शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

कोपरगाव तालुक्यातील वारीतील उद्भवाचे पाणी दूषितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 09:50 IST

तालुक्यातील वारी येथील गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड या कारखान्याच्या रासायनिक स्त्रोतामुळे परिसरातील पिण्याच्या पाण्यामुळे अनेक उद्भव दूषित झाले असल्याच्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या.

ठळक मुद्देजिल्हा आरोग्य प्रयोग शाळेचा अहवाल : पाण्याला रासायनिक वास

रोहित टेकेकोपरगाव : तालुक्यातील वारी येथील गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड या कारखान्याच्या रासायनिक स्त्रोतामुळे परिसरातील पिण्याच्या पाण्यामुळे अनेक उद्भव दूषित झाले असल्याच्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. येथील उद्भवतील पाणी नमुना तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविले होते. या अहवालात वारीतील पाण्याचे उद्भव दूषित असल्याचा निष्कर्ष प्रयोगशाळेनं दिला आहे.सीलबंद बाटलीत प्राथमिक आरोग्य केंद्र याच्या मार्फत दि .७ जून रोजी जिल्हा आरोग्य प्रयोग शाळा ,अहमदनगर यांच्याकडे रासायनिक व जैविक तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्याचा तपासणी अहवाल प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मंगळवार (दि.१३ जून) रोजी प्राप्त झाला असून या पाण्यात विशिष्ठ प्रकारचा रासायनिक श्रोत असून त्याचा उग्र स्वरूपाचा वास येत असून हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. परंतु याविषयावर कारखाना व्यवस्थापन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. तर वारी परिसरातील तब्बल २७ विहरी व ६ हातपंप दुषित्त झाल्याच्या बातम्या वर्तमान पत्रात प्रसिद्ध झालेल्या असताना शिडीर्चे प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे व कोपरगावचे तहसीलदार किशोर कदम यांनी या गंभीर विषयाची कोणतीच दखल घेतली नसल्याचे दिसते आहे त्यामुळे या विषयाकडे जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांनी लक्ष घालावे अशी वारीतील ग्रामस्थांनी मागणी आहे .आमच्या प्रयोग शाळेत दि .७ जून रोजी तपासणीसाठी वारी ता .कोपरगाव येथून आलेल्या पाणी नमुन्याची तपासणी केली असता त्यामध्ये विशिष्ठ प्रकारचा रासायनिक वास येत असून ते पाणी पिण्यास अयोग्य आहे. ते पाणी पिल्याने कायमस्वरूपीचे पोटाचे विकार तसेच शारिरिक संपर्कात आल्यास आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तसेच या परिसरातील पाण्याची पुणे येथील प्रयोग शाळेत तपासणी केल्यास रासायनिक घटकाची नावे समजू शकतील.- ए .एच .अबोडे, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, जिल्हा प्रयोग शाळा,अ .नगरबुधवार दि .१३ रोजी माझे सहकारी आरोग्यसेवक सतीश ठोकळ आम्ही दोघांनी येथील दुषित पाणी असल्याचा अहवाल आलेल्या उद्भवला पुन्हा भेट दिली. उदभवातील पाण्याचा अत्यंत उग्र स्वरूपाचा वास येत असल्याचे प्राथमिक जाणवले. - बी .एल .बनसोडे, आरोग्य सहायक, प्राथमिक आरोग्य केंद्र वारी, कोपरगाव

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगावahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद