शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भारताऐवजी पाकिस्तान, चीनच्या कांद्याला लाभ; दरात ५०० रुपयांची घसरण

By शिवाजी पवार | Updated: August 22, 2023 13:52 IST

निर्यात शुल्क वाढीचा परिणाम सरकारने शून्य टक्के निर्यात शुल्कावरून थेट ४० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्याचा राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना थेट फटका बसला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेल्या ४० टक्के शुल्कामुळे राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये दरात मोठी घसरण उडाली आहे; मात्र केंद्राच्या या निर्णयामुळे पाकिस्तान आणि चीनमधील कांद्याची मागणी वाढली आहे. त्याचा दूरगामी परिणाम देशांतर्गत कांदा उत्पादकांना सोसावा लागणार आहे.

सरकारने शून्य टक्के निर्यात शुल्कावरून थेट ४० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्याचा राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना थेट फटका बसला आहे. क्विंटलमागे २८०० ते ३००० रुपयांवर गेलेले दर अवघ्या एक-दोन बाजारांमध्ये ५०० रुपयांनी पडले आहेत. यात आणखी घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पुढील काळात लवकरच दक्षिणेकडील राज्यांतील कांद्याचे उत्पादन होऊन तो माल बाजारात दाखल होईल. त्यामुळे बाजारभावात कोणतीही सुधारणा होणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, कांदा निर्यातीवरील ४० टक्के वाढीमुळे मलेशिया, नेपाळ, बांगलादेश तसेच अरब राष्ट्रांमध्ये निर्यातीला फटका बसला आहे. भारताऐवजी आता पाकिस्तान आणि चीन येथील कांद्याला मागणी वाढणार आहे. त्याचे दूरगामी परिणाम देशातील कांदा निर्यातीवर होणार आहेत. पाकिस्तान आणि चीनचे संबंध निर्यातक देशांमध्ये प्रस्थापित झाल्यास ते भारताला परवडणारे नाही, असे लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वढावणे यांचे म्हणणे आहे.तत्काळ परिणामकेंद्राच्या निर्णयाचा तत्काळ परिणाम व्यापाऱ्यांवर झाला आहे. बांगलादेश सीमेवर कांद्याची मोठी वाहने खोळंबली आहेत. निर्यात शुल्कावरील ४० टक्के दरवाढीने व्यापाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. वाहनांमध्ये लोड केलेल्या या मालाचे संकट उभे राहिले आहे.

टॅग्स :onionकांदाPakistanपाकिस्तानchinaचीन