शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

कर्जत, राशीन, श्रीगोंदा, शेवगावला पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 11:55 IST

अहमदनगर : हवामान खात्याने येत्या तीन दिवसांत पावसाचा अंदाज वर्तवल्यानंतर पहिल्याच दिवशी शुक्रवारी पहाटे पावसाने हजेरी लावली. परंतु केवळ ...

अहमदनगर : हवामान खात्याने येत्या तीन दिवसांत पावसाचा अंदाज वर्तवल्यानंतर पहिल्याच दिवशी शुक्रवारी पहाटे पावसाने हजेरी लावली. परंतु केवळ दक्षिण जिल्ह्यातील तालुक्यांवरच त्याची कृपादृष्टी दिसली. उत्तरेतील तालुके व धरणांचे पाणलोटक्षेत्र मात्र कोरडेच होते. राशीन येथे सर्वाधिक १०७ मिलीमिटर पाऊस नोंदवला गेला.दि. ८ ते १० सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिल्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री व पहाटपासून नगरसह दक्षिणेतील तालुक्यांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. कर्जत तालुक्यात ६० ते ७० मिमी पाऊस झाल्याने वालवड येथील रस्ता खचला. राशीन मंडळात सर्वाधिक १०७ मिमी पावसाची नोंद झाली. या मंडळातील करपडी, परिटवाडी, बाभळगाव, मानेवाडी येथील ओढ्यांना पूर आल्याने त्या गावांचा संपर्क तुटला. श्रीगोंदा येथेही मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. जामखेड येथे रात्री दीडपासून पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे रात्री गायब झालेला वीजपुरवठा सकाळपर्यंत सुरळीत झाला नव्हता.नगर शहर व तालुक्यात रात्रभर रिमझिम सुरू होती. राहुरी, श्रीरामपूर, पारनेर येथेही पावसाला फार जोर नव्हता. शेवगाव, पाथर्डी, नेवासा या तालुक्यांतही २० ते ५० मिमीपर्यंत पाऊस झाला.धरणांत आवक थांबलीअकोले, कोपरगाव, राहाता, संगमनेर या उत्तरेकडील तालुक्यांत पावसाने पाठ फिरवली. येथे शून्य मिमी पावसाची नोंद होती. विशेष म्हणजे अकोल्यासारख्या सर्वाधिक पावसाच्या तालुक्यातही थेंब नव्हता. त्यामुळे मुळा, भंडारदरा, निळवंडे या धरणांत नवीन पाण्याची आवक झाली नाही.