शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

जनसंघर्ष यात्रा ही निवडणुकीच्या तोंडावरचे नाटक : रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 10:18 IST

काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा आणि राष्ट्रवादीचा हल्लाबोल म्हणजे आगामी निवडणुकीच्या तोंडावरचे नाटक असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी सोमवारी नगरमध्ये केली.

अहमदनगर : काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा आणि राष्ट्रवादीचा हल्लाबोल म्हणजे आगामी निवडणुकीच्या तोंडावरचे नाटक असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी सोमवारी नगरमध्ये केली.महापालिकेच्या आगामी निवडणुकीसंदर्भात खा. दानवे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी सोमवारी संवाद साधला. तसेच त्यांच्या उपस्थितीत सावेडी उपनगरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्या निवडणुका भाजपच जिंकणार आहे. चार वर्षात सरकारने केलेल्या कामगिरीवर शेतकरी खूशआहेत. लोकसभा, विधानसभा निवडणूक समविचारी पक्षांसोबत एकत्रपणे लढण्याचा विचार आहे.सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेचा सरकारमधील अनुभव चांगला आहे. मात्र पक्ष संघटना वाढविण्यासाठी ते भाजपवर टीका करीत आहेत. त्यात काहीही गैर नाही. नगर महापालिकेत सन्मानाने युती झाली तरच एकत्र लढू अन्यथा स्वबळावर लढण्यासाठी भाजप सज्ज आहे.पक्षात कोणतीही गटबाजी नाही. आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आमदार राम कदम यांना पक्षाने खुलासा मागितलेला आहे. जे पक्ष सोडून गेले आहेत, त्यांनी पुन्हा पक्षात यावे. मीच पुढचा मुख्यमंत्री असे देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याबाबत दानवे म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेतेही अनेकवेळा मुख्यमंत्री झाले आहेत. फडणवीस असे बोलले तर काय बिघडले?

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBJPभाजपा