शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

जांभूळ झाले दुर्मिळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 10:54 IST

औषधी व गुणकारी फळांचा दर्जा असणाऱ्या जांभळाच्या झाडांची संख्या कमालीची घटल्याने हे फळ आता दुर्मिळ बनत आहे. जुन्या झाडांची झालेली तोड आणि नव्या झाडांच्या लागवडीकडे कल कमी झाल्याने फळांच्या बाजारातून जांभूळ जवळपास गायब होण्याच्या मार्गावर आहे. नगरच्या फळांच्या बाजारातही जांभूळ दिसेनासे झाले आहे

योगेश गुंडकेडगाव : औषधी व गुणकारी फळांचा दर्जा असणाऱ्या जांभळाच्या झाडांची संख्या कमालीची घटल्याने हे फळ आता दुर्मिळ बनत आहे. जुन्या झाडांची झालेली तोड आणि नव्या झाडांच्या लागवडीकडे कल कमी झाल्याने फळांच्या बाजारातून जांभूळ जवळपास गायब होण्याच्या मार्गावर आहे. नगरच्या फळांच्या बाजारातही जांभूळ दिसेनासे झाले आहे.पूर्वी पाऊस पडायला सुरुवात झाली की जांभळाच्या झाडाखाली फळांचा सडा पडत असे. बाजारातही या फळांच्या विक्रेत्यांची मोठी संख्या असायची.आंबट-गोड चवीची ही फळे ग्राहकांना नेहमीच आकर्षित करत.अनेकांना रोजगार या फळांच्या विक्रीतून मिळत. मात्र अनेक आजारांवर गुणकारी समजले जाणारे आणि औषधी फळांची मान्यता लाभलेले जांभूळ आता बाजारात तर दिसेनासे झाले आहे. फळविक्रेत्यांकडेही जांभूळ विक्रीसाठी दिसत नाही.नगरच्या फळांच्या बाजारात या फळांची आवक कमालीची घटल्याचे सांगण्यात आले. सध्या ठोक बाजारात जांभळाला १०० रुपये किलो तर किरकोळ बाजारात १६० रुपये किलो भाव आहे. नगरच्या बाजारात काही मोजके शेतकरीच जांभूळ विक्रीसाठी आणत आहेत. फळांच्या बाजारातच या फळाची आवक घटत चालल्याने ग्राहकांना या फळाचे दर्शनही दुर्लभ झाले आहे.पूर्वी शेताच्या बांधावर जांभळाच्या झाडांची लागवड होत असत. शेतीचे आकार लहान होत गेले तशी जांभळाची झाडेही कमी होत गेली .संपूर्ण नगर तालुक्यात एक-दोन शेतकºयांकडे जांभळाच्या थोड्याफार बागा आहेत. मुळात जांभूळ बागांच्या लागवडीकडे दुर्लक्ष होत गेल्याने झाडांची संख्या आणि आता पर्यायाने फळांची संख्या घटू लागली आहे.जांभूळ हे नाजूक फळ असल्याने झाडावरून खाली पडले तरी खराब होऊन जाते.यामुळे त्याची तोडणी नाजूकपणे करावी लागते.एक-एक फळ तोडून त्याची काढणी करावी लागते.जांभळातील उपयोगी घटकप्रोटीन, फॅट, मिनरल, फायबर,कार्बोहायड्रेट्स,कॅल्शियम,फॉस्फरस ,आयर्न, कैलोरीफिक .डायबेटीससाठी वरदानजांभूळ फळांच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते याबरोबरच शरीरातील जवळपास १२ आजारांसाठी आयुर्वेदात जांभळाचे उपयोग सांगितले आहेत. औषधी फळ म्हणून जांभळाला मान्यता आहे.मी रोज १० क्रे ट जांभळाचे फळे नगरच्या बाजारात विक्रीसाठी नेतो. मात्र नगरपेक्षा मुंबई-पुण्याच्या बाजारात या फळांना जास्त मागणी आहे. सध्या बाजारात या फळांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. नाजूक फळ असल्याने त्याची जास्त काळजी घ्यावी लागते. जास्त कोणी या फळांच्या लागवडीकडे वळत नाही. मुळात जांभळाची बाग ही संकल्पनाच आपल्याकडे अजून रुजली नाही. त्यातच हे झाड लावल्यानंतर खूप उशिराने फळे येतात. इतके वर्षे कोणी थांबण्यास तयार होत नाही. यामुळे या झाडांची लागवड दुर्लक्षित आहे.-अनिलकुमार लांडगे, शेतकरीवातावरणातील बदलामुळे जांभूळ फळांची आवक मोठ्या प्रमाणात घटत आहे.एरव्ही पावसाळा सुरु झाला की फळे बाजारात येण्यास सुरुवात होते. किरकोळ फळांच्या स्टॉलवरही आता जांभूळ पाहण्यास मिळत नाही. सध्या फळांच्या बाजारात जांभूळ दिसेनासे झाले आहे.-अशोक शेळके, फळांचे व्यापारी

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरenvironmentपर्यावरण