शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जायकवाडीच्या फुगवट्याचे पाणी पिकात; घरातही शिरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 12:44 IST

जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून फुगवट्याचे पाणी दहिगावने, भावीनिमगाव, ढोरसडे, हिंगणगाव आदी परिसरातील शेतातील उभ्या पिकांमध्ये घुसले आहे.

नानासाहेब चेडे । दहिगावने : जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून फुगवट्याचे पाणी दहिगावने, भावीनिमगाव, ढोरसडे, हिंगणगाव आदी परिसरातील शेतातील उभ्या पिकांमध्ये घुसले आहे. काही घरांमध्येही पाणी शिरले आहे.जायकवाडी धरणाची उभारणी झाली आणि नगर जिल्ह्यातील काही भागासह मराठवाड्यातील जवळपास पाच जिल्ह्यांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतीला हक्काचे पाणी मिळाले. यंदा धरणात पूर्ण क्षमतेने पाणी साठविल्याने ‘बॅक वॉटर’चा भाग असलेल्या शेवगाव तालुक्यातील दहिगावने, ढोरसडे, भावीनिमगाव येथील शेतातील उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. येथील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जायकवाडी प्रशासन धरणात क्षमतेपेक्षा अधिक पाणीसाठा ठेवत असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे, असे येथील शेतकरी म्हणतात. धरणाच्या निर्मितीसाठी ज्यांनी जमिनी दिल्या त्यातील अनेकांचे पुनर्वसन न झाल्याने वाडी, वस्तीवरील लोक पाण्याच्या विळख्यात अडकले आहेत.अधिकाºयांतील समन्वयाअभावी पुनर्वसन अजूनही रखडले आहे. योग्य पुनर्वसन होऊ न शकल्याचे कटू सत्य आहे. ग्रामस्थांना धरणाचे पाणी अस्वस्थ करत आहे. सुमारे वीस वर्षांपासून त्यांचा पुनर्वसनासाठीचा लढा सुरू आहे. येथील लोकप्रतिनिधींनींही या प्रश्नांच्या संदर्भात मंत्रालयात बैठका लावल्या. मात्र कोणताही निर्णय न झाल्याने अद्यापही पुनर्वसनाचे घोंगडे भिजतच राहिले. जायकवाडी धरणात जास्त पाणी साठल्यामुळे पिके हातून गेली आहेत. शेतकरी दुहेरी संकटाचा सामना करत आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तालुक्यातील राजकीय नेते मंडळींनी पुढाकार घेणे आवश्यक आहे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.संपादित झालेली जमीन सोडून ४२ गुंठे जमीन शिल्लक आहे. पैकी १० गुंठे क्षेत्रात जायकवाडीचे पाणी आल्याने पीक सडून गेले. उर्वरित संपूर्ण पिकाचे ओलाव्याने प्रचंड नुकसान झाले आहे. शेतात जाण्यासाठी छातीइतक्या पाण्यातून जावे लागते. ही सर्व परिस्थिती माजी मंत्री सुभाष देशमुख व चंद्रकांत पाटील यांना भेटून सांगितली. मात्र आश्वसनाव्यतिरिक्त काहीच पदरी पडले नाही, असे भावीनिमगावचे शेतकरी धरणग्रस्त शेतकरी अनंता व्यवहारे यांनी सांगितले. जायकवाडी धरणातील पाणी पातळी कमी करण्यासाठी तेथील अभियंत्यांशी चर्चा करणार आहे. त्या भागातील नुकसानग्रस्त पिकांची शेतक-यांना भरपाई मिळण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत, असे शेवगावचे तहसीलदार विनोद भामरे यांनी सांगितले.   

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणwater shortageपाणीकपात