शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
12
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
14
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
15
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
16
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
17
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
18
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
19
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
20
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू

शेतक-यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी सुकाणू समितीची जागर यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 21:27 IST

शेतक-यांच्या कर्जमाफीची फसवी घोषणा करून सरकारने शेतक-यांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे सरसकट कर्जमाफी करावी, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघटनांची सुकाणू समिती महिनाभर राज्यभरात जनजागृती करणार आहे.

अहमदनगर : शेतक-यांच्या कर्जमाफीची फसवी घोषणा करून सरकारने शेतक-यांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे सरसकट कर्जमाफी करावी, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघटनांची सुकाणू समिती महिनाभर राज्यभरात जनजागृती करून शेतक-यांनी रुपयाचेही कर्ज भरू नये, असे आवाहन करणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा सुकाणू समितीचे ज्येष्ठ सदस्य रघुनाथदादा पाटील यांनी दिली.या जागर यात्रेची नियोजन बैठक शनिवारी नगरमध्ये सरकारी विश्रामगृहावर झाली. त्यात पाटील यांनी आंदोलनाची रूपरेषा विशद केली. शेतमालाला दमडीचा भाव देऊन आतापर्यंतच्या सर्वच सरकारांनी शेतक-यांची लूट केली. त्याचाच उद्रेक म्हणून १ जूनला महाराष्ट्रात शेतकरी बंद झाला. या बंदमुळे हादरलेल्या सरकारने घाईघाईत कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यात शेकडो अटी टाकल्या. गेल्या दहा महिन्यांपासून या कर्जमाफीचा घोळ सुरूच आहे. आपले नाव कर्जमाफीच्या यादीत आले नाही म्हणून या दहा महिन्यांत राज्यात तीन हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे आता सुकाणू समितीने संपूर्ण कर्जमाफीचा विडा उचलला आहे.सुकाणू समिती शहीद दिनापासून (२३ मार्च) राज्यव्यापी हुतात्मा अभिवादन व शेतकरी जागर यात्रा काढणार आहे. महिनाभराच्या या जागर यात्रेत एकाही शेतक-याने पीक कर्ज, तसेच शेतीचे वीजबिल भरू नये, असे आवाहन केले जाईल. उलट सरकारने शेतक-यांना आतापर्यंत कमी भाव देऊन जी लूट केली, ती लूट परत करावी, अशी मागणी सरकारकडे केली जाईल. या यात्रेत राज्यातील ३० जिल्हाधिकारी कार्यालयांवर आंदोलन, हुतात्मा स्मारकांना भेटी, तसेच जिल्हानिहाय शेतक-यांच्या सभा होणार आहेत. सांगलीपासून जागर यात्रेस प्रारंभ होऊन पुणे येथे समारोप होणार आहे. दि. २१ एप्रिलला ही जागर यात्रा नगरला येणार असल्याचेही पाटील म्हणाले.बैठकीस शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र विभागप्रमुख बाळासाहेब पटारे, गणेश जगताप, प्रा. सुशीला मोराळे, किशोर ढमाले, कॉ. बाबा आरगडे, बच्चू मोढवे, विष्णूपंत ढवळे, नितीन पटारे, विलास कदम, युवराज जगताप, जगन्नाथ कोरडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर