शहरं
Join us  
Trending Stories
1
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
2
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
3
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
4
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
5
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
6
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
7
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
8
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला
9
“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन
10
पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे
11
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
12
'लडाख हिंसाचार' प्रकरणी आता मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर! दिल्लीहून एक दूत पाठवला; उपराज्यपालांनी बैठक बोलावली
13
झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा...
14
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
15
Navratri 2025: देवीचे वाहन सिंह आणि लक्ष्मीचे घुबड का? त्यामागे आहे महत्त्वपूर्ण कारण!
16
सोने-चांदीच्या दरात आज मोठी उलथापालथ; Gold झालं स्वस्त, पण चांदी अवाक्याच्या बाहेर
17
"पाकिस्तानचा संघ एवढा भारी आहे की..."; IND vs PAK FINAL आधी कर्णधार सलमानने भारताला डिवचले
18
VIRAL :'सोनार बनवणार नाही, चोर चोरणार नाही'! ट्रेनमध्ये विक्रेत्याचा शायराना अंदाज; तरुणाची स्टाईल पाहून पब्लिक झाली फॅन!
19
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना वक्री शनि करेल मालामाल, बक्कळ पैसा; चौपट लाभ!
20
४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत?

जायकवाडीच्या फुगवट्याचे पाणी पिकात; घरातही शिरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 12:44 IST

जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून फुगवट्याचे पाणी दहिगावने, भावीनिमगाव, ढोरसडे, हिंगणगाव आदी परिसरातील शेतातील उभ्या पिकांमध्ये घुसले आहे.

नानासाहेब चेडे । दहिगावने : जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून फुगवट्याचे पाणी दहिगावने, भावीनिमगाव, ढोरसडे, हिंगणगाव आदी परिसरातील शेतातील उभ्या पिकांमध्ये घुसले आहे. काही घरांमध्येही पाणी शिरले आहे.जायकवाडी धरणाची उभारणी झाली आणि नगर जिल्ह्यातील काही भागासह मराठवाड्यातील जवळपास पाच जिल्ह्यांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतीला हक्काचे पाणी मिळाले. यंदा धरणात पूर्ण क्षमतेने पाणी साठविल्याने ‘बॅक वॉटर’चा भाग असलेल्या शेवगाव तालुक्यातील दहिगावने, ढोरसडे, भावीनिमगाव येथील शेतातील उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. येथील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जायकवाडी प्रशासन धरणात क्षमतेपेक्षा अधिक पाणीसाठा ठेवत असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे, असे येथील शेतकरी म्हणतात. धरणाच्या निर्मितीसाठी ज्यांनी जमिनी दिल्या त्यातील अनेकांचे पुनर्वसन न झाल्याने वाडी, वस्तीवरील लोक पाण्याच्या विळख्यात अडकले आहेत.अधिकाºयांतील समन्वयाअभावी पुनर्वसन अजूनही रखडले आहे. योग्य पुनर्वसन होऊ न शकल्याचे कटू सत्य आहे. ग्रामस्थांना धरणाचे पाणी अस्वस्थ करत आहे. सुमारे वीस वर्षांपासून त्यांचा पुनर्वसनासाठीचा लढा सुरू आहे. येथील लोकप्रतिनिधींनींही या प्रश्नांच्या संदर्भात मंत्रालयात बैठका लावल्या. मात्र कोणताही निर्णय न झाल्याने अद्यापही पुनर्वसनाचे घोंगडे भिजतच राहिले. जायकवाडी धरणात जास्त पाणी साठल्यामुळे पिके हातून गेली आहेत. शेतकरी दुहेरी संकटाचा सामना करत आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तालुक्यातील राजकीय नेते मंडळींनी पुढाकार घेणे आवश्यक आहे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.संपादित झालेली जमीन सोडून ४२ गुंठे जमीन शिल्लक आहे. पैकी १० गुंठे क्षेत्रात जायकवाडीचे पाणी आल्याने पीक सडून गेले. उर्वरित संपूर्ण पिकाचे ओलाव्याने प्रचंड नुकसान झाले आहे. शेतात जाण्यासाठी छातीइतक्या पाण्यातून जावे लागते. ही सर्व परिस्थिती माजी मंत्री सुभाष देशमुख व चंद्रकांत पाटील यांना भेटून सांगितली. मात्र आश्वसनाव्यतिरिक्त काहीच पदरी पडले नाही, असे भावीनिमगावचे शेतकरी धरणग्रस्त शेतकरी अनंता व्यवहारे यांनी सांगितले. जायकवाडी धरणातील पाणी पातळी कमी करण्यासाठी तेथील अभियंत्यांशी चर्चा करणार आहे. त्या भागातील नुकसानग्रस्त पिकांची शेतक-यांना भरपाई मिळण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत, असे शेवगावचे तहसीलदार विनोद भामरे यांनी सांगितले.   

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणwater shortageपाणीकपात