शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

अहमदनगर जिल्हा बँकेची एसआयटी मार्फत चौकशी करा; अनुसूचित जाती, जमाती आयोगाकडेही तक्रार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 11:13 IST

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या प्रशासनाने नोकर भरतीत प्रचंड मनमानी केली आहे. मात्र, सहकार विभागाच्या अधिका-यांनी बँकेला पाठीशी घातले आहे. त्यामुळे ‘एसआयटी’ मार्फत बँकेतील या घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने सहकार आयुक्तांकडे केली आहे.

अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेच्या प्रशासनाने नोकर भरतीत प्रचंड मनमानी केली आहे. मात्र, सहकार विभागाच्या अधिका-यांनी बँकेला पाठीशी घातले आहे. त्यामुळे ‘एसआयटी’ मार्फत बँकेतील या घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने सहकार आयुक्तांकडे केली आहे. वंचित बहुजन आघाडीने  बँकेची अनुसूचित जाती, जमाती आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. जिल्हा बँकेने २०१७ मध्ये ४६५ जागांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरु केली होती. या भरतीतील अनियमिततेवर ‘लोकमत’ने वारंवार प्रकाश टाकला आहे. भरतीबाबत तर आक्षेप आहेतच. मात्र, गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतरही मोठ्या प्रमाणावर अनियमितता करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील विशाल बहिरम हा आदिवासी युवक ज्युनिअर आॅफिसर पदासाठी अनुसूचित जमाती प्रकल्पग्रस्त संवर्गात गुणवत्ता यादीत प्रथम आला होता. मात्र, बँकेने त्याला नियुक्तीपत्रच पाठविले नाही. आम्ही या उमेदवाराला साध्या टपालाने नियुक्तीपत्र पाठविले असे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांचे म्हणणे आहे. ज्याची काहीही पोहोच बँकेकडे नाही. त्यामुळे बहिरम हा गुणवत्ता यादीत येऊनही त्याला नियुक्ती मिळालेली नाही. त्याच्या जागेवर कुणाला नियुक्ती दिली याचे काहीही स्पष्टीकरण बँक प्रशासन करत नाही. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी सहकार आयुक्तांकडे तक्रार केली असून या सर्वच घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. बँकेच्या भरतीत प्रोबेशनरी प्रथम श्रेणी अधिकारी पदावर निवड झालेला एक उमेदवार सेवेत हजर होत नसतानाही त्याला हजर  होण्यासाठी तब्बल दहा महिन्याची विशेष मुदतवाढ देण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने गत २० मार्चच्या बैठकीत घेतला आहे. याबाबतही चौकशीची मागणी भोस यांनी केली आहे. बँक भरतीची जी फेरचौकशी झाली. त्या फेरचौकशीत सहकार विभागाने भरतीच्या संशयास्पद उत्तरपत्रिका सरकारी ऐवजी खासगी एजन्सीकडून तपासून घेतल्या याबाबतही त्यांनी यापूर्वीच तक्रार नोंदवलेली आहे. संचालकांविरोधात तक्रार करणार अनुसूचित जमातीच्या उमेदवारावर अन्याय करणे हा गुन्हा आहे. विशाल भैरम याला बँकेने नियुक्ती का दिली नाही? बँकेने साध्या टपालाने नियुक्ती पत्रे का पाठवली? असा किती उमेदवारांवर अन्याय केला गेला आहे? याबाबत वंचित बहुजन आघाडी बँकेच्या संचालकांविरोधात अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अरुण जाधव यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ही तर जिल्ह्याची नामुष्की जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात शिक्षित व दिग्गज मंडळी असताना एवढ्या गंभीर चुका होत असतील तर ही आपल्या जिल्ह्याची मोठी नामुष्की आहे. सभासदांनी लोकशाही मार्गाने निवडून दिलेले संचालक मंडळ नेमके काय करत आहे? भरती प्रक्रियेत एका आदिवासी उमेदवारावर अन्याय केला जातो हे दुर्दैव आहे. माध्यमे जागल्याची भूमिका बजावत असल्याने बँकेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. या आदिवासी उमेदवाराने कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे. बँकेच्या कारभाराची व सर्व आरोपांची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी होणे आवश्यक आहे, असे अ‍ॅड. सुरेश लगड यांनी सांगितले.     

टॅग्स :AhmednagarअहमदनगरbankबँकLabourकामगार