शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राहुरीच्या तनपुरे कारखान्याने न्यायालयाच्या आदेशाला दाखवली केराची टोपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 14:02 IST

राहुरी येथील डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्यातून २०११ मध्ये सात कर्मचारी सेवानिवृत्त झाले. या कर्मचा-यांना कारखाना प्रशासनाने निवृत्तीच्या वेळी विविध रकमा देणे गृहित होते. मात्र कारखाना प्रशासनाने रकमा दिल्या नाहीत.

ठळक मुद्देकामगारांच्या रकमा जमा नाहीत

अहमदनगर : राहुरी येथील डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्यातून २०११ मध्ये सात कर्मचारी सेवानिवृत्त झाले. या कर्मचा-यांना कारखाना प्रशासनाने निवृत्तीच्या वेळी विविध रकमा देणे गृहित होते. मात्र कारखाना प्रशासनाने रकमा दिल्या नाहीत. त्यानंतर हे कर्मचारी कामगार न्यायालयात गेले. न्यायालयाने देय रकमा जमा करण्याचे आदेशही दिले. मात्र कारखाना प्रशासनाने न्यायालयाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवत अद्यापपर्यत रकमा जमा केल्या नाहीत.तनपुरे कारखान्यातून सावळेराम पांडुरंग भुजाडी, सोन्याबापू जनार्दन सागर, आसाराम नामदेव साळवे, सुर्यकांत बाबुराव कोरडे, बन्सी कोंडाजी गाडे, गोविंद पांडुरंग काळे, चांगदेव वाळुंज हे २०११ मध्ये सेवानिवृत्त झाले. या सातही कर्मचा-यांनी सेवानिवृत्तीच्या वेळी कोणत्याही प्रकारच्या देय रकमा कारखान्याकडून मिळाल्या नाहीत. यानंतर हे सातही कर्मचा-यांनी कामगार न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर कारखाना प्रशासनाने या कर्मचा-यांची पेन्शनही बंद केली. त्यानंतर २०१४ मध्ये न्यायालयाने कर्मचा-यांच्या बाजूने न्याय देत रकमा जमा करण्याचे आदेश दिले. याबाबत जिल्हाधिका-यांना न्यायालयाने आदेश दिले. न्यायालयाच्या निर्णयानुसार सर्वांना कमीत कमी अडीच लाख तर जास्तीत जास्त ९ लाख रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र कारखान्याने अद्यापपर्यत रक्कम जमा केलेली नाही.गेल्या पाच ते सहा वर्षांपासून पैसे मिळण्यासाठी लढत आहे. कारखाना प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी केली मात्र पैसे देण्यास टाळाटाळ केली जात आहे. न्यायालयाच्या लढाईनंतरही यश आले नाही. आता थकल्यामुळे अडीअडचणीचा सामना करावा लागत आहे. आमच्यामधील एका जणाचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे आता आमरण उपोषणाला बसणार आहे. - सोन्याबापू सागर, मल्हारवाडी ता. राहुरी

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी