शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

कोपरगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा : आमदार स्नेहलता कोल्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 15:35 IST

चालू पावसाळी हंगामात कोपरगाव तालुक्यात पाऊसच झाला नाही. त्यामुळे खरीप पिकांचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले आहे.

कोपरगाव : चालू पावसाळी हंगामात कोपरगाव तालुक्यात पाऊसच झाला नाही. त्यामुळे खरीप पिकांचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यासाठी ट्रीगर वन लागू करावा. म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. शासनांने पहिल्या टप्प्यात सर्कलनिहाय राज्यातील दुष्काळी जिल्हे जाहीर केले. तेव्हा त्याच्या दुस-या सर्व्हेक्षणात कोपरगाव तालुक्याचा दुष्काळात समावेश करून त्याबाबत शेतकरी व नागरिकांना असणां-या सोयी सुविधा द्याव्यात, अशी मागणी महसूलमंत्री तथा कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.गोदावरी कालव्यांना पिण्यांच्या पाण्यांबरोबरच शेती सिंचनाचे आर्वतन सोडावे व नमुना नंबर सातचे प्रकटीकरण पाटबंधारे खात्यास काढण्यास सांगावे अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे शनिवारी शिर्डी दौ-यावर आले असता त्यांच्याशी साई विश्रामगृहात भेट घेवुन शेतक-यांसह हे निवेदन दिले. सध्या विरोधक दुष्काळाचे राजकारण करून युती शासनाला बदनाम करू पहात आहे. शासनाने सर्कलनिहाय राज्यातील दुष्काळी तालुके जाहिर केले आहे, मात्र त्यात कोपरगावचा समावेश नाही. पोहेगाव व दहेगाव बोलका सर्कलमध्ये गंभीर परिस्थिती असत्यांने तेथील शेतक-यांना दुष्काळाच्या योजनांचा लाभ होईल, असे प्राथमिक स्तरावर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले. तेव्हा संपुर्ण तालुकाच दुष्काळात होरपळत आहे. ऐन दिवाळीतच येथे नागरिकांना व जनावरांना पिण्यांच्या पाण्यांची टंचाई निर्माण झाली आहे. तेव्हा येथील शेतक-यांसह अन्य घटकांना याचा लाभ मिळालाच पाहिजे. त्यासाठी कोपरगाव तालुका दुष्काळी जाहिर करावा. त्याबाबत संबंधीत अधिका-यांना सूचना व्हाव्यात असे आमदार कोल्हे म्हणाल्या. रांजणगाव देशमुख प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा धोंडेवाडी पाझर तलाव चालु आर्वतनांत दुष्काळी स्थितीत भरून मिळावा अशी मागणीही आमदार कोल्हे यांनी केली.

 

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर