शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

धर्माच्या नावाने देशात अस्थिरता  : भालचंद्र मुणगेकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 15:46 IST

भारताची अर्थव्यवस्था दिशाहीन आहे. केंद्र सरकार गेल्या साडेसहा वर्षात अर्थव्यवस्थेला दिशा देवू शकले नाही.

संगमनेर : भारताची अर्थव्यवस्था दिशाहीन आहे. केंद्र सरकार गेल्या साडेसहा वर्षात अर्थव्यवस्थेला दिशा देवू शकले नाही. नोटबंदीनंतर आर्थिक प्रगतीचा वेग सातत्याने कमी होत आहे.धर्माच्या नावाने देशात पुन्हा अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर घातक परिणाम होत आहेत, अशी टीका भारतीय अर्थतज्ज्ञ डॉ.भालचंद्र मुणगेकर यांनी केली.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना विश्रामगृहात रविवारी (दि.१४) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. २०१७ पासून भारतीय अर्थव्यवस्थेची घसरण सुरू आहे.

याबाबत अर्थतज्ज्ञांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी विनंती केली होती. मात्र, मोदींनी त्याकडे दुर्लक्ष केले. दिल्लीत सरू असलेल्या शेतकरी आंदोलनाकडेही केंद्र सरकार लक्ष द्यायला तयार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारपेक्षाही शेतकऱ्यांची प्रतिष्ठा मोठी आहे. केंद्र सरकारने कुठलीही चर्चा न करता, संसदेत मंजूर केलेले कृषी कायदे मागे घेण्यासंदर्भात पुनर्विचार करण्याची गरज आहे, असेही डॉ.मुगणेकर म्हणाले.

केंद्र सरकारविरोधात बोलणाऱ्यांना धाक दाखविला जात आहे. सीबीआय आणि ईडीच्या माध्यमातून विरोधकांना वेठीस धरले जात आहे. रोजगार, महागाई, शिक्षण आदी मुद्द्यांवर सरकारकडे काहीही धोरण नाही. लोकांचा मोदी सरकारच्या शब्दावर विश्वास राहिलेला नाही. इंधनाचे दर वाढवून सरकार गोरगरिबांची लूट करीत आहे. जीएसटी मंजूर होऊन चार वर्षे झाली. मात्र, अद्यापही इंधनाला जीएसटीच्या कक्षेत समावून घेतले नसल्याने मोठे आ‌र्थिक नुकसान होत आहे. असेही मुणगेकर म्हणाले.

            

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर