शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बसमधून प्रवासादरम्यान माय-लेकीचे दागिने चोरीला

By शेखर पानसरे | Updated: June 20, 2023 15:36 IST

संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शेखर पानसरे, लोकमत न्यूज नेटवर्क, संगमनेर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करत असताना माय-लेकीचे दागिने चोरीला गेले. रविवारी (दि.१८) दुपारी ४. ५० ते संध्याकाळी ६. १५ दरम्यान लोणी-संगमनेर प्रवासादरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी (दि.१९) संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

लोणी येथील ४६ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, लोणी येथून संगमनेरात येण्यासाठी ४६ वर्षीय महिला आणि त्यांची मुलगी या परिवहन महामंडळाच्या बसमध्ये (एम. एच. ४०, ए.क्यू. ६३१७) बसल्या. प्रवासादरम्यान या माय-लेकीचे दागिने चोरीला गेले. नंतर त्यांच्या हा प्रकार लक्षात आला.

८० हजार रुपये किमतीचे चार तोळ्यांचे मंगळसूत्र, ३० हजार रुपये किमतीचे दहा ग्रॅमचे पेडंट, १० हजार रुपये किमतीचे तीन ग्रॅमचे कानातले असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक बी. के. धिंदळे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangamnerसंगमनेर