शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

के. के. रेंजमधील ‘त्या’ २३ गावांचे काय होणार? ग्रामस्थात पुन्हा खळबळ....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 20:43 IST

राहुरी, नगर व पारनेर तालुक्यातील २३ गावांमध्ये के. के रेंज अधिग्रहण होणार असल्याची चर्चा  पुन्हा सुरू झाली आहे. अधिग्रहण होणार नसल्याचे आश्‍वासन राजकीय नेत्यांकडून अनेक वर्षांपासून दिले जात आहे. परंतु मागील दोन महिन्यांपूर्वी सैन्य दलाकडून संबंधित क्षेत्राचे  मूल्याकंन घेतल्यानंतर गावांमध्ये पुन्हा पाहणी सुरू  झाली आहे.

राहुरी : राहुरी, नगर व पारनेर तालुक्यातील २३ गावांमध्ये के. के रेंज अधिग्रहण होणार असल्याची चर्चा  पुन्हा सुरू झाली आहे. अधिग्रहण होणार नसल्याचे आश्‍वासन राजकीय नेत्यांकडून अनेक वर्षांपासून दिले जात आहे. परंतु मागील दोन महिन्यांपूर्वी सैन्य दलाकडून संबंधित क्षेत्राचे  मूल्याकंन घेतल्यानंतर गावांमध्ये पुन्हा पाहणी सुरू  झाली आहे.

जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून के. के. रेंजचा प्रश्‍न संपुष्टात आणण्याचे आश्‍वासन दिले आहे. यामुळे २३ गावातील ग्रामस्थांनी काळजी न करण्याचे आवाहन गाडे यांनी केले आहे.

        जिल्ह्यामध्ये १९५६ पासून सुमारे ४० हजार हेक्टर क्षेत्रावर सैन्य दलाकडून के.के. रेंज क्षेत्रावर सराव करीत आहे. १९८० पासून के.के. रेंज आर-२ मध्ये राहुरी, नगर व पारनेर या तीन तालुक्यातील २३ गावांमधील २५ हजार ६१९ हेक्टर क्षेत्र अधिग्रहीत करण्यात आलेली आहे. सदरचे क्षेत्र हे सुरक्षा क्षेत्र म्हणून जाहिर झाल्यानंतर २००५ मध्ये रेड झोन असा शिक्कामोर्तब करण्यात आला. 

    राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही जिल्हाधिकारी कार्यालयात के.के. रेंज बाबत बैठक घेत अधिग्रहण होऊ देणार नसल्याचे स्पष्ट केले होते. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचे आश्‍वासन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले आहे.

 दरम्यान सैन्य दलाच्या अधिका-यांंनी केलेल्या  पाहणीमुळे २३ गावांमध्ये अधिग्रहणाची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. भारतीय सैन्य दलाकडून अधिग्रहण होणार नसेल तर मालमत्तेची माहिती, मूल्याकंन तसेच पाहणी कशासाठी केली जात आहे? असा प्रश्‍न  ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.    राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत नगरपालिकेच्या सभागृहांमध्ये बारागाव नांदूरचे सरपंच यांची बैठक झाली. बैठकीमध्ये के. के. रेंजसंदर्भात विचार विनिमय करण्यात आला.   सैन्य दलाच्या अधिकाºयांनी केलेल्या पाहणी संदर्भात आम्हाला अधिक माहिती मिळू शकली नाही, असे राहुरीचे तहसीलदार एफ.आर. शेख यांंनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी