शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

‘खो-खो’ खेळालाही ग्लॅमर येईल : हेमंत टाकळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 18:19 IST

कबड्डीनंतर आता खो-खो या खेळाचाही एशियन गेम्स्मध्ये समावेश झाल्यामुळे खो-खो खेळालाही ग्लॅमर येईल़

अहमदनगर : कबड्डीनंतर आता खो-खो या खेळाचाही एशियन गेम्स्मध्ये समावेश झाल्यामुळे खो-खो खेळालाही ग्लॅमर येईल़ सध्या खो-खो खेळासाठी प्रायोजक कमी असल्यामुळे या खेळाला अपेक्षित ग्लॅमर लाभले नाही़ पण पुढील काळात खो-खो लीग सुरु झाल्यास या खेळालाही चांगले दिवस येतील, असा विश्वास अर्जुन पुरस्कार विजेते खो-खोपटू व खेलो इंडियाच्या तांत्रिक समितीचे सदस्य हेमंत टाकळकर यांनी व्यक्त केला़नगरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असता टाकळकर यांनी ‘लोकमत’ला भेट दिली़ यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला़ मातीवरुन मॅटवर गेलेल्या खो-खोमधील बदलत्या तंत्रावरही टाकळकर यांनी बोट ठेवले़ ते म्हणाले, खो-खो हा अस्सल भारतीय खेळ आहे़ त्यासाठी मोठा फिटनेस लागतो़ खो-खो हा पाठलागाचा आणि कौशल्याचा खेळ आहे़ पण सध्या खो-खो केवळ पळण्याचा खेळ झाला आहे़ त्यात कौशल्य कमी होत आहे़ पण मातीतल्या खो-खोमध्ये अजूनही ते कौशल्य, थरार टिकून आहे़ मॅटवर इंन्जुरी वाढल्या आहेत़ आधुनिक शुज आले आहेत़ त्यामुळे खेळणे सोपे झाले आहे़ पण कृत्रिम आणि नैसर्गिक खेळ हा फरक यात राहणारच आहे़ मी पूर्वी सात-सात मिनिटे पळती काढायचो़ तशी क्षमता आजच्या खेळाडूंमध्ये दिसत नाही़ आजचा खेळ खूप वेगवान झालाय़ पण कौशल्य हरवले आहे़ खेळाडूंनी कौशल्य आत्मसात करायला हवे़ इतर देशातील खो-खो खेळाडूंनी चांगले कौशल्य आत्मसात केले आहे, असे टाकळकर यांनी सांगितले़ यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते निर्मलचंद्र थोरात उपस्थित होते़‘खो-खो’मध्ये ग्रामीण मुलांचे वर्चस्वखो-खो ग्रामीण भागातील खेळाडूंचा सहभाग मोठा असतो़ त्यांच्यामध्ये चपळाई असते़ विविध स्पर्धांमध्ये ग्रामीण भागातील संघच विजयी झालेले दिसतात़ त्यातुलनेत शहरी खेळाडू कमी पडतात़खेलो इंडियामुळे खेळाडूंना संधीखेलो इंडियामुळे खेळाडूंना चांगली संधी निर्माण झाली आहे़ खेलो इंडियाचे सामने टी़व्ही़वर लाईव्ह दाखवले जातात़ त्यामुळे खेळाला ग्लॅमर प्राप्त होत आहे़ मागील खेलो इंडिया स्पर्धेत खो-खोचे उपांत्य आणि अंतिम सामने टीव्हीवर दाखविले होते़ त्यामुळे खेळाडूंचीही ओळख तयार होत आहे़ पुढील वर्षी ८ ते २० जानेवारी रोजी बालेवाडी (पुणे) येथे खेलो इंडियाच्या स्पर्धा होत आहेत़ या स्पर्धा नवीन खेळाडू घडविण्यात मोलाचे योगदान देतील़

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKho-Khoखो-खो