शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

सरकारविरोधात राळेगणसिद्धीमध्ये ग्रामस्थांचं जेलभरो आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 13:24 IST

राळेगणसिद्धीमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. राळेगणसिद्धी येथील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत रास्तारोको आंदोलन केले आहे. 

ठळक मुद्देराळेगणसिद्धी येथील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत रास्तारोको आंदोलन केले आहे. पारनेर-वाडेगव्हान राज्य मार्गावर राळेगणसिद्धी येथील ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत. उपोषणाचा चौथा दिवस असूनही सरकार उपाययोजना करत नसल्याने ग्रामस्थांनी सरकारचा निषेध केला आहे.

अहमदनगर - राळेगणसिद्धीमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. अण्णा हजारे यांनी गेल्या पाच वर्षांत ३८ वेळा पत्र पाठविल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा पत्राला उत्तर दिले. 'तुमचे १ जानेवारीचे पत्र मिळाले. आपणास शुभेच्छा' एवढाच उल्लेख पत्रात करून शेतकऱ्यांचे प्रश्न, लोकपाल नियुक्ती, प्रत्येक राज्यात लोकायुक्त कायदा याबाबत उत्तर देण्याचे मोदींनी टाळले. यामुळे राळेगणसिद्धी येथील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत रास्तारोको आंदोलन केले आहे. 

पारनेर-वाडेगव्हान राज्य मार्गावर राळेगणसिद्धी येथील ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनात पुरूषांसोबत महिलाही देखील सहभागी झाल्या आहेत. उपोषणाचा चौथा दिवस असूनही सरकार उपाययोजना करत नसल्याने ग्रामस्थांनी सरकारचा निषेध केला आहे. ग्रामस्थांनी जेलभरो आंदोलन केले आहे. आंदोलादरम्यान काही ग्रामस्थांना अटक करण्यात आली आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशीही केंद्र व राज्य सरकारकडून अधिकृत संपर्क करण्यात आलेला नाही. केंद्र सरकार त्यांच्या मार्गाने जाईल, आम्ही आमच्या मार्गाने आंदोलन करू, असे अण्णा हजारे यांनी उपोषणाच्या चौथ्या दिवशी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून हजारे यांनी शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथ आयोगाची अंमलबजावणी व्हावी. लोकपाल कायद्याची अंमलबजावणी व्हावी, प्रत्येक राज्यात लोकायुक्त कायदा व्हावा या मागण्या करीत तबल्ल ३८ वेळा पत्रव्यवहार केला. परंतु, पंतप्रधान मोदी यांनी हजारे यांच्या पत्रांकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबविले. २५ जानेवारी रोजी पहिल्यांदा पंतप्रधान मोदी यांनी हजारे यांना पत्र पाठविले. ते शुक्रवारी हजारे यांना मिळाले. परंतु, त्यात हजारे यांच्या मागण्यांना उत्तर देण्याचे मोदींनी टाळले.

 केंद्र व राज्य सरकारने हजारे यांच्या मागण्या व उपोषणाबाबत अधिकृत संपर्क उपोषणाच्या चौथ्या दिवसापर्यंत केलेला नाही. शेतमालाला खर्चावर आधारित दीडपट हमीभाव मिळणे, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी, लोकपाल, लोकायुक्त कायदा हे शेतकऱ्यांचे व जनतेचे प्रश्न सुटणे महत्वाचे आहे. सरकार आपल्या मागार्ने काम करील, आम्ही आमच्या मागार्ने वाटचाल करू. वेळ लागेल पण प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी शरीरात प्राण असेल तो पर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचा निर्धार हजारे उपोषणाच्या चौथ्या दिवशी यांनी व्यक्त केला.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेNarendra Modiनरेंद्र मोदीAhmednagarअहमदनगर