शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

डिंबे माणिकडोह बोगद्याचे सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना : अण्णा हजारे यांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 17:50 IST

कुकडी सुधारीत प्रकल्प आरखड्यात डिंबे ते माणिकडोह बोगद्याचा समावेश करण्याच्या मागणीसाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुढाकार घेतला आहे.

श्रीगोंदा : कुकडी सुधारीत प्रकल्प आरखड्यात डिंबे ते माणिकडोह बोगद्याचा समावेश करण्याच्या मागणीसाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुढाकार घेतला आहे. हजारे यांच्या सुचनेनुसार जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी बैठक घेत डिंबे ते माणिकडोह बोगद्याचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश जलसंपदा विभागातील अधिका-यांना दिले.कुकडी लाभक्षेत्रातील शेतक-यांच्या दृष्टीने डिंबे माणिकडोह बोगद्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. सरकारने आता ठोस कार्यवाही करण्याची गरज असल्याचे अण्णा हजारे यांनी सांगितले.आमदार राहुल जगताप म्हणाले, डिंबे- येडगाव दरम्यान ५५ किमी लांबीचा कालवा आहे. हा कालवा पुर्ण क्षमतेने चालत नाही. त्यामुळे अडीच टीएमसी पाणी वाया जाते. डिंबे - माणिकडोह बोगदा हा १६ किलोमीटर अंतर लांबीचा बोगदा झाला तर माणिकडोह धरण दरवर्षी १००% भरण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हा बोगदा होणे गरजेचे आहे, यामुळे कुकडीचे एक आवर्तन वाढण्यास मदत होईल.गिरीष महाजन म्हणाले, अण्णा हजारे यांच्या सुचनेनुसार डिंबे माणिकडोह बोगद्याचा कुकडी सुधारीत प्रकल्प आराखड्यात समावेश करून बोगदा सर्व्हे करून घेणार आहे.यावेळी जलसंपदा विभागाचे सचीव रा. वी. पानसे, कुकडीचे अधिक्षक अभियंता हेमंत धुमाळ, विश्वनाथ अंतु कोरड,े लाभेश अतुल लोखंडे, किरण कुलकर्णी, अलका अहिरराव उपस्थित होते.हजारे मैदानातडिंबे ते माणिकडोह बोगद्याचा प्रश्न गेल्या २० वर्षापासून फक्त चर्चेत आहे. पण कार्यवाही मात्र झाली नाही. आमदार राहुल जगताप यांनी अण्णा हजारे व गिरीश महाजन यांच्यातील सलोख्याचे संबंध विचारात घेऊन हजारे यांच्या नेतृत्वाखाली या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. महाजन यांनी आपल्या निवासस्थानी जलसंपदा विभागातील अधिका-याची बैठक घेतली. आता हजारेंना दिलेला शब्द सरकारला पुर्ण करावा लागणार आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा