शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
3
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
4
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
5
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
6
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
7
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
8
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
9
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
10
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
11
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
12
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
13
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
14
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
15
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
16
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
17
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
18
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
19
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
20
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप

के. के. रेंज  : भूसंपादन नाही, पण नोटिफिकेशनची टांगती तलवार कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 12:40 IST

नगररचना विभागाकडे या २३ गावांतील क्षेत्राची रेड झोन म्हणून नोंद असल्याने या गावांत बांधकामाला अथवा शेती बिगरशेती करण्यास परवानगी मिळत नाही. कधीही हे क्षेत्र संपादित केले जाईल ही भीती शेतकºयांना आहे. त्यातच लष्कराने मध्यंतरी एक पाहणी केल्यामुळे या गावांत भूसंपादन केले जाणार अशी चर्चा सुरु झाली होती. 

विश्लेषण/सुधीर लंके

अहमदनगर : नगर, राहुरी व पारनेर या तीन तालुक्यांच्या सीमारेषेवरील के.के. रेंज या लष्कराच्या रणगाडा सराव प्रशिक्षण केंद्रासाठी प्रस्तावित २३ गावांतील जमीन संपादित केली जाणार नाही, असे नोटिफिकेशन जिल्हाधिकाºयांनी काढल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. मात्र, सरावासाठी या गावांचे क्षेत्र हे पुढील पाच वर्षे आरक्षित राहील, असेही नोटिफिकेशनमध्ये नमूद असल्याने टांगती तलवारही कायम आहे. 

लष्कराच्या या केंद्रासाठी पहिल्या टप्प्यात १९५६ मध्ये जमिनीचे संपादन झालेले असून त्यावर लष्कराचा रणगाडा प्रशिक्षणाचा सराव चालतो. मात्र, नगर तालुक्यातील ६, राहुरीचे १२ व पारनेर तालुक्यातील ५ अशा २३ गावांतील सुमारे २५ हजार ६०० हेक्टर हे क्षेत्र या केंद्रासाठी १९८० पासून नोटिफिकेशनद्वारे दुसºया टप्प्यात आरक्षित करण्यात आले आहे. या दुसºया टप्प्याला आर-२ म्हणून संबोधले जाते. हे वाढीव क्षेत्र देण्यास या गावांचा विरोध आहे. लष्कराने राज्यात इतरत्र असलेली आपली जमीन राज्य सरकारला विविध प्रकल्पांसाठी दिली आहे. त्याबदल्यात या २३ गावांच्या क्षेत्राची मागणी के.के. रेंजसाठी केली आहे. राज्य सरकारने हे भूसंपादन करुन  ही जमीन अद्याप लष्कराला दिलेली नाही. मात्र, दर पाच वर्षांनी नोटिफिकेशन काढून या गावांचे क्षेत्र हे लष्कराच्या सरावासाठी आरक्षित ठेवलेले आहे. 

नगररचना विभागाकडे या २३ गावांतील क्षेत्राची रेड झोन म्हणून नोंद असल्याने या गावांत बांधकामाला अथवा शेती बिगरशेती करण्यास परवानगी मिळत नाही. कधीही हे क्षेत्र संपादित केले जाईल ही भीती शेतकºयांना आहे. त्यातच लष्कराने मध्यंतरी एक पाहणी केल्यामुळे या गावांत भूसंपादन केले जाणार अशी चर्चा सुरु झाली होती. 

याप्रश्नासंदर्भात खासदार डॉ. सुजय विखे यांनी लोकसभेत गत ५ फेब्रुवारीला प्रश्न उपस्थित करत या भूसंपादनाबाबत केंद्र सरकारची भूमिका काय? असा प्रश्न केला आहे. त्यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी दिल्लीत संरक्षणमंत्र्यांचीही भेट घेतली. पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी या प्रश्नावर शरद पवार यांना सोबत घेत संरक्षणमंत्र्यांची भेट घेत भूसंपादनाला विरोध दर्शविलेला आहे. या पाठपुराव्यामुळे भूसंपादन रोखले गेले, अशी लंके यांची भूमिका आहे. 

भूसंपादन होणार नाही, असे प्रशासन म्हणत असले तरी नोटिफिकेशनची टांगती तलवारही कायम असल्याने हा प्रश्न धुमसत राहील. या जमिनीबाबत राज्य सरकार लष्कराला काय निर्णय देते यावरच पुढील भवितव्य ठरेल. 

काय आहे नोटिफिकेशन?४जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गत ८ आॅक्टोबरला नोटिफिकेशन काढत १५ जानेवारी २०२१ ते १४ जानेवारी २०२६ या कालावधीसाठी २३ गावांतील क्षेत्र हे जिवंत दारुगोळ्यासह मैदानी व तोफखाना सराव प्रशिक्षणासाठी राखीव क्षेत्र म्हणून प्रस्तावित केले आहे. या क्षेत्रातील गावे ही सरावासाठी आवश्यक दिवशीच महसूल अधिकाºयांमार्फ त धोकादायक क्षेत्र म्हणून विहीत नोटीस देऊन खाली करण्यात येतील. सदरची कार्यवाही ही भूसंपादनाची/पुनर्वसनाची नसून यापूर्वीप्रमाणे फक्त सराव प्रशिक्षणासाठी सदर क्षेत्र राखीव ठेवण्याबाबत आहे,असे या नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे.  

दर पाच वर्षांनी जिल्हाधिकारी नोटिफिकेशन काढून जमीन लष्करी सरावासाठी आरक्षित ठेवतात. जमीन अधिग्रहीत होत नसली तरी या नोटिफिकेशनमुळे शेतकºयांना या गावांत काहीच विकास करता येत नाही. गत तीस वर्षे ही जमीन आरक्षित असून त्याचा मोबदला शेतकºयांना द्यावा ही मागणी केलेली आहे. जमीन संपादनाची गरज नसेल तर राज्य सरकारने जमीन डिनोटिफाय करावी व पुन्हा पुन्हा नोटिफिकेशन काढू नये. लष्कराने आपल्या इतर जमिनी राज्य सरकारला दिल्याने त्या मोबदल्यात या २३ गावांतील जमिनीची मागणी केली आहे. राज्याने जमिनीपोटीचे पैसे लष्कराला दिल्यास या जमिनींवरचे आरक्षण उठून हा प्रश्न मिटेल.-खासदार सुजय विखे

या जमिनींचे मुल्यांकन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले होते. त्यामुळेच आपण शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली संरक्षणमंत्र्यांची भेट घेऊन भूसंपादनाला विरोध केलेला आहे. पवारांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे प्रशासनाने भूसंपादन न करण्याची भूमिका नोटिफिकेशनमध्ये जाहीर केली.-आमदार निलेश लंके 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरlandslidesभूस्खलन