शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

नगर तालुक्यात खरीप हंगाम धोक्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 18:06 IST

मोठ्या कष्टाने मशागत करून खरिपाची तयारी करत असलेला नगर तालुक्यातील बळिराजा आता पाऊस लांबल्याने चिंतातूर झाला आहे.

ठळक मुद्देपावसाची प्रतीक्षा : पाऊस लांबल्याने पेरण्या खोळंबल्या : शेतकऱ्यांची चिंता वाढली

केडगाव : मोठ्या कष्टाने मशागत करून खरिपाची तयारी करत असलेला नगर तालुक्यातील बळिराजा आता पाऊस लांबल्याने चिंतातूर झाला आहे. पावसाने ओढ दिल्याने तालुक्यात पेरण्या खोळंबल्या आहेत. महागडी बियाणे आणि खते खरेदी करूनही पावसाची प्रतीक्षा होत असल्याने तालुक्यातील सुमारे २१ हजार हेक्टर खरिपाचे नियोजन धोक्यात सापडले आहे.रब्बीचा असणारा नगर तालुका गेल्या काही वर्षांपासून खरीप पिकांकडे वळला आहे. यामुळे तालुक्यातील खरिपाचे क्षेत्र वाढून २१ हजार हेक्टर इतके झाले आहे. पूर्वमोसमी पावसाने नगर तालुक्यात पेरणीयोग्य परिस्थिती तयार होत असते. यंदा मात्र मान्सूनपूर्व पाऊस न झाल्याने खरिपाच्या पेरण्या लांबल्या आहेत. इंधन खर्च वाढल्याने भुर्दंड सोसून शेतकºयांनी शेतीची मशागत केली. महागडी बियाणे व खते खरेदी केली. मात्र पावसाने ओढ दिल्याने पेरणीच्या तयारीत असलेला बळिराजा आता चिंताग्रस्त बनला आहे.तालुक्यात झालेल्या थोड्याफार पावसावर जवळपास २० टक्के शेतकºयांनी पेरण्या करण्याची घाई केली. इतर शेतकरी मात्र समाधानकारक पावसाची व वापसा योग्य जमिनीची वाट पाहत असल्याने त्यांच्या पेरण्या आता लांबल्या आहेत. तालुक्यात बाजरी, मका यांबरोबरच तूर, मूग, भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन, कपासी आदी खरीप पिकांच्या लागवडी होत असतात. शेतकºयांनी पेरणीचे सर्व नियोजन केले असले तरी पाऊस नसल्याने शेतकरी सध्या पावसाची प्रतीक्षा करत आहे.तालुक्यातील खरीपाचे नियोजनएकूण खरीपाचे क्षेत्र २१ हजार ( आकडे हेक्टर मध्ये)बाजरी-१० हजार ६०७, मका- १ हजार ४६१, तूर-१ हजार २२ ,मुग- ३ हजार ८१२, भुईमुग-८७, सुर्यफुल-२०, सोयाबीन-२ हजार ३९ कपासी ५२० .असे जवळपास २ हजार हेक्टर क्षेत्रावर पेंरणीचे नियोजन करण्यात आले आहे.नगर तालुका कृषी विभागाने खरीपाचे नियोजन केले आहे.मात्र पाउस लांबल्याने पेरण्या लांबल्या आहेत..दि.२५ पर्यंत पाउस झाला नाहीतर खरिपाच्या नियोजनावर त्याचा परिणाम होऊ शकतो.खरीप पेरणीचे उद्धीष्ट कमी होऊ शकते.---बाळासाहेब नितनवरे, कृषी अधिकारी, नगर तालुकाइंधन खर्च वाढल्याने जादा खर्च करून आम्ही शेतीची मशागत केली. खते-बियाणे खरेदी केली.मात्र अजून पेरणी योग्य पाउस नसल्याने आमच्या पेरण्या लांबल्या आहेत.लवकर पाऊस झाला नाहीतर हा हंगाम वाया जाणार आहे.यामुळे आधीच आर्थिक संकटात असणारा शेतकरी अजून अडचणीत येईल.-तुषार मेहेत्रे, शेतकरी

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRainपाऊस