शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कोपरगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा : आमदार स्नेहलता कोल्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 15:35 IST

चालू पावसाळी हंगामात कोपरगाव तालुक्यात पाऊसच झाला नाही. त्यामुळे खरीप पिकांचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले आहे.

कोपरगाव : चालू पावसाळी हंगामात कोपरगाव तालुक्यात पाऊसच झाला नाही. त्यामुळे खरीप पिकांचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यासाठी ट्रीगर वन लागू करावा. म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. शासनांने पहिल्या टप्प्यात सर्कलनिहाय राज्यातील दुष्काळी जिल्हे जाहीर केले. तेव्हा त्याच्या दुस-या सर्व्हेक्षणात कोपरगाव तालुक्याचा दुष्काळात समावेश करून त्याबाबत शेतकरी व नागरिकांना असणां-या सोयी सुविधा द्याव्यात, अशी मागणी महसूलमंत्री तथा कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.गोदावरी कालव्यांना पिण्यांच्या पाण्यांबरोबरच शेती सिंचनाचे आर्वतन सोडावे व नमुना नंबर सातचे प्रकटीकरण पाटबंधारे खात्यास काढण्यास सांगावे अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे शनिवारी शिर्डी दौ-यावर आले असता त्यांच्याशी साई विश्रामगृहात भेट घेवुन शेतक-यांसह हे निवेदन दिले. सध्या विरोधक दुष्काळाचे राजकारण करून युती शासनाला बदनाम करू पहात आहे. शासनाने सर्कलनिहाय राज्यातील दुष्काळी तालुके जाहिर केले आहे, मात्र त्यात कोपरगावचा समावेश नाही. पोहेगाव व दहेगाव बोलका सर्कलमध्ये गंभीर परिस्थिती असत्यांने तेथील शेतक-यांना दुष्काळाच्या योजनांचा लाभ होईल, असे प्राथमिक स्तरावर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले. तेव्हा संपुर्ण तालुकाच दुष्काळात होरपळत आहे. ऐन दिवाळीतच येथे नागरिकांना व जनावरांना पिण्यांच्या पाण्यांची टंचाई निर्माण झाली आहे. तेव्हा येथील शेतक-यांसह अन्य घटकांना याचा लाभ मिळालाच पाहिजे. त्यासाठी कोपरगाव तालुका दुष्काळी जाहिर करावा. त्याबाबत संबंधीत अधिका-यांना सूचना व्हाव्यात असे आमदार कोल्हे म्हणाल्या. रांजणगाव देशमुख प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा धोंडेवाडी पाझर तलाव चालु आर्वतनांत दुष्काळी स्थितीत भरून मिळावा अशी मागणीही आमदार कोल्हे यांनी केली.

 

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर