शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
5
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
6
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
7
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
8
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
9
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
10
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
11
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
12
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
13
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
14
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
15
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
16
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
17
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
18
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
19
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या

तहसीलदार ज्योती देवरे यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:25 IST

अहमदनगर : पारनेर येथील वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. देवरे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग ...

अहमदनगर : पारनेर येथील वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. देवरे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणी जातेगाव (ता. पारनेर) येथील नागरिक कारभारी भाऊसाहेब पोटघन यांनी ॲड. असीम सरोदे यांच्यामार्फत येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे.

याबाबत लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांना मंगळवारी (दि.१४) तक्रार अर्ज देण्यात आला. या तक्रारी संदर्भात ॲड. सरोदे यांनी सांगितले, तहसीलदार देवरे यांनी भ्रष्टाचार केल्याचे सातत्याने आरोप होत आहेत. यात अनेक जण सहभागी असण्याची शक्यता आहे. नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी देवरे यांच्याबाबत नेमलेल्या चौकशी समितीने नुकताच अहवाल दिला आहे. यात स्पष्टपणे नमूद आहे की, बेकायदेशीर वाळूउपसा करणारी वाहने तहसीलदार देवरे यांनी जप्त केल्यानंतर सरकारी शुल्क भरून न घेताच ती सोडून दिली. अकृषक कामासाठी जमीन हस्तांतरित करताना अनियमितता, वाळू तस्करांना संरक्षण देणे, तसेच देवरे या जळगाव येथे कार्यरत असतानाही जमिनीच्या संदर्भातील कामकाजात भ्रष्टाचार केल्याचा ठपका आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी भ्रष्टाचार केला असल्याचे दिसत असल्याने त्यांची चौकशी करावी, अशी पोटघन यांनी मागणी केली आहे.

देवरे यांची पारनेर येथून बदली झालेली असली तरी कामाचे स्वरूप तेच राहणार आहे. त्यामुळे त्यांनी आपली कार्यपद्धती बदलावी, हा केवळ देवरे यांच्या विरोधातील तक्रार अर्ज नाही तर सरकारी पदाचा गैरवापर करणाऱ्यांसाठी ही धोक्याची सूचना असल्याचे यावेळी ॲड. सरोदे यांनी सांगितले.

-------------------------

भ्रष्टाचाराची पाठराखण होऊ शकत नाही

आत्महत्ये संदर्भात देवरे यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपबाबत बोलताना सरोदे म्हणाले, महिलांना कामाच्या ठिकाणी अनेक प्रकारचे दबाव सहन करावे लागतात, हे वास्तव आहे. देवरे यांच्यावर तसा अन्याय झाला असेल तर, मी वकील म्हणून त्यांच्यासोबत राहील. पण, यातून भ्रष्टाचाराची पाठराखण होऊ शकत नाही. त्यांच्या क्लिपमध्ये सत्य असण्याची शक्यता लक्षात घेतली पाहिजे. पण, चौकशी होऊ नये म्हणून भावनिक आवाहन करणे अथवा महिला असण्याचा गैरफायदा घेणे या गोष्टी योग्य नाही. ज्या महिलांवर कामाच्या ठिकाणी खरोखर अन्याय होत आहे, त्यांच्या तक्रारींचे यातून महत्त्व कमी होईल, असे मत सरोदे यांनी व्यक्त केले.