शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

आंतरजिल्हा बदली यापुढे बंद, शासन निर्णयाला शिक्षक संघटनांचा विरोध

By चंद्रकांत शेळके | Updated: June 28, 2023 16:18 IST

शासनाने निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी होत आहे.

चंद्रकांत शेळके, अहमदनगर : यापुढे भरती होणाऱ्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली होणार नाही. आंतरजिल्हा बदली करू इच्छिणाऱ्या शिक्षकांना थेट राजीनामाच द्यावा लागेल व जेथे बदली हवी तेेथे पुन्हा परीक्षा देऊन गुणवत्तेच्या आधारे नियुक्ती मिळवावी, असा निर्णय मागील आठवड्यात शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयाचा शिक्षक संघटनांमधून जोरदार विरोध होत असून शासनाने निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी होत आहे.

शालेय शिक्षण विभागाने २१ जून रोजी शासन आदेश काढून त्यात नव्याने काही शिक्षकांची भरती करण्याचे नियोजन केले आहे. तसेच शिक्षकांच्या बदलीबाबत सुधारित धोरण घेतले आहे. त्यानुसार नवीन भरती झालेल्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली होणार नाही. यामुळे एका जिल्ह्यात नियुक्ती झालेले शिक्षक पुढे दुसऱ्या जिल्ह्यात बदली करू शकणार नाही. बदली करण्यासाठी नोकरी सोडावी लागेल व पाहिजे त्या जिल्ह्यात नियुक्तीसाठी पुन्हा अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा द्यावी लागेल. केवळ अपवादात्मक स्थितीतच बदली होणार आहे. यामुळे शिक्षकांसह संघटनाही संतापल्या आहेत.

बदली हा प्रत्येक कर्मचाऱ्याचा अधिकार असतो. बदली बंद करून शासन शिक्षकांवर अन्याय करू शकत नाहीत. शिक्षकांच्या बदल्या करताना होणारा भ्रष्टाचार थांबविण्यासाठी २०१७ मध्ये राज्याचे तत्कालिन ग्रामविकास मंत्री आणि ग्रामविकास सचिव यांनी शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया ऑनलाइन केली होती. या निर्णयामुळे शिक्षकांच्या बदल्या सुरळीत झाल्या, शिवाय भ्रष्टाचार थांबला. आता बदलीसाठी ज्या अटी टाकल्या आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी पुन्हा भ्रष्टाचार होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.जिल्हांतर्गत बदलीचे धोरण ठरवावे

शिक्षण विभागाने ग्रामविकास विभागालाही आपल्या धोरणात या अनुषंगाने बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हांतर्गत आपसी बदली, वैद्यकीय कारणास्तव तसेच तक्रारीच्या अनुषंगाने वा पती-पत्नी एकत्रिकरणांतर्गत अपवादात्मक प्रकरणांतील बदलीबाबत ग्रामविकास विभागाने धोरण ठरवावे, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.त्या शिक्षकांना एक संधी

दरम्यान, जुन्या शिक्षकांपैकी इच्छुक शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीची एक संधी दिली जाईल. ज्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची २०२२ मधील कार्यवाही पूर्ण झाली आहे, मात्र विनंती बदली मिळालेली नाही, अशा शिक्षकांची प्रतीक्षा यादी तयार करून पदे रिक्त होतील, त्याप्रमाणे नियुक्ती दिली जाणार आहे.बदल्या नको ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे. शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा. आंतरजिल्हा बदल्या करताना जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचे रोष्टर एक करावे. म्हणजे जुन्या शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला गती येईल. - बापूसाहेब तांबे, शिक्षक नेते, गुरुमाऊली मंडळपरजिल्ह्यात सेवा करणाऱ्या शिक्षकांची बदलीच न करणे हे धोरण अत्यंत चुकीचे आहे. कारण वर्षानुवर्षे काही शिक्षक स्वतःच्या कुटुंबापासून दूर सेवा देतात. त्यांना न्याय मिळायला हवा. वघड व पेसा क्षेत्रातील बदल्यांबाबत धोरण ठरविणे गरजेचे आहे. - प्रवीण ठुबे, शिक्षक नेते, प्राथमिक शिक्षक परिषद

टॅग्स :Teacherशिक्षक