शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

शिर्डी विमानतळावरून लवकरच आंतरराष्ट्रीय उड्डाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 03:38 IST

साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी नवीन टर्मिनल व कार्गो सेवा सुरू करण्यासाठी येत्या एप्रिलपासून काम सुरू होईल,

शिर्डी : साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी नवीन टर्मिनल व कार्गो सेवा सुरू करण्यासाठी येत्या एप्रिलपासून काम सुरू होईल, अशी माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांनी दिली़राज्यात मुंबई, पुणे, नागपूरनंतरचे शिर्डी चौथे तसेच देशातील वेगाने वाढणारे एकमेव विमानतळ ठरले असल्याचे काकाणी यांनी सांगितले़ धावपट्टीबरोबरच टर्मिनलचा विस्तार करण्यात आला आहे. अत्याधुनिक रडार यंत्रणा बसविण्यात आली आहे़ विमानतळावर वीज निर्मितीसाठी सोलर प्लॅन्ट बसविण्यात आला आहे. परिसरातील विहिरींचे पुनर्भरण करण्यात आले आहे़ नोव्हेंबरमध्ये नाईट लँडिंगचे काम पूर्ण होऊन डिसेंबरअखेर यासाठी परवाना मिळेल. आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी नवीन टर्मिनल व शेतमालासाठी कार्गो सेवा सुरू करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे़ यासाठी २०० कोटींचा आराखडा बनविला आहे. एप्रिलमध्ये काम सुरू होईल, असे काकाणी यांनी सांगितले़शिर्डी विमानतळावर विमान पार्किंगची क्षमता चारवरून अकरापर्यंत वाढविण्यात येत आहे़ येथे इंधन भरण्याचीही सुविधा आहे. एप्रिलपासून मुंबईत विमान उतरवणे शक्य नसेल तेव्हा तेथील विमाने शिर्डीत वळविण्यात येतील़ सध्या ही विमाने अहमदाबाद येथे नेण्यात येतात़ आंतरराष्ट्रीय सुविधा निर्माण करेपर्यंत सध्याही पंधरा दिवस आगाऊ परवानगी काढून विदेशातून येणारी खासगी विमाने येथे उतरु शकतील़, असेही काकाणी यांनी म्हणाले.>रोज चाळीस विमानांचे उड्डाण होणारसध्या देशांतर्गत सेवा वाढवण्यावर भर आहे. दोन वर्षापूर्वी चार विमानाने सुरू झालेल्या या विमानतळावर आता रोज अठ्ठावीस उड्डाणे होत आहेत़ येत्या दोन महिन्यांत ही संख्या चाळीसपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे़ यात शिर्डी-तिरुपती देवस्थानांना जोडणाऱ्या सेवेचाही समावेश असेल़ दोन वर्षांत पाच लाख प्रवाशांनी शिर्डी विमानसेवेचा लाभ घेतला़ या वर्षात हा आकडा सात लाखांवर नेण्याचा मानस आहे. पुढील वर्षी हा आकडा चौदा लाखांवर नेण्याचा कंपनीचा संकल्प असल्याचे काकाणी यांनी सांगितले़