. नान्नोर यांच्याशी याबाबत चौकशी करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

.....................

पुलाचे काम धरणातील पाणी सील लेव्हलला गेल्यावरच सुरू करता येईल. मार्च महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात दुसरे आवर्तन केल्यास काम सुरू करता येईल. पुलाचे काम दोन वर्षात पूर्ण होईपर्यंत योग्य पाणी नियोजन व जनतेचे सहकार्य अपेक्षित आहे.

- संदीप देशमुख, शाखा अभियंता, जलसंपदा, स्थापत्य

................

दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात कोतूळ पूल रिकामा होतो. इतके पाणी आभाळवाडीपर्यंत सोडले जाते. यंदा मात्र कोतूळ पुलावर चार ते पाच फूट पाणी असतानाच पाणी बंद केले. लोकप्रतिनिधींना कुणीतरी चुकीची माहिती देत आहे. कोतूळ पुलाच्या कामाला कुणीही जाणीवपूर्वक आडकाठी करू नये.

-अरविंद देशमुख, अध्यक्ष, पूल कृती समिती.

(२६कोतू‌ळ)