शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
3
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
4
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
5
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
6
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
7
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
8
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
9
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
10
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
11
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
12
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
13
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
14
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
15
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
16
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
17
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
18
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
19
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
20
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत घुमणार ‘जय मल्हार’

By admin | Updated: July 10, 2014 00:36 IST

अहमदनगर : धनगर समाजाचा आदिवासींमध्ये समावेश करावा व आरक्षणाचा लाभ मिळावा, या मागणीसाठी पंढरपूर ते बारामती पायी दिंडी

अहमदनगर : धनगर समाजाचा आदिवासींमध्ये समावेश करावा व आरक्षणाचा लाभ मिळावा, या मागणीसाठी पंढरपूर ते बारामती पायी दिंडी काढून बारामतीत ‘जय मल्हार’चा नारा देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना घेरण्याची व्यूहरचना आरक्षण कृती समितीने आखली आहे़ तसेच विधानसभेची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी आरक्षणाची घोषणा न केल्यास काँगे्रस, राष्ट्रवादीच्या विरोधात थेट काम करण्याची भूमिका धनगर समाजाच्या नेत्यांनी जाहीर केली़राज्य धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने नगरमध्ये राज्यस्तरीय मेळावा बुधवारी झाला़ मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी समाजाचे नेते शालीग्राम होडगर हे होते़ कृती समितीचे पदाधिकारी व नेत्यांनी आरक्षणप्रश्नी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली़ कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत सूळ म्हणाले, राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वारंवार समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले़ मात्र, त्यांच्याच पक्षाचे नेते व पवार यांचाही या आरक्षणास विरोध आहे़ बारामती, इंदापूर, माढा मतदारसंघात धनगर समाजाचे मतदान मोठे आहे़ या मतदानावरच पवारांनी आतापर्यंत निवडणुका जिंकल्या़ आगामी विधानसभेत राष्ट्रवादी व आघाडी सरकारला धडा शिकविण्यासाठी पंढरपूर ते बारामती पायी दिंडी काढण्यात येणार आहे़ ही दिंडी १५ जुलैपासून सुरु होऊन २१ जुलैला बारामतीत पोहचणार आहे़ तत्पूर्वी सरकारने धनगर समाजाला आरक्षण जाहीर न केल्यास त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा सूळ यांनी दिला़ होडगर, सुभाष खेमनर, कैलास चिंधे आदींनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली़ यावेळी दादाभाऊ चितळकर, बापूसाहेब बाचकर, निशांत दातीर, मनसेचे सचिन डफळ, वसंत लोढा, गंगाधर तमनर, नगरसेविका शारदा ढवण, दिगंबर ढवण, चंद्रकांत तागड, विठ्ठल दातीर, विजय तमनर आदी उपस्थित होते़(प्रतिनिधी) राजकीय टोलेबाजीआमदारांनी मुख्यमंत्र्यांची येथूनच दूरध्वनीवरुन चर्चेसाठी वेळ घ्यावी असे विधान कृती समितीचे अध्यक्ष सूळ यांनी केले़ हा धागा पकडून आ़ अनिल राठोड म्हणाले, राज्यात आघाडीचे सरकार आहे़ पांडुरंग अभंग राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत़ सूळ हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहे़ त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांची वेळ कशी घ्यायची? असा प्रश्न उपस्थित केला़ तर बारामतीतील पदयात्रेनंतर धनगर समाजाला आरक्षण न मिळाल्यास सूळ राष्ट्रवादी सोडतील का? असा प्रश्न आ़ शिवाजी कर्डिले, आ़ राम शिंदे यांनी उपस्थित केला़ सूळ हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत, यावरुन आरक्षण हक्क परिषदेत चांगलीच राजकीय टोलेबाजी रंगली़युतीचे सरकार सत्तेत असताना आ़ राठोड मंत्री होते़ त्यावेळी त्यांनी धनगर समाजाला आरक्षण का दिले नाही, असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभंग यांनी शरद पवारांनी कसे चांगले निर्णय घेतले याचे विश्लेषण सुरु केले़ त्याचवेळी आरक्षणावर बोला, पवारांचे सांगू नका अशी मागणी करीत उपस्थितांनी जय मल्हारच्या घोषणा देत अभंग यांना भाषण थांबविण्यास भाग पाडले़ त्यानंतर भाषणास उठलेल्या आ़ कर्डिले व आ़ शिंदे यांनीही अभंग व सूळ यांनाच लक्ष्य केले़