शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

‘खो-खो’ खेळालाही ग्लॅमर येईल : हेमंत टाकळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 18:19 IST

कबड्डीनंतर आता खो-खो या खेळाचाही एशियन गेम्स्मध्ये समावेश झाल्यामुळे खो-खो खेळालाही ग्लॅमर येईल़

अहमदनगर : कबड्डीनंतर आता खो-खो या खेळाचाही एशियन गेम्स्मध्ये समावेश झाल्यामुळे खो-खो खेळालाही ग्लॅमर येईल़ सध्या खो-खो खेळासाठी प्रायोजक कमी असल्यामुळे या खेळाला अपेक्षित ग्लॅमर लाभले नाही़ पण पुढील काळात खो-खो लीग सुरु झाल्यास या खेळालाही चांगले दिवस येतील, असा विश्वास अर्जुन पुरस्कार विजेते खो-खोपटू व खेलो इंडियाच्या तांत्रिक समितीचे सदस्य हेमंत टाकळकर यांनी व्यक्त केला़नगरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असता टाकळकर यांनी ‘लोकमत’ला भेट दिली़ यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला़ मातीवरुन मॅटवर गेलेल्या खो-खोमधील बदलत्या तंत्रावरही टाकळकर यांनी बोट ठेवले़ ते म्हणाले, खो-खो हा अस्सल भारतीय खेळ आहे़ त्यासाठी मोठा फिटनेस लागतो़ खो-खो हा पाठलागाचा आणि कौशल्याचा खेळ आहे़ पण सध्या खो-खो केवळ पळण्याचा खेळ झाला आहे़ त्यात कौशल्य कमी होत आहे़ पण मातीतल्या खो-खोमध्ये अजूनही ते कौशल्य, थरार टिकून आहे़ मॅटवर इंन्जुरी वाढल्या आहेत़ आधुनिक शुज आले आहेत़ त्यामुळे खेळणे सोपे झाले आहे़ पण कृत्रिम आणि नैसर्गिक खेळ हा फरक यात राहणारच आहे़ मी पूर्वी सात-सात मिनिटे पळती काढायचो़ तशी क्षमता आजच्या खेळाडूंमध्ये दिसत नाही़ आजचा खेळ खूप वेगवान झालाय़ पण कौशल्य हरवले आहे़ खेळाडूंनी कौशल्य आत्मसात करायला हवे़ इतर देशातील खो-खो खेळाडूंनी चांगले कौशल्य आत्मसात केले आहे, असे टाकळकर यांनी सांगितले़ यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते निर्मलचंद्र थोरात उपस्थित होते़‘खो-खो’मध्ये ग्रामीण मुलांचे वर्चस्वखो-खो ग्रामीण भागातील खेळाडूंचा सहभाग मोठा असतो़ त्यांच्यामध्ये चपळाई असते़ विविध स्पर्धांमध्ये ग्रामीण भागातील संघच विजयी झालेले दिसतात़ त्यातुलनेत शहरी खेळाडू कमी पडतात़खेलो इंडियामुळे खेळाडूंना संधीखेलो इंडियामुळे खेळाडूंना चांगली संधी निर्माण झाली आहे़ खेलो इंडियाचे सामने टी़व्ही़वर लाईव्ह दाखवले जातात़ त्यामुळे खेळाला ग्लॅमर प्राप्त होत आहे़ मागील खेलो इंडिया स्पर्धेत खो-खोचे उपांत्य आणि अंतिम सामने टीव्हीवर दाखविले होते़ त्यामुळे खेळाडूंचीही ओळख तयार होत आहे़ पुढील वर्षी ८ ते २० जानेवारी रोजी बालेवाडी (पुणे) येथे खेलो इंडियाच्या स्पर्धा होत आहेत़ या स्पर्धा नवीन खेळाडू घडविण्यात मोलाचे योगदान देतील़

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKho-Khoखो-खो