शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

आयटीपार्कचा लिलाव

By admin | Updated: June 9, 2014 00:04 IST

अहमदनगर : उद्योजकांची मागणी फेटाळत प्रशासनाने आयटीपार्कचा आॅनलाईन लिलाव करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत़

अहमदनगर : उद्योजकांची मागणी फेटाळत प्रशासनाने आयटीपार्कचा आॅनलाईन लिलाव करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत़ औद्योगिक वसाहतीतील इमारतीसाठी प्रथमच निविदा काढली जात असून, नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या या पध्दतीबाबत उद्योजकांमध्ये कमालीचे मतभेद आहेत़नगर शहरात आयटी उद्योग सुरू व्हावेत, यासाठी येथील नागापूर औद्योगिक वसाहतीत महामंडळाने आयटीपार्कची इमारत उभारली़ ही इमारत उभारून १३ वर्षे उलटून गेली़ मात्र या इमारतीत एकही उद्योग सुरू होऊ शकला नाही़ उद्योग तर दूरचे झाले परंतु एकही गाळ्याची विक्री झाली नाही़ तेरा वर्षांनंतरही इमारतीचे कुलूप उघडले नाही़ आयटीपार्क उद्योगांच्या प्रतीक्षेत आहे़ प्रशासनाने पूर्वी ८ हजार प्रति चौरस मीटर, असे दर निश्चित केले होते़ पण एकाही उद्योजकांनी गाळा घेण्याची तयारी दर्शविली नाही़ लोकप्रतिनिधींनीही आयटी कंपन्यांना नगरला येण्याचे साकडे घातले नाही़ आयटीपार्कसाठी कोणतेही प्रयत्न झाले नाहीत़ त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेला हा पार्क धूळखात पडून आहे़ तो सुरू करण्यासाठी येथील ४० उद्योजकांनी एकत्र येऊन मागणी केली होती़ त्यामुळे खऱ्या अर्थाने आयटीपार्कच्या फायलीवरील धूळ झटकली गेली असून, प्रथमच आॅनलाईन लिलाव करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत़ही इमारत आयटी उद्योगांसाठीच राखीव आहे़ या निर्णयावर प्रशासन ठाम आहे़ इतर वापरासाठी इमारतीची मागणी करण्यात आली होती़ परंतु याठिकाणी आयटी उद्योगच सुरू होतील, इतर कामासाठी ही इमारत मिळणार नाही, असे त्याचवेळी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते़ इमारतीचे आरक्षण बदलण्यासाठी प्रयत्न झाले़ परंतु ते न बदलता पुन्हा आयटी उद्योगांसाठी प्रशासनाने पायघड्या घातल्या असून, प्रथमच निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेऊन उद्योजकांना आवाहन केले आहे़ मात्र पूर्वीचे आणि सध्याच्या दरात कमालीचा फरक आहे़ पूर्वी ८ हजार चौरसमीटर, असे दर होते़ कमी दर असताना देखील त्यास प्रतिसाद मिळाला नाही़ हा अनुभव गाठीशी असूनही प्रशासनाने २१ हजार रुपये चौ़ मी़ असे कमीत कमी दर ठेवले आहे़ यापेक्षा अधिक बोली लावणाऱ्यांना इमारतीतील गाळ्यांचे वाटप केले जाणार आहे़ मात्र दरवाढीमुळे त्यास प्रतिसाद मिळणार की नाही, याबाबत साशंकता आहे़़(प्रतिनिधी)एकत्रितरित्या उद्योजकांनी मागणी केली़ मात्र सर्वसामान्यांना न देता आता निविदा काढली जात आहे़ त्यात आता दरही वाढविण्यात आला आहे,यावरून शासनाला ही इमारत बिल्डरांच्याच घशात घालयची असल्याचे स्पष्ट होत आहे़ पूर्वी कमी दर असूनही कुणी आले नाही़ दुपटीपेक्षाही अधिक दर देऊन येथे येणार कोण, हा प्रश्न आहेच-हरजितसिंग वधवा, उद्योजकपूर्वी निविदा न काढता केवळ दर प्रसिध्द केले जात होते़ त्यामुळे त्यास प्रतिसाद मिळाला नाही़ परंतु शासनाने आॅनलाईन लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यास नक्कीच प्रतिसाद मिळेल आणि नगरमध्ये आयटी उद्योग सुरू होतील़-अशोक सोनवणे, अध्यक्ष, आमी