शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

कोतूळ पुलाच्या कामाला लागला लगाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:26 IST

कोतूळ : कोतूळ येथील मुळा नदीवरील वीस कोटी रुपयांच्या पुलाच्या कामाची वर्क ऑर्डर होऊन एक वर्ष पूर्ण झाले. ठेकेदाराने ...

कोतूळ : कोतूळ येथील मुळा नदीवरील वीस कोटी रुपयांच्या पुलाच्या कामाची वर्क ऑर्डर होऊन एक वर्ष पूर्ण झाले. ठेकेदाराने यंत्र व कामगारही आणले. मात्र, जलसंपदाच्या व्यवस्थापन विभागाने अर्धवट पाणी सोडून पुलाच्या कामाला लगाम लावला. हे काम कोणी व का अडविले यावर संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.

कोतूळ येथील नागरिकांनी सातत्याने चार वर्षे आंदोलने, बैठा सत्याग्रह, मंत्री अन् अधिकाऱ्यांचे उंबरे झिजवून वीस कोटी रुपयांचा पूल पदरात पाडून घेतला. जानेवारी महिन्यात लोकमतने ‘पुलाचे घोडे अडले कुठे?’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध करताच ठेकेदाराने तातडीने पोकलेन मशीन, कामगार व शेड उभ्या केल्या. फेब्रुवारी महिन्यात पहिले आवर्तन सुटल्यावर निविदेत नमूद केल्याप्रमाणे ६५३ तलांक रेषेपर्यंत काम सुरू करण्याचे जलसंपदाचे आदेश आहेत.

फेब्रुवारी महिन्यात कोतूळ येथे आमदार डाॅ. किरण लहामटे यांच्या उपस्थितीत पिंपळगाव खांड धरण कालवा सल्लागार समितीची आवर्तन बैठक पार पडली. त्यात मागणीनुसार पाणी सोडण्याचा निर्णय झाला. त्यानुसार पाणीही सोडले. मात्र, कोतूळ पुलाचे काम करण्यासाठी शासनाने निविदेत ठेकेदाराशी केलेल्या कराराइतके पाणी सोडले जाईल व काम सुरू होईल अशी अपेक्षा होती. मात्र, जलसंपदा व्यवस्थापन विभागाने अपेक्षित पाणी न सोडल्याने कोतूळ पुलाचे काम थांबले आहे.

पिंपळगाव खांड धरणाच्या आतील शेतकऱ्यांना अंबित, बलठण, देवहंडी या जलाशयातून दोन आवर्तने निश्चित आहेत तर खालच्या लाभक्षेत्रात कोतूळ जुना पुल रिकामा झाल्यावरही दोन आवर्तने होतात. हे पाणी आभाळवाडीपर्यंत जून महिन्यापर्यंत पुरते.

राजकीय इच्छाशक्ती असेल तर जलसंपदा व कालवा सल्लागार समितीने योग्य नियोजन केल्यास पूलही होईल व लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनाही पाणी मिळेल. मात्र, सध्या पुलाचे काम सुरूच होणार नाही इतके पाणी सोडून जलसंपदाने पुलाच्या कामाला लगाम लावला आहे. हा लगाम अधिकाऱ्यांनी की राजकीय इच्छाशक्तीने लावला याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहेत. यावर्षी काम सुरू न झाल्यास पिंपरकणे पुलासारखी कोतूळची अवस्था होईल हे निश्चित आहे

...........................

नान्नोर यांचा प्रतिसाद नाही

जलसंपदा व्यवस्थापन विभागाचे शाखा अभियंता जी. जी. नान्नोर यांच्याशी याबाबत चौकशी करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

.....................

पुलाचे काम धरणातील पाणी सील लेव्हलला गेल्यावरच सुरू करता येईल. मार्च महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात दुसरे आवर्तन केल्यास काम सुरू करता येईल. पुलाचे काम दोन वर्षात पूर्ण होईपर्यंत योग्य पाणी नियोजन व जनतेचे सहकार्य अपेक्षित आहे.

- संदीप देशमुख, शाखा अभियंता, जलसंपदा, स्थापत्य

................

दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात कोतूळ पूल रिकामा होतो. इतके पाणी आभाळवाडीपर्यंत सोडले जाते. यंदा मात्र कोतूळ पुलावर चार ते पाच फूट पाणी असतानाच पाणी बंद केले. लोकप्रतिनिधींना कुणीतरी चुकीची माहिती देत आहे. कोतूळ पुलाच्या कामाला कुणीही जाणीवपूर्वक आडकाठी करू नये.

-अरविंद देशमुख, अध्यक्ष, पूल कृती समिती.

(२६कोतू‌ळ)