शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

शेतक-यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी सुकाणू समितीची जागर यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 21:27 IST

शेतक-यांच्या कर्जमाफीची फसवी घोषणा करून सरकारने शेतक-यांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे सरसकट कर्जमाफी करावी, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघटनांची सुकाणू समिती महिनाभर राज्यभरात जनजागृती करणार आहे.

अहमदनगर : शेतक-यांच्या कर्जमाफीची फसवी घोषणा करून सरकारने शेतक-यांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे सरसकट कर्जमाफी करावी, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघटनांची सुकाणू समिती महिनाभर राज्यभरात जनजागृती करून शेतक-यांनी रुपयाचेही कर्ज भरू नये, असे आवाहन करणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा सुकाणू समितीचे ज्येष्ठ सदस्य रघुनाथदादा पाटील यांनी दिली.या जागर यात्रेची नियोजन बैठक शनिवारी नगरमध्ये सरकारी विश्रामगृहावर झाली. त्यात पाटील यांनी आंदोलनाची रूपरेषा विशद केली. शेतमालाला दमडीचा भाव देऊन आतापर्यंतच्या सर्वच सरकारांनी शेतक-यांची लूट केली. त्याचाच उद्रेक म्हणून १ जूनला महाराष्ट्रात शेतकरी बंद झाला. या बंदमुळे हादरलेल्या सरकारने घाईघाईत कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यात शेकडो अटी टाकल्या. गेल्या दहा महिन्यांपासून या कर्जमाफीचा घोळ सुरूच आहे. आपले नाव कर्जमाफीच्या यादीत आले नाही म्हणून या दहा महिन्यांत राज्यात तीन हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे आता सुकाणू समितीने संपूर्ण कर्जमाफीचा विडा उचलला आहे.सुकाणू समिती शहीद दिनापासून (२३ मार्च) राज्यव्यापी हुतात्मा अभिवादन व शेतकरी जागर यात्रा काढणार आहे. महिनाभराच्या या जागर यात्रेत एकाही शेतक-याने पीक कर्ज, तसेच शेतीचे वीजबिल भरू नये, असे आवाहन केले जाईल. उलट सरकारने शेतक-यांना आतापर्यंत कमी भाव देऊन जी लूट केली, ती लूट परत करावी, अशी मागणी सरकारकडे केली जाईल. या यात्रेत राज्यातील ३० जिल्हाधिकारी कार्यालयांवर आंदोलन, हुतात्मा स्मारकांना भेटी, तसेच जिल्हानिहाय शेतक-यांच्या सभा होणार आहेत. सांगलीपासून जागर यात्रेस प्रारंभ होऊन पुणे येथे समारोप होणार आहे. दि. २१ एप्रिलला ही जागर यात्रा नगरला येणार असल्याचेही पाटील म्हणाले.बैठकीस शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र विभागप्रमुख बाळासाहेब पटारे, गणेश जगताप, प्रा. सुशीला मोराळे, किशोर ढमाले, कॉ. बाबा आरगडे, बच्चू मोढवे, विष्णूपंत ढवळे, नितीन पटारे, विलास कदम, युवराज जगताप, जगन्नाथ कोरडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर