शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

आंतरजिल्हा बदली यापुढे बंद, शासन निर्णयाला शिक्षक संघटनांचा विरोध

By चंद्रकांत शेळके | Updated: June 28, 2023 16:18 IST

शासनाने निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी होत आहे.

चंद्रकांत शेळके, अहमदनगर : यापुढे भरती होणाऱ्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली होणार नाही. आंतरजिल्हा बदली करू इच्छिणाऱ्या शिक्षकांना थेट राजीनामाच द्यावा लागेल व जेथे बदली हवी तेेथे पुन्हा परीक्षा देऊन गुणवत्तेच्या आधारे नियुक्ती मिळवावी, असा निर्णय मागील आठवड्यात शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयाचा शिक्षक संघटनांमधून जोरदार विरोध होत असून शासनाने निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी होत आहे.

शालेय शिक्षण विभागाने २१ जून रोजी शासन आदेश काढून त्यात नव्याने काही शिक्षकांची भरती करण्याचे नियोजन केले आहे. तसेच शिक्षकांच्या बदलीबाबत सुधारित धोरण घेतले आहे. त्यानुसार नवीन भरती झालेल्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली होणार नाही. यामुळे एका जिल्ह्यात नियुक्ती झालेले शिक्षक पुढे दुसऱ्या जिल्ह्यात बदली करू शकणार नाही. बदली करण्यासाठी नोकरी सोडावी लागेल व पाहिजे त्या जिल्ह्यात नियुक्तीसाठी पुन्हा अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा द्यावी लागेल. केवळ अपवादात्मक स्थितीतच बदली होणार आहे. यामुळे शिक्षकांसह संघटनाही संतापल्या आहेत.

बदली हा प्रत्येक कर्मचाऱ्याचा अधिकार असतो. बदली बंद करून शासन शिक्षकांवर अन्याय करू शकत नाहीत. शिक्षकांच्या बदल्या करताना होणारा भ्रष्टाचार थांबविण्यासाठी २०१७ मध्ये राज्याचे तत्कालिन ग्रामविकास मंत्री आणि ग्रामविकास सचिव यांनी शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया ऑनलाइन केली होती. या निर्णयामुळे शिक्षकांच्या बदल्या सुरळीत झाल्या, शिवाय भ्रष्टाचार थांबला. आता बदलीसाठी ज्या अटी टाकल्या आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी पुन्हा भ्रष्टाचार होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.जिल्हांतर्गत बदलीचे धोरण ठरवावे

शिक्षण विभागाने ग्रामविकास विभागालाही आपल्या धोरणात या अनुषंगाने बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हांतर्गत आपसी बदली, वैद्यकीय कारणास्तव तसेच तक्रारीच्या अनुषंगाने वा पती-पत्नी एकत्रिकरणांतर्गत अपवादात्मक प्रकरणांतील बदलीबाबत ग्रामविकास विभागाने धोरण ठरवावे, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.त्या शिक्षकांना एक संधी

दरम्यान, जुन्या शिक्षकांपैकी इच्छुक शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीची एक संधी दिली जाईल. ज्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची २०२२ मधील कार्यवाही पूर्ण झाली आहे, मात्र विनंती बदली मिळालेली नाही, अशा शिक्षकांची प्रतीक्षा यादी तयार करून पदे रिक्त होतील, त्याप्रमाणे नियुक्ती दिली जाणार आहे.बदल्या नको ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे. शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा. आंतरजिल्हा बदल्या करताना जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचे रोष्टर एक करावे. म्हणजे जुन्या शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला गती येईल. - बापूसाहेब तांबे, शिक्षक नेते, गुरुमाऊली मंडळपरजिल्ह्यात सेवा करणाऱ्या शिक्षकांची बदलीच न करणे हे धोरण अत्यंत चुकीचे आहे. कारण वर्षानुवर्षे काही शिक्षक स्वतःच्या कुटुंबापासून दूर सेवा देतात. त्यांना न्याय मिळायला हवा. वघड व पेसा क्षेत्रातील बदल्यांबाबत धोरण ठरविणे गरजेचे आहे. - प्रवीण ठुबे, शिक्षक नेते, प्राथमिक शिक्षक परिषद

टॅग्स :Teacherशिक्षक