शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

भारताऐवजी पाकिस्तान, चीनच्या कांद्याला लाभ; दरात ५०० रुपयांची घसरण

By शिवाजी पवार | Updated: August 22, 2023 13:52 IST

निर्यात शुल्क वाढीचा परिणाम सरकारने शून्य टक्के निर्यात शुल्कावरून थेट ४० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्याचा राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना थेट फटका बसला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेल्या ४० टक्के शुल्कामुळे राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये दरात मोठी घसरण उडाली आहे; मात्र केंद्राच्या या निर्णयामुळे पाकिस्तान आणि चीनमधील कांद्याची मागणी वाढली आहे. त्याचा दूरगामी परिणाम देशांतर्गत कांदा उत्पादकांना सोसावा लागणार आहे.

सरकारने शून्य टक्के निर्यात शुल्कावरून थेट ४० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्याचा राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना थेट फटका बसला आहे. क्विंटलमागे २८०० ते ३००० रुपयांवर गेलेले दर अवघ्या एक-दोन बाजारांमध्ये ५०० रुपयांनी पडले आहेत. यात आणखी घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पुढील काळात लवकरच दक्षिणेकडील राज्यांतील कांद्याचे उत्पादन होऊन तो माल बाजारात दाखल होईल. त्यामुळे बाजारभावात कोणतीही सुधारणा होणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, कांदा निर्यातीवरील ४० टक्के वाढीमुळे मलेशिया, नेपाळ, बांगलादेश तसेच अरब राष्ट्रांमध्ये निर्यातीला फटका बसला आहे. भारताऐवजी आता पाकिस्तान आणि चीन येथील कांद्याला मागणी वाढणार आहे. त्याचे दूरगामी परिणाम देशातील कांदा निर्यातीवर होणार आहेत. पाकिस्तान आणि चीनचे संबंध निर्यातक देशांमध्ये प्रस्थापित झाल्यास ते भारताला परवडणारे नाही, असे लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वढावणे यांचे म्हणणे आहे.तत्काळ परिणामकेंद्राच्या निर्णयाचा तत्काळ परिणाम व्यापाऱ्यांवर झाला आहे. बांगलादेश सीमेवर कांद्याची मोठी वाहने खोळंबली आहेत. निर्यात शुल्कावरील ४० टक्के दरवाढीने व्यापाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. वाहनांमध्ये लोड केलेल्या या मालाचे संकट उभे राहिले आहे.

टॅग्स :onionकांदाPakistanपाकिस्तानchinaचीन