शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

तहसीलदार ज्योती देवरे यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:25 IST

अहमदनगर : पारनेर येथील वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. देवरे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग ...

अहमदनगर : पारनेर येथील वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. देवरे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणी जातेगाव (ता. पारनेर) येथील नागरिक कारभारी भाऊसाहेब पोटघन यांनी ॲड. असीम सरोदे यांच्यामार्फत येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे.

याबाबत लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांना मंगळवारी (दि.१४) तक्रार अर्ज देण्यात आला. या तक्रारी संदर्भात ॲड. सरोदे यांनी सांगितले, तहसीलदार देवरे यांनी भ्रष्टाचार केल्याचे सातत्याने आरोप होत आहेत. यात अनेक जण सहभागी असण्याची शक्यता आहे. नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी देवरे यांच्याबाबत नेमलेल्या चौकशी समितीने नुकताच अहवाल दिला आहे. यात स्पष्टपणे नमूद आहे की, बेकायदेशीर वाळूउपसा करणारी वाहने तहसीलदार देवरे यांनी जप्त केल्यानंतर सरकारी शुल्क भरून न घेताच ती सोडून दिली. अकृषक कामासाठी जमीन हस्तांतरित करताना अनियमितता, वाळू तस्करांना संरक्षण देणे, तसेच देवरे या जळगाव येथे कार्यरत असतानाही जमिनीच्या संदर्भातील कामकाजात भ्रष्टाचार केल्याचा ठपका आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी भ्रष्टाचार केला असल्याचे दिसत असल्याने त्यांची चौकशी करावी, अशी पोटघन यांनी मागणी केली आहे.

देवरे यांची पारनेर येथून बदली झालेली असली तरी कामाचे स्वरूप तेच राहणार आहे. त्यामुळे त्यांनी आपली कार्यपद्धती बदलावी, हा केवळ देवरे यांच्या विरोधातील तक्रार अर्ज नाही तर सरकारी पदाचा गैरवापर करणाऱ्यांसाठी ही धोक्याची सूचना असल्याचे यावेळी ॲड. सरोदे यांनी सांगितले.

-------------------------

भ्रष्टाचाराची पाठराखण होऊ शकत नाही

आत्महत्ये संदर्भात देवरे यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपबाबत बोलताना सरोदे म्हणाले, महिलांना कामाच्या ठिकाणी अनेक प्रकारचे दबाव सहन करावे लागतात, हे वास्तव आहे. देवरे यांच्यावर तसा अन्याय झाला असेल तर, मी वकील म्हणून त्यांच्यासोबत राहील. पण, यातून भ्रष्टाचाराची पाठराखण होऊ शकत नाही. त्यांच्या क्लिपमध्ये सत्य असण्याची शक्यता लक्षात घेतली पाहिजे. पण, चौकशी होऊ नये म्हणून भावनिक आवाहन करणे अथवा महिला असण्याचा गैरफायदा घेणे या गोष्टी योग्य नाही. ज्या महिलांवर कामाच्या ठिकाणी खरोखर अन्याय होत आहे, त्यांच्या तक्रारींचे यातून महत्त्व कमी होईल, असे मत सरोदे यांनी व्यक्त केले.