शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पाटबंधारे विभागाने फतवा मागे घेतला; शेतकरी आंदोलनानंतर निर्णय बदलला

By शिवाजी पवार | Updated: August 16, 2023 15:36 IST

सिंचन न केलेल्या क्षेत्राबद्दलचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश शेतकऱ्यांना बजावण्यात आले होते. या आदेशाची शेतकऱ्यांनी होळी केल्यानंतर अभियंत्यांनी आपला निर्णय मागे घेतला.

श्रीरामपूर : पाटबंधारे विभागाच्या नगर येथील कार्यकारी अभियंत्यांनी भंडारदराच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावरील सर्वच क्षेत्रांवर सिंचन कर आकारणीचा अजब फतवा काढला होता. सिंचन न केलेल्या क्षेत्राबद्दलचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश शेतकऱ्यांना बजावण्यात आले होते. या आदेशाची शेतकऱ्यांनी होळी केल्यानंतर अभियंत्यांनी आपला निर्णय मागे घेतला.    कार्यकारी अभियंत्यांनी ८ ऑगस्टला हे आदेश बजावले होते. वडाळा पाटबंधारे उपविभागाच्या अधिकाऱ्यांना त्याची प्रत प्राप्त देण्यात आली होती. ही माहिती मिळताच भंडारदरा धरण लाभक्षेत्र पाणी समितीच्या कार्यकर्त्यांनी आदेशाची येथे होळी केली. यावेळी स्वाभिमानीचे नेते सुरेश ताके, जितेंद्र भोसले, भरत आसने, दत्तात्रय लिप्टे, किशोर पाटील, रवी वाबळे, राजेंद्र भांड, संदीप गवारे, जगन्नाथ भोसले, ईश्वर दरंदले, नामदेव येवले, किशोर बडाख आदी शेतकरी उपस्थित होते. यामुळे आदेश मागे घेतल्याचे परिपत्रक अभियंत्यांनी आता काढले आहेत.

    भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रातील सिंचन महसूल वाढविण्याच्या उद्देशाने आदेश पारित करण्यात आले होते. लाभधारक शेतकऱ्यांच्या मूळ सातबारा उताऱ्यावरील क्षेत्र व सिंचन अकारणी करण्यात आलेले क्षेत्र यामध्ये तफावत दिसून येत आहे. लाभधारक शेतकऱ्यांनी उताऱ्यावरील क्षेत्राचे सिंचन कशाच्या आधारे केले, याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश वडाळा पाटबंधारेच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले होते.      उताऱ्यावरील क्षेत्र आणि कर अकारणी यात तफावत येणार नाही याची खात्री करून तक्ते विभागीय कार्यालयास मंजुरीस सादर करावेत, तसेच लाभ क्षेत्रातील सर्वच क्षेत्रांची अकारणी करण्यात यावी, असे कार्यकारी अभियंत्यांना म्हटले आहे.     दरम्यान, लाभक्षेत्रातील शेतकऱ्याने जर धरणाच्या आवर्तनातून सिंचन केले नाही, तर त्याने हंगामामध्ये पाणी न घेतल्याचे हमीपत्र या आदेशानुसार सादर करावयाचे होते. आदेशाची प्रत पाटबंधारेच्या अकोले, संगमनेर, लोणी व देवळाली प्रवरा येथील कार्यालयांनाही पाठविण्यात आली होती.सर्व क्षेत्रावर सिंचन करभंडारदराच्या आवर्तनातून भिजलेल्या जमिनीच्या क्षेत्रावर सिंचन कर लावला जात होता. आवर्तन सुटण्यापूर्वी शेतकऱ्यांकडून पाणी मागणी अर्ज मागविले जातात. या अर्जानुसार भिजलेल्या क्षेत्रानुसार पैसे अकारले जात होते. मात्र नव्या आदेशानुसार भिजलेल्या क्षेत्राऐवजी शेतकऱ्यांच्या संपूर्ण सातबारा उताऱ्यावर सिंचन कर लादला जाणार होता.

अभियंत्यांचा खुलासाआवर्तनातून भिजलेले क्षेत्र व उताऱ्यावरील क्षेत्र याबाबतची खातरजमा करण्यासाठी पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले होते. मात्र आदेशाचा क्षेत्रीय स्तरावरून चुकीचा अर्थ काढण्यात आला. कोणत्याही लाभधारकांकडून सातबारा उताऱ्याची मागणी केली जाणार नाही, असे कार्यकारी अभियंत्यांनी दुसऱ्या आदेशात म्हटले आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरी