शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाड्यातील ८५५० पैकी १५१६ गावांतच सापडल्या ‘कुणबी’च्या नोंदी
2
स्वस्ताईचा गुड ॲण्ड सिम्पल टॅक्स! जीएसटीचे ५% आणि १८% असे दोनच दर; विमा पॉलिसींना करसूट, सिमेंटवर १८% जीएसटी
3
Yamuna Flood: यमुनेचा रौद्रवतार, दिल्लीच्या नाकातोंडात पाणी! घरं पाण्याखाली, रस्तेही बंद; थरकाप उडवणारी दृश्ये
4
८ वर्षांत तिप्पट...GST मधून सरकारची बंपर कमाई; नवीन सुधारणांमुळे मोठा फटका बसणार?
5
अमिताभ बच्चन आणि क्रिती सनॉन यांच्यानंतर कार्तिक आर्यननंही अलिबागमध्ये खरेदी केली जमीन; किती कोटींना झाली डील?
6
२२ षटकारांची आतषबाजी, ठोकल्या ३६७ धावा; धडाकेबाज खेळीमुळे टी२० संघात मिळालं स्थान
7
श्रेयस, यशस्वी अन् शार्दुल... टीम इंडियाच्या स्टार त्रिकुटाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष
8
"मुंबईत कधी आपलेपणा वाटला नाही...", असं का म्हणाले मनोज वाजपेयी? शहर सोडायचा आला विचार
9
GST Rate Cut: पहिले महिन्याला भरत होता ₹१७,७०० चा हेल्थ इन्शुरन्स प्रीमिअम, आता किती वाचतील; ३६ हजारांच्या टीव्हीवर किती बचत?
10
ये कैसी ‘फॉरेन पॉलिसी’, ये तो ‘फौरन पॉलिसी’ है, भैया!
11
सर्वसामान्यांना दिलासा देणारे GST चे नवीन दर कधी लागू होणार? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिले उत्तर
12
चातुर्मासातील पहिला शुक्र प्रदोष: सुख-सुबत्ता-वैभव, ‘असे’ करा व्रत; मंत्र जपाने शिव प्रसन्न!
13
GST दरातील कपातीनंतर शेअर बाजार सुस्साट; Sensex ५४७ अंकांनी वधारला, या शेअर्समध्ये जोरदार तेजी
14
आंदोलनाचा व्यापाराला १०० कोटींचा फटका, रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचा दावा 
15
GSTबाबत सरकारकडून भेट, दैनंदिन वापरातील वस्तू कुठल्या स्लॅबमध्ये आल्या? पाहा संपूर्ण यादी
16
जीएसटीमध्ये नेमके काय बदल झाले? काय किती स्वस्त झाले? जाणून घ्या एका क्लिकवर...!
17
40 GST: 'या' लोकांच्या खिशावर पडणार ताण, कोणत्या वस्तुंवर ४० टक्के जीएसटी?
18
आंदोलनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार? प्रतिज्ञापत्र सादर करा, उच्च न्यायालयाचे निर्देश
19
पाकिस्तानी क्रिकेटरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिसांनी मैदानातून उचललं, कोर्टानेदिला निकाल
20
'संगीत देवबाभळी' फेम शुभांगी सदावर्तेचा घटस्फोट; पती पोस्ट करत म्हणाला, "काही वर्षांपूर्वीच..."

बारामतीत घुमणार ‘जय मल्हार’

By admin | Updated: July 10, 2014 00:36 IST

अहमदनगर : धनगर समाजाचा आदिवासींमध्ये समावेश करावा व आरक्षणाचा लाभ मिळावा, या मागणीसाठी पंढरपूर ते बारामती पायी दिंडी

अहमदनगर : धनगर समाजाचा आदिवासींमध्ये समावेश करावा व आरक्षणाचा लाभ मिळावा, या मागणीसाठी पंढरपूर ते बारामती पायी दिंडी काढून बारामतीत ‘जय मल्हार’चा नारा देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना घेरण्याची व्यूहरचना आरक्षण कृती समितीने आखली आहे़ तसेच विधानसभेची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी आरक्षणाची घोषणा न केल्यास काँगे्रस, राष्ट्रवादीच्या विरोधात थेट काम करण्याची भूमिका धनगर समाजाच्या नेत्यांनी जाहीर केली़राज्य धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने नगरमध्ये राज्यस्तरीय मेळावा बुधवारी झाला़ मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी समाजाचे नेते शालीग्राम होडगर हे होते़ कृती समितीचे पदाधिकारी व नेत्यांनी आरक्षणप्रश्नी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली़ कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत सूळ म्हणाले, राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वारंवार समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले़ मात्र, त्यांच्याच पक्षाचे नेते व पवार यांचाही या आरक्षणास विरोध आहे़ बारामती, इंदापूर, माढा मतदारसंघात धनगर समाजाचे मतदान मोठे आहे़ या मतदानावरच पवारांनी आतापर्यंत निवडणुका जिंकल्या़ आगामी विधानसभेत राष्ट्रवादी व आघाडी सरकारला धडा शिकविण्यासाठी पंढरपूर ते बारामती पायी दिंडी काढण्यात येणार आहे़ ही दिंडी १५ जुलैपासून सुरु होऊन २१ जुलैला बारामतीत पोहचणार आहे़ तत्पूर्वी सरकारने धनगर समाजाला आरक्षण जाहीर न केल्यास त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा सूळ यांनी दिला़ होडगर, सुभाष खेमनर, कैलास चिंधे आदींनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली़ यावेळी दादाभाऊ चितळकर, बापूसाहेब बाचकर, निशांत दातीर, मनसेचे सचिन डफळ, वसंत लोढा, गंगाधर तमनर, नगरसेविका शारदा ढवण, दिगंबर ढवण, चंद्रकांत तागड, विठ्ठल दातीर, विजय तमनर आदी उपस्थित होते़(प्रतिनिधी) राजकीय टोलेबाजीआमदारांनी मुख्यमंत्र्यांची येथूनच दूरध्वनीवरुन चर्चेसाठी वेळ घ्यावी असे विधान कृती समितीचे अध्यक्ष सूळ यांनी केले़ हा धागा पकडून आ़ अनिल राठोड म्हणाले, राज्यात आघाडीचे सरकार आहे़ पांडुरंग अभंग राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत़ सूळ हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहे़ त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांची वेळ कशी घ्यायची? असा प्रश्न उपस्थित केला़ तर बारामतीतील पदयात्रेनंतर धनगर समाजाला आरक्षण न मिळाल्यास सूळ राष्ट्रवादी सोडतील का? असा प्रश्न आ़ शिवाजी कर्डिले, आ़ राम शिंदे यांनी उपस्थित केला़ सूळ हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत, यावरुन आरक्षण हक्क परिषदेत चांगलीच राजकीय टोलेबाजी रंगली़युतीचे सरकार सत्तेत असताना आ़ राठोड मंत्री होते़ त्यावेळी त्यांनी धनगर समाजाला आरक्षण का दिले नाही, असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभंग यांनी शरद पवारांनी कसे चांगले निर्णय घेतले याचे विश्लेषण सुरु केले़ त्याचवेळी आरक्षणावर बोला, पवारांचे सांगू नका अशी मागणी करीत उपस्थितांनी जय मल्हारच्या घोषणा देत अभंग यांना भाषण थांबविण्यास भाग पाडले़ त्यानंतर भाषणास उठलेल्या आ़ कर्डिले व आ़ शिंदे यांनीही अभंग व सूळ यांनाच लक्ष्य केले़