शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

नगर तालुक्यात खरीप हंगाम धोक्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 18:06 IST

मोठ्या कष्टाने मशागत करून खरिपाची तयारी करत असलेला नगर तालुक्यातील बळिराजा आता पाऊस लांबल्याने चिंतातूर झाला आहे.

ठळक मुद्देपावसाची प्रतीक्षा : पाऊस लांबल्याने पेरण्या खोळंबल्या : शेतकऱ्यांची चिंता वाढली

केडगाव : मोठ्या कष्टाने मशागत करून खरिपाची तयारी करत असलेला नगर तालुक्यातील बळिराजा आता पाऊस लांबल्याने चिंतातूर झाला आहे. पावसाने ओढ दिल्याने तालुक्यात पेरण्या खोळंबल्या आहेत. महागडी बियाणे आणि खते खरेदी करूनही पावसाची प्रतीक्षा होत असल्याने तालुक्यातील सुमारे २१ हजार हेक्टर खरिपाचे नियोजन धोक्यात सापडले आहे.रब्बीचा असणारा नगर तालुका गेल्या काही वर्षांपासून खरीप पिकांकडे वळला आहे. यामुळे तालुक्यातील खरिपाचे क्षेत्र वाढून २१ हजार हेक्टर इतके झाले आहे. पूर्वमोसमी पावसाने नगर तालुक्यात पेरणीयोग्य परिस्थिती तयार होत असते. यंदा मात्र मान्सूनपूर्व पाऊस न झाल्याने खरिपाच्या पेरण्या लांबल्या आहेत. इंधन खर्च वाढल्याने भुर्दंड सोसून शेतकºयांनी शेतीची मशागत केली. महागडी बियाणे व खते खरेदी केली. मात्र पावसाने ओढ दिल्याने पेरणीच्या तयारीत असलेला बळिराजा आता चिंताग्रस्त बनला आहे.तालुक्यात झालेल्या थोड्याफार पावसावर जवळपास २० टक्के शेतकºयांनी पेरण्या करण्याची घाई केली. इतर शेतकरी मात्र समाधानकारक पावसाची व वापसा योग्य जमिनीची वाट पाहत असल्याने त्यांच्या पेरण्या आता लांबल्या आहेत. तालुक्यात बाजरी, मका यांबरोबरच तूर, मूग, भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन, कपासी आदी खरीप पिकांच्या लागवडी होत असतात. शेतकºयांनी पेरणीचे सर्व नियोजन केले असले तरी पाऊस नसल्याने शेतकरी सध्या पावसाची प्रतीक्षा करत आहे.तालुक्यातील खरीपाचे नियोजनएकूण खरीपाचे क्षेत्र २१ हजार ( आकडे हेक्टर मध्ये)बाजरी-१० हजार ६०७, मका- १ हजार ४६१, तूर-१ हजार २२ ,मुग- ३ हजार ८१२, भुईमुग-८७, सुर्यफुल-२०, सोयाबीन-२ हजार ३९ कपासी ५२० .असे जवळपास २ हजार हेक्टर क्षेत्रावर पेंरणीचे नियोजन करण्यात आले आहे.नगर तालुका कृषी विभागाने खरीपाचे नियोजन केले आहे.मात्र पाउस लांबल्याने पेरण्या लांबल्या आहेत..दि.२५ पर्यंत पाउस झाला नाहीतर खरिपाच्या नियोजनावर त्याचा परिणाम होऊ शकतो.खरीप पेरणीचे उद्धीष्ट कमी होऊ शकते.---बाळासाहेब नितनवरे, कृषी अधिकारी, नगर तालुकाइंधन खर्च वाढल्याने जादा खर्च करून आम्ही शेतीची मशागत केली. खते-बियाणे खरेदी केली.मात्र अजून पेरणी योग्य पाउस नसल्याने आमच्या पेरण्या लांबल्या आहेत.लवकर पाऊस झाला नाहीतर हा हंगाम वाया जाणार आहे.यामुळे आधीच आर्थिक संकटात असणारा शेतकरी अजून अडचणीत येईल.-तुषार मेहेत्रे, शेतकरी

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRainपाऊस