शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जांभूळ झाले दुर्मिळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 10:54 IST

औषधी व गुणकारी फळांचा दर्जा असणाऱ्या जांभळाच्या झाडांची संख्या कमालीची घटल्याने हे फळ आता दुर्मिळ बनत आहे. जुन्या झाडांची झालेली तोड आणि नव्या झाडांच्या लागवडीकडे कल कमी झाल्याने फळांच्या बाजारातून जांभूळ जवळपास गायब होण्याच्या मार्गावर आहे. नगरच्या फळांच्या बाजारातही जांभूळ दिसेनासे झाले आहे

योगेश गुंडकेडगाव : औषधी व गुणकारी फळांचा दर्जा असणाऱ्या जांभळाच्या झाडांची संख्या कमालीची घटल्याने हे फळ आता दुर्मिळ बनत आहे. जुन्या झाडांची झालेली तोड आणि नव्या झाडांच्या लागवडीकडे कल कमी झाल्याने फळांच्या बाजारातून जांभूळ जवळपास गायब होण्याच्या मार्गावर आहे. नगरच्या फळांच्या बाजारातही जांभूळ दिसेनासे झाले आहे.पूर्वी पाऊस पडायला सुरुवात झाली की जांभळाच्या झाडाखाली फळांचा सडा पडत असे. बाजारातही या फळांच्या विक्रेत्यांची मोठी संख्या असायची.आंबट-गोड चवीची ही फळे ग्राहकांना नेहमीच आकर्षित करत.अनेकांना रोजगार या फळांच्या विक्रीतून मिळत. मात्र अनेक आजारांवर गुणकारी समजले जाणारे आणि औषधी फळांची मान्यता लाभलेले जांभूळ आता बाजारात तर दिसेनासे झाले आहे. फळविक्रेत्यांकडेही जांभूळ विक्रीसाठी दिसत नाही.नगरच्या फळांच्या बाजारात या फळांची आवक कमालीची घटल्याचे सांगण्यात आले. सध्या ठोक बाजारात जांभळाला १०० रुपये किलो तर किरकोळ बाजारात १६० रुपये किलो भाव आहे. नगरच्या बाजारात काही मोजके शेतकरीच जांभूळ विक्रीसाठी आणत आहेत. फळांच्या बाजारातच या फळाची आवक घटत चालल्याने ग्राहकांना या फळाचे दर्शनही दुर्लभ झाले आहे.पूर्वी शेताच्या बांधावर जांभळाच्या झाडांची लागवड होत असत. शेतीचे आकार लहान होत गेले तशी जांभळाची झाडेही कमी होत गेली .संपूर्ण नगर तालुक्यात एक-दोन शेतकºयांकडे जांभळाच्या थोड्याफार बागा आहेत. मुळात जांभूळ बागांच्या लागवडीकडे दुर्लक्ष होत गेल्याने झाडांची संख्या आणि आता पर्यायाने फळांची संख्या घटू लागली आहे.जांभूळ हे नाजूक फळ असल्याने झाडावरून खाली पडले तरी खराब होऊन जाते.यामुळे त्याची तोडणी नाजूकपणे करावी लागते.एक-एक फळ तोडून त्याची काढणी करावी लागते.जांभळातील उपयोगी घटकप्रोटीन, फॅट, मिनरल, फायबर,कार्बोहायड्रेट्स,कॅल्शियम,फॉस्फरस ,आयर्न, कैलोरीफिक .डायबेटीससाठी वरदानजांभूळ फळांच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते याबरोबरच शरीरातील जवळपास १२ आजारांसाठी आयुर्वेदात जांभळाचे उपयोग सांगितले आहेत. औषधी फळ म्हणून जांभळाला मान्यता आहे.मी रोज १० क्रे ट जांभळाचे फळे नगरच्या बाजारात विक्रीसाठी नेतो. मात्र नगरपेक्षा मुंबई-पुण्याच्या बाजारात या फळांना जास्त मागणी आहे. सध्या बाजारात या फळांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. नाजूक फळ असल्याने त्याची जास्त काळजी घ्यावी लागते. जास्त कोणी या फळांच्या लागवडीकडे वळत नाही. मुळात जांभळाची बाग ही संकल्पनाच आपल्याकडे अजून रुजली नाही. त्यातच हे झाड लावल्यानंतर खूप उशिराने फळे येतात. इतके वर्षे कोणी थांबण्यास तयार होत नाही. यामुळे या झाडांची लागवड दुर्लक्षित आहे.-अनिलकुमार लांडगे, शेतकरीवातावरणातील बदलामुळे जांभूळ फळांची आवक मोठ्या प्रमाणात घटत आहे.एरव्ही पावसाळा सुरु झाला की फळे बाजारात येण्यास सुरुवात होते. किरकोळ फळांच्या स्टॉलवरही आता जांभूळ पाहण्यास मिळत नाही. सध्या फळांच्या बाजारात जांभूळ दिसेनासे झाले आहे.-अशोक शेळके, फळांचे व्यापारी

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरenvironmentपर्यावरण